Wednesday 20 July 2022

Latest Review

ZANZIBARI MASALA

हलक्याफुलक्या आणि तरीही गंभीरपणे काही सांगू पाहणाऱ्या १२ कथा या संग्रहात आहेत. त्यापैकी एका कथेचे नाव संग्रहाला दिले आहे. या कथांच्या नावांमधूनच लक्षात येईल, की त्यात जपान, मॅनहॅटन, पॅरिस, नायजेरिया, टोकियो, हॉलंड आणि अर्थातच झांजीबार येथील परिसराचा फेरफटका असणार आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सरदार जाधव यांचे आहे.

Tuesday 19 July 2022

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT

would appreciate the way of writing where wildlife and human life are metaphorically connected throughout the book. It is equally good in making reader friendly by quoting ongoing issues,like movies. It`s a very nice book. Keen observations and inquisitiveness about wildlife and it`s behaviour; minute details of tribal culture are noteworthy. Happy to read and learn things.-Ms.Pratiksha Kale, Asstt. Conservator of Fores


*सामाजिक बांधिलकी जपणारी खुमासदार लेखनशैली* जी.बी.देशमुख ह्यांचे लेख असो वा पुस्तक असो, मराठी भाषेतील नेटके उच्चार, प्रगल्भ जीवन जाणीवा, वेधक भाषा मांडणी, यांचा परिश्रमपुर्वक प्रभावी वापर लेखकाने केला आहे. भाषेचे अमोघ सौंदर्य, भाषेची सहजता व ओघ लेखकाला प्रत्येक कथानक रंगवताना इतके साधले आहे की... लेखकाने अनेक वर्षापासून आपल्या दुर्बिणी सारख्या दृष्टीने अत्यंत शिताफिने माणसं व कुला मामा (मेळघाटातील वाघ) देखील वाचले आहेत, असे जाणवते. उत्तम बोलके संवाद, हा पुस्तकाचा आत्माच असतो. एकतर प्रभावी शीर्षक, त्यामुळे आताच वाचून घ्यावं अशी तळमळ मनात असते ..ती मी पूर्णत्वाला नेतेच.... त्याचे अमिताभवरचे लेख असो, `अमरावतीचे छप्पन स्वभाव` असो, `कुलामामाच्या देशात` असो... वाचतच रहावेसे वाटते.... सामाजिक बांधिलकी अत्यंत निष्ठेने जोपासली आहे त्यांनी .कधी खुदकन हसवणारी लेखन शैली, कुठ गंभीर, कुठ तिखट मिठ लावलेली, तू असाच लिहीत रहा... आम्ही वाचक आनंद घेत राहू.. मी त्यांच्या साहित्यकृतीला मनःपूर्वक शुभेच्छा देते....--डॉ. योजना बर्डे, अमरावती.


Saturday 16 July 2022

कशीर १५ जुलै २०२२ कार्यक्रम

 अखिल मेहता सर यांसकडून पाहुण्यांचे स्वागत 








प्रकाशन



प्रेक्षक 



प्रेक्षकांचे प्रश्न उत्तर आणि लेखिका सहना विजयकुमार यांचा संवांद 
 











Friday 15 July 2022

दाढीला लागली आग..

 सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी द्वारा अनुवादित

 'आजीच्या पोतडीतल्या गोष्टी' पुस्तकातील रंगतदार कथा...दाढीला लागली आग..



Thursday 14 July 2022

VANSHVRUKSHA ABHIVACHAN

एस.एल भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी अनुवादित वंशवृक्ष या पुस्तकाचे अनंत कुलकर्णी यांनी केलेले अभिवचन


Tuesday 12 July 2022

कादंबरीकार विश्वास पाटील यांचे चाहते आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील आहेत उत्त्चुक

 

महाकादंबरीकार विश्वास पाटील यांचे चाहते आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील आहेत 'महासम्राट'च्या पहिल्या खंडासाठी उत्सुक.येत्या १ ऑगस्टला प्रकाशित होतोय छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा काळ उलगडणारा 'झंझावात'







Monday 11 July 2022

AAJICHYA POTADITIL GOSHTI BY SUDHA MURTY


सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी यांच्या द्वारे अनुवादित आजीच्या पोतडीतील गोष्टी पुस्तकातील `मंतरलेले विंचू' कथेचे आरती मराठे यांनी केलेले अभिवाचन.






Saturday 9 July 2022

साद घालतो कालाहारी...Cry of the KALAHARI

 आऽऽऽऊऽऽ - हळुवार कण्हण्याच्या आवाजाने मी दचकलो. हळूच माझे डोके उचलून माझ्या पायांकडे बघितले. क्षणभर माझा श्वासच घशात अडकला. माझ्या पायांपलीकडे एक भली मोठी सिंहीण होती, कमीतकमी तीनशे पौंड वजनाची असेल. जमिनीवरून बघितल्यामुळे तर अजूनच मोठी दिसत होती. ती पंधरा फुटांवरून आमच्या दिशेने चालत येत होती. चालताना तिचे डोके एकीकडून दुसरीकडे हेलकावत होते आणि प्रत्येक पावलागणिक तिच्या शेपटीचे काळे टोक हादरत होते. मी मुठीत शेजारचे गवत घट्ट पकडले आणि स्तब्ध होऊन पाहत राहिलो. अगदी तालबद्ध पावले टाकत ती सिंहीण माझ्या दिशेने चालत आली. तिच्या थोराड मिश्यांच्या टोकाला दवाचे थेंब चिकटले होते, तिच्या पिवळ्याधमक डोळ्यांनी ती थेट माझ्याकडे बघत होती. मला डेलियाला उठवायचे होते; पण हालचाल करायची भीती वाटत होती.निव्वळ एकजोडी कपडे घेऊन धरतीवरच्या सर्वात मोठ्या अस्पर्शित वाळवंटात आयुष्याची सात वर्षे घालवणारं एक अद्भुत जोडपं..ज्यानं कालाहारीच्या वाळवंटातलं अनभिज्ञ प्राणीजीवन जगासमोर आणलं, अशा मार्क आणि डेलिया ओवेन्सचे चित्तथरारक अनुभवकथन.



Thursday 7 July 2022

FEATURED AUTHOR-KIRAN BEDI

 

        किरण बेदी यांचा जन्म अमृतसर येथे १९४९ साली झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. आयआयटी, दिल्ली येथून त्यांनी अमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार (सामाजिक शास्त्र विभाग) या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. त्या राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनियर टेनिस चॅम्पियन होत्या. आशियाई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले.
निवडक मानसन्मान
१९९४ मध्ये फिलिपीन्सच्या रेमन मॅगसेसे फौंडेशनचा शांतता पुरस्कार. हा पुरस्कार प्रथमच आशियातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला मिळाला.
सर्वांगीण आणि नावीन्यपूर्ण प्रयोगशील व्यवस्थापनासाठी जोसेफ बायस फाउंडेशनचा (स्वित्झर्लंड) पुरस्कार.
भारतातील न्यायव्यवस्थेत लक्षणीय बदल घडवून आणू शकेल असे कार्य केल्याबद्दल मॉरिसन टॉम गिशॉफ पुरस्कार (युएसए).
मानव कल्याण, स्त्रियांचे हक्क, विशेष सेवा आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी असलेल्या बांधिलकीसाठी प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार (युएसए).
भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस शौर्य पदक.
अमली पदार्थ सेवन प्रतिबंधाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल नॉर्वेच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ गुड टेम्प्लार्स संघटनेतर्फे एशिया रीजन अ‍ॅवॉर्ड.
मद्य, मादक पदार्थ, एड्स आणि तंबाखूसेवन याविरुद्ध मोहीम उघडून लोकांच्या आयुष्याची प्रत सुधारल्याबद्दल इंटरनॅशनल इक्युमेनिकल फोरम या असोसिएशन ऑफ खिश्चन कॉलेजेस अ‍ॅन्ड युनिव्र्हिसटीजतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार.
मदर टेरेसा अ‍ॅवॉर्ड, २००५.
याशिवाय पोलीस क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्यासाठी गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर आणि द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्याकडून अनुक्रमे २००३ व २००५ साली त्यांना मानद डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले.





Wednesday 6 July 2022

Caste Matters by Suraj Yengde | सूरज एंगडे लिखित कास्ट मॅटर्स

 

या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात. 


Monday 4 July 2022

LATEST REVIEW-CRIMINALS IN UNIFORM


DAINIK KESARI 03/07/2022--

आपल्या दैनंदिन भावविश्वाच्या पलीकडे असे जग आहे, जिथे सतत काही ना काही घडत असते. नवीन उलथापालथ होत असते. घटना घडल्यानंतर त्याचा आढावा प्रसारमाध्यमांद्वारे घेऊन आपण पुन्हा आपल्या कामांकडे वळतो. वरवरचं दिसणं सोडलं तर अंतर्गत घडामोडी किती खोलवर परिणाम करतात, त्यात नाहक कसे बळी पडतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी हे दोन्ही लेखक ज्येष्ठ गुन्हे शोध पत्रकार असून यांनी शोध पत्रकारिता करून अनेक हाय प्रोफाइल्स गुन्हे उघडकीस आणले आहेत. या लेखकद्वयींचं पहिलं पुस्तक ‘तेलगी स्कॅम’ खूप गाजलं. या पुस्तकाच्या यशानंतर आता हे लेखकद्वयी वाचकांसाठी रोमांचक, थरारक अशी कहाणी घेऊन आले आहेत. ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही कादंबरी चित्तथरारक अशी खाकी वर्दीची कहाणी आहे. मूळ कादंबरी हिंदी भाषेत आहे. त्याचा मराठी अनुवाद मुकुंद कुळे यांनी केला आहे. कादंबरीतील कथानक मुंबई परिसरात घडतं. कादंबरीचं निवेदन तृतीयपुरुषी असून पात्रांच्या संवादातून कथानक आणखी रंजक होत राहते. कादंबरीची सुरुवात होते एका ब्रेकिंग न्यूजने. भारतातील सगळ्यात श्रीमंत आसामी कुबेर. कुबेरच्या घराबाहेर म्हणजे कुबेरियाबाहेर एक स्फोटकांनी भरलेली बेवारस गाडी आढळते आणि तिथून सुरू होतं थरारनाट्य. या प्रकरणी पोलीस दल, बॉम्बशोध पथक, मीडिया सगळे जमा होतात. ही कसे पाहण्यासाठी १७वर्षांपूर्वी पोलीस दलातून निलंबित केलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक यतिन साठेला पाचारन केले जाते आणि त्याला सीआययूचा प्रमुख केले जाते. या प्रकरणाची चौकशी एटीएस, एनआयए, मुंबई पोलीस या सर्वांकडून सुरू होते. एक प्रकारे त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. कथानकातील प्रसंग वर्तमानातून भूतकाळात पुन्हा वर्तमानात अशा पद्धतीने घटनांची मांडणी केलेली आहे की, वर्तमानातील घटनेचा भूतकाळाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि कथानक जसजसे पुढे जात राहते तसतसे अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि वाचकांची उत्कंठा वाढत राहते. या गाडी प्रकरणात आणखी एक प्रकरण घडतं ते म्हणजे हसमुख जैन हत्या प्रकरण. या प्रत्येक घटनेनंतर साठेच्या संशयास्पद हालचाली सगळ्यांच्या नजरेत येतात. खरेच या सगळ्यामागे यतिन साठेचं नियोजन होतं का? हे करून त्याला काय मिळणार होतं? का यामागे खरा सूत्रधार कोणी वेगळा आहे? हे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. या पुस्तकात अनेक सरकारी यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा याविषयी उल्लेख आहे. या यंत्रणांच्या कामकाजाची, नियोजनाची माहिती यातून कळते. कादंबरीत अनेक पात्रे प्रसंगानुरूप भेटतात. मुंबई पोलीस आयुक्त महावीर तोमर हा अत्यंत महत्त्वाकांक्षी अधिकारी. त्याने आपल्या पदाच जोरावर वसुलीतंत्र सुरू केलेलं असतं. तोमर आपल्या पदाचा गैरवापर करून कसे खेळ खेळतो आणि इतरांना अडकवतो पण खरे काय आहे? या प्रकरणाचा सूत्रधार कोण? या गुन्ह्यामागील नेमका हेतू कोणता? तो सूत्रधार सापडतो का? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. एखाद्या गुन्ह्यामागे कसे नियोजन केले जाते आणि आपल्या हाताखालील वक्तींचा प्याद म्हणून कसा वापर केला जातो? आणि प्रकरण अंगाशी आल्यावर स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी कसे दुसऱ्याला उद्ध्वस्त केलं जातं. हे वास्तव यात मांडले आहे. पोलीस दलात ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही टीम कोण तयार करते, हा प्रश्न उद्भवतो. ही केस कशा पद्धतीने सोडवली जाते. त्यामागची प्रक्रिया कशी असते. हे वाचताना एखाद्या चित्रपटाची कथा वाचतोय की काय असे भासते. एक प्रकारचं थ्रिल याद्वारे अनुभवता येतं. या पुस्तकाद्वारे कोणत्याही यंत्रणेला बदनाम करण्याचा हेतू नाही. पण काही व्यक्तींमुळे संपूर्ण यंत्रणा कशी बदनाम होते, यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीत यतिन साठी सोबतच सतत उल्लेख येतो तो गुन्हे शोध पत्रकार संजय त्रिवेदी यांचं. तो ही या प्रकरणातील दुवे कसे शोध्तो. हे समजते. यातील बाकीची पात्रे गृहमंत्री सरदेशपांडे, कुबेरचा मुख्या सुरक्षारक्षक अमन चौधरी, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप वर्मा, एटीएसचा प्रमुख पलांडे, पोलीस निरीक्षक नित्या, आर्य, रोहतगी, जितेंद्र नागपुरे, महेश भोर, शिक्षा भोगणारा पोलीस गजानन झेंडे, कुबेर, कुबेरचा मुलगा ध्रुव, संचिनी, नीना डायस या सगळ्या पात्रांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन जाणून घेण्यासाठी ही रोमांचक आणि थरारक कादंबरी नक्की वाचा. लेखकद्वयी यांना गुन्हे शोध पत्रकारितेचा ४० वर्षांचा अनुभव आहे. अनेक प्रकरणं त्यांनी जवळून अनुभवली आहेत. अनेक प्रकरणं मिडियासमोर आणले आहेत. त्या निरीक्षणातून, कामाच्या अनुभवातून या कादंबरीची निर्मिती झाली. या कादंबरीच्या आकृतिबंधामुळे ही कथा त्यांना विस्तृतपणे आणि रंजकतेने वाचकांसमोर आणता आली. कादंबरी नक्की वाचा आणि अनुभवा ‘कहाणी खाकी वर्दीची’. – अस्मिता प्रदीप येंडे

AUDIO REVIEW

KAR HAR MAIDAN FATEH by VISHWAS NANGRE PATIL 






Saturday 2 July 2022

ध्यासपर्व


सेवासदनच्या संस्थापक रमाबाई रानडे...भारतातील पहिली डॉक्टर स्त्री आनंदीबाई जोशी...महर्षी कर्व्यांच्या कार्याशी एकरूप होऊनही स्वत्व जपणाऱ्या बाया कर्वे... विधवेच्या जिण्यातून बाहेर पडून समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाऱ्या पार्वतीबाई आठवले...बालकवींसारखा प्रतिभावंत नवरा मिळूनही दु:खाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पार्वतीबाई ठोंबरे... ज्ञानकोशकार केतकर यांच्यासाठी परदेशातून इथे येऊन हिंदू झालेल्या आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचं जीवितकार्य पूर्ण करणाऱ्या शीलवती केतकर...भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी...स्त्रियांचे प्रश्न धीटपणे मांडणाऱ्या, काळाच्या पुढे असणाऱ्या देदीप्यमान लेखिका मालतीबाई बेडेकर...लेखिका, समीक्षक विदुषी कुसुमावती देशपांडे...`पाणीवाली बाई’ म्हणून मुंबईत प्रसिद्धीस आलेल्या मृणाल गोरे... उच्च कोटीचा कलाकार असूनही एकटेपण वाट्याला आलेल्या अन्नपूर्णादेवी...गोवा मुक्ती लढ्यात उडी घेणाऱ्या सुधा जोशी... एकूण बारा स्त्रियांच्या जीवनाचा आणि कार्यकर्तृत्वाचा सहृदयतेने घेतलेला वेध.BOOK REVIEWS

Friday 1 July 2022

New Arrivals--June 2022

 

भारतीय संस्कृती ही उपासना, त्याग, संयम, शुचिता, सहिष्णुता,पूर्वजांचे स्मरण इ.चे मिश्रण असून,ती अंधारातून प्रकाशाकडे नेते. महामानव घडवते ही संस्कृती. दिवसेंदिवस हा विस्तार वाढतच जाणारा. देवर्षी नारद, वसिष्टमुनी, भगवान पतंजली, नाट्याचार्य भरतमुनी, वाल्मीकी, श्रीराम-श्रीकृष्ण, संत तुलसीदास, ज्ञानदेव-तुकाराम, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, कवी कालिदास इ. अविस्मरणीय थोर विभूतिंचे दर्शन आपल्याला ‘भारतीय संस्कृतीचे सर्जक’ मधून घडते. या सर्जकांचा अजूनही खूप मोठा विस्तार होऊ शकतो. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा-परंपरा, वेद, उपनिषदे, भारतीय संस्कृतीची प्रतीके-(स्वस्तिक, कमळ, नंदी, शिविंलग, तुळस इ.), ऋषी-मुनी, महान विभूती व नवविधा भक्ती, वैदिक साहित्य यांचा विशेष अभ्यास करून लेखक द्वयींनी हे सृजनात्मक नवनीत आपल्यासमोर ठेवले आहे. ‘भारतीय संस्कृतीचे सर्जक’मधून ही ज्ञानरूपी कवाडे वाचनसमृद्धीकडे निश्चितच नेतात. म्हणूनच हा संस्कृतीसृजनाचा वारसा मौल्यवान ठरतो.













श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर अक्रूर, उद्धव, अर्जुन, द्रौपदी इत्यादी त्याच्या स्मृती जागवत आहेत. त्यांच्या स्मरणातून कंसवध, स्यमंतक मणी, उग्रसेन-पवनरेखेची कथा, अश्वत्थाम्याने पांडवपुत्रांची केलेली हत्या, रुक्मिणीने त्याला केलेलं शासन, जरा पारध्याचा बाण लागून श्रीकृष्णाचा झालेला मृत्यू इत्यादी अनेक घटना उलगडत जातात. वर्तमान-भूत या दोन काळांमध्ये आंदोलणाऱ्या या घटनांना चिंतनाची जोड आहे. हे चिंतन म्हणजेच ‘परतुनि ये घनश्याम...’ ही कादंबरी. श्रीकृष्णाच्या मृत्यूमुळे भकास झालेल्या द्वारकेपासून सुरू झालेली ही कथा उद्धवाच्या परममुक्तीच्या बिंदूशी येऊन ठेपते, या दोन बिंदूंमधील हे अंतर नक्कीच अनुभवण्यासारखं.












श्रीकृष्णाच्या केवळ स्मरणाने अस्तित्वाविषयीचा अहंकार गळून पडतो. ‘कृष्णं वन्दे जगद्गुरूम!’ मधून कृष्णाचे अदृश्य दर्शनही मानवांत फार मोठा बदल घडवते, इथेच श्रीकृष्णाची थोरवी व प्रचिती मिळते. वर्तमानातल्या जगण्यातच हा कृष्ण आपलं सारथ्य करत असतो. या बदल्यात कृष्णाला काही नको असते, फक्त निखळ, निव्र्याज प्रेम व निर्लेप भक्ती हवी असते. सच्चेपण हवे असते; आणि ते त्याला मिळते. ‘महाभारता’तून जणू जीवनाचे नवरस मानवाची पाठराखण करतात. कारण–कृष्ण म्हणजे एक आदर्श आहे, पूर्णत्वाचा आदर्श! शेवटी काळ कोणताही असो, धर्म वा प्रदेश कोणताही असो, विविध काळांतल्या, धर्मांतल्या अथवा प्रदेशांतल्या अखिल मानवजातीला ईश्वराबद्दल जी एक उत्कंठा आहे, आणि जी अत्यंत उत्कट स्वरूपाची आहे, त्या उत्कंठेचा आविष्कार म्हणजेच, ‘श्रीकृष्ण’ होय.






भ. श्रीकृष्ण व म.गांधी या दोन्ही युगपुरुषांचे जीवन म्हणजे समाजमनाचा निर्लेप आरसाच. न्याय-नीतिला स्वीकारून या दोघांनीही अन्यायाला आपापल्या पद्धतीने विरोध दर्शवला. गांधींनी उपोषण, स्वपीडनाचा मार्ग स्वीकारून हृदयपरिवर्तन घडवून आणले व ब्रिटिशांना पळवून लावले. तर श्रीकृष्णाने कंस, शिशुपाल, पूतना, नरकासुर इ. अन्याय करण्याऱ्या राक्षसांना मारले व कौरवांशी युद्ध स्वीकारून पांडवांना न्याय दिला. या असामान्य व्यक्तींच्या जीवित ध्येयाचा परीस भारताला गवसला; पण तो न ओळखताच फेकला गेला, ही वस्तुस्थिती. या दोन्ही युगपुरुषांना आयुष्याच्या अखेरी एकाकी-उपेक्षित जीवन वाट्यास आले. कृष्णाचे स्वजन त्याची नजर चुकवून बेभान झाले. मद्यपान, द्यूत, कलह, मारामाऱ्यांनी त्यांनी एकमेकांचा सर्वनाश करवून घेतला. गांधींच्या तत्त्वांना, आदर्शांना जणू चूड लावली गेली. तुरुंगातून सुटल्यावर गांधी शक्तिहीन होऊन पाहात राहिले. कस्तुरबांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. त्यांचे ’सत्य’ विद्रूप झाले व ’अहिंसा’ मृत्युपंथाला गेली. ’चक्र ते चरखा’ या पुस्तकातील कृष्ण-गांधींचे विचार आजही उचित ठरतात.




पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी यांचे `फिअरलेस गव्हर्नन्स` हे पुस्तक शासनाच्या वास्तविकतेचे प्रकटीकरण आहे. डॉ. बेदी यांनी नायब राज्यपाल म्हणून केलेल्या सुमारे पाच वर्षांच्या सेवेचा आढावा यात पाहायला मिळतो. भारतीय पोलीस सेवेतील चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर डॉ. बेदींनी जबाबदार शासनाच्या योग्य पद्धती दाखवून दिल्या. संघभावना, सहयोग, आर्थिक विवेक, प्रभावी पोलिसिंग, सेवांमधील बंधन आणि निर्भय नेतृत्वाद्वारे अनेक धडाडीचे निर्णय घेतले. `फिअरलेस गव्हर्नन्स` हे सुशासन आणि नेतृत्वाचा पाठ वाचायला, बघायला, ऐकायला आणि अनुभवायला देणारं पुस्तक आहे. यात छायाचित्रे, ग्राफिक्स आणि लहान व्हिडिओंसह सचित्र मांडणी करण्यात आली आहे ज्यांचा QR कोडद्वारे आनंद घेता येतो.







राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करू इच्छिणारे धोरण आहे. त्यात जशा जमेच्या बाजू आहेत, तशाच उणिवाही आहेत. या धोरणावर भाष्य करणे धोरणाच्या दोषरहित अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे ठरते. म्हणून अनेक मुद्द्यांची सविस्तर विचारपूर्वक मांडणी या पुस्तकात पाहायला मिळते. ज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणातील महत्त्वाच्या तरतुदींसोबतच, धोरणांच्या अंमलबजावणीतील विविध संस्थांची संस्थात्मक जबाबदारी, धोरणातील स्वागतार्ह बाबी आणि धोरणाच्या पुनर्मांडणीची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे.