Friday 15 August 2014

भारत ( खरंच) माझा देश आहे? - मेघना शहा

भारत ( खरंच) माझा देश आहे?

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. हल्ली हि आपली प्रतिज्ञा आपण शाळेतच ठेऊन बाहेर पडतो की काय असे वाटते. कारण आपण आपले घर, आपली माणसे यापलीकडे ़फारसे पाहतच नाहीत. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, रस्ते, वाहने का कधी आपल्याला आपली वाटत नाहीत? अर्थात याला अपवाद देखील नक्कीच असतील नाही असे नाही, पण हे प्रमाण नक्कीच कमी आहे. 

असाच मला आलेला एक अनुभव. एकदा बसमधून मी आणि आमच्या संकुलातील काकी प्रवास करीत होतो. काकी खिडकीजवळ बसल्या होत्या. त्यांनी दोघींसाठी चॉकलेट काढले. चॉकलेट खाऊन झाल्यावर मी नेहमीप्रमाणे त्यांची चांदी (ैraज्ज्ी)पर्समध्ये ठेवले. ते पाहून त्या म्हणाल्या 'अरे बापरे, पर्यावरणवाली शेजारी असल्यामुळे मला देखील चांदी पर्समध्ये ठेवावी लागेल'. मी त्यांना म्हणाले 'कुणासाठी तरी नको, तर मनापसून करा' गोष्ट साधी आहे पण आपली मानसिकता दर्शवणारी आहे. गंमत म्हणजे काकीच थोड्या वेळापूर्वी मला आपल्याकडे कशी अस्वच्छता असते हे तावातावाने सांगत होत्या आणि आपल्या देशाची
तुलना परदेशाशी करत होत्या. कारण त्यांची मुलगी लंडनला राहत होती. खरंच, अशी तुलना होऊ शकते का?....

असाच दुसरा अनुभव एका छोट्या मुलीचा आहे. शेजारी राहणाNया मैत्रिणीची N.R.घ् भाची पहिल्यांदाच लंडनहून भारतात येत होती. वय साधारण साडेचार पाच वर्ष. मैत्रिणीने सांगितले विमानतळापासूनच तीची कटकट सुरु झाली होती. आमचं लंडन असं आहे आणि तुमचा भारत असा आहे. रस्त्त्यावरील खड्डे, अस्वच्छता, नियम न पाळणे याने ती इतकी वैतागली होती की शेवटी तिने सांगितले, '' आमच्या लंडनला येऊन बघा किती छान आहे आमचे लंडन!'' 

मैत्रीण मला म्हणाली 'खरं तर ती खुपच छोटी आहे,पण तिने सांगितलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नव्हते.
या आणि अश्या कितीतरी सवयी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटते की याची साधी दखल देखील आपण घेत नाहीत. इतर देशात ़िफरायला गेल्यावर आपण तेथील नियम पाळतो, मग आपल्या देशात का नाही?

यासाठी प्रथम देश 'आपला' वाटला पाहिजे. मी एकट्याने करुन करुन काय मोठा फरक पडणार आहे? असा विचार करुन चालणार नाही. विंâवा नियम तोडण्याची सुरुवात तरी आपल्यापासून करु नये. कारण चांगल्या गोष्टींचे अनुकरण आपण सहज करत नाहीत पण वाईट गोष्टी मात्र सहज आपल्या अंगवळणी पडतात. जसे सार्वजनिक ठिकाणी कचरा हा कचरापेटीच्या बाहेरच दिसतो. कारण कुणीतरी एकाने सुरुवात केलेली असते आणि बाकीचे त्याचेच अनुकरण करतात. नंतर कुणाला कचरा कचरापेटीत जरी टाकावा असे वाटले तरी त्या
कचरापेटीपर्यंत पोहोचणे अशक्य अशक्य होते.

अजून एक उदाहरण देता येईल ते वाहतूकीचे नियम न पाळण्याचे. कितीतरी वेळा आपण पाहतो कि लाल सिग्नल असतानासुध्दा गाड्या सिग्नल तोडून पुढे जातात. एक प्रसंग आठवतो. 

एकदा लाल सिग्नल असल्यामुळे गाड्या थांबल्या होत्या. हिरवा सिग्नल होण्यास अजून १५ सेवंâद बाकी होते. तेवढ्यात काही गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. एक काका झेब्राक्रॉसिंगवरुन रस्ता क्रॉस करत होते. ते अध्र्या रस्त्यात असतानाच गाड्या सुरु झाल्या ते एवढे  चिडले कि रस्त्यावर थांबूनच त्यांच्या जवळ येऊन थांबलेल्या बसच्या चालकाशी भांडू लागले. त्यांचा संताप अगदी खरा होता. पण तो पहायला, ऐकायला, समजून घ्यायला वेळ होता कुणाला?

यामुळे होते काय कि ज्यांना सिग्नल पाळायचा असेल त्यांना देखील जबरदस्तीने सिग्नल तोडावा लागतो विंâवा मागील गाड्यांचा कर्वâश्य आवाज तरी सहन करावा लागतो. गाडीतून कचरा बाहेर पेâकणे हे देखील नेहमी आढळणारे दृश्य. मग ती गाडी आपली असो विंâवा रेल्वेची असो. वरील घटना प्रतिनिधिक स्वरुपाच्या आहे. या सारखे अनेक अनुभव आपण जवळपास रोजच घेत असतो.

सामाजिक जाणीव तसेच पर्यावरण रक्षणाचा विचार करताना वरील मुद्दे देधील लक्षात घेणे आवश्यक आहे. या सगळ्यांसाठी प्रथम हा देश माझा आहे ही जाणीव होणे महत्वाचे आहे. 

मेघना शहा
ठाणे

Wednesday 13 August 2014

सैनिक हो, तुमच्यासाठी...

पॅटनचे गंडस्थळ फोडणारा छावा

कसूरक्षेत्री धावत आले पाकिस्तानी रणगाडे
हटवित, रेटित भारत-फौजा चाल चालती उन्मादे.
अंगावर क्षण घेउन शत्रू भारत घेई माघार
प्रतिकारास्तव व्यूह बांधला करुनि मनाचा निर्धार.
रणगाड्यांच्या धुंद टेकड्या डागत येता तोफांना
निकरावरती येउन लढण्या आज्ञा झाल्या फौजांना.
उठली राने, उठली झाडे येत भारती रणगाडे
चार बाजुंनी हल्ले चढता पुरता मध्ये अरि कोंडे.
हातघाइची होय लढाई खच प्रेतांचा पदोपदी
तरी न हटती फौजा अपुल्या, पायांखाली रक्त-नदी.
खवळल्या शत्रु-सैन्याला
नच उरले काही भान
रणगाडे धावत येती

अन् घेति अचानक प्राण.
धुर अस्मानाला जाई
त्या उडता अरिच्या तोफा
अन् पुढेच येती गाडे
सैन्याचा घेउन ताफा.
परि हटला भारत नाही
तो तिथेच ठाकुन राही
निकराच्या हल्ल्यासाठी
सारली शेवटी बाही.
तो अब्दुल हमीद मोठा
धीराचा हवालदार
मोच्र्यावर खंबिर ठाके
दे टोले वारंवार.
सैनिका धीर देऊनी
हल्ल्यावर चढवी हल्ले
ना जुमानिता त्यांनाही
ते धावत आले किल्ले.
सावरून हँडग्रेनेड
मग सरला हळूच पुढती
दणक्यात पाडला गाडा
तेलाची फोडुन टाकी.
ते धूड तिथे ढासळता
वेगाने दुसरा आला
अवधान राखुनी तेव्हा
अब्दूल बाजुला सरला.
मग अचुक नेम साधूनी
पेâकला बाँब त्यावरही
तोडली साखळी-चव्रेâ

रक्तात भिजे पण बाही.
ते दुसरे धूडहि तेथे
पडताच धावले तिसरे
तो जखमी वीरहि तेव्हा
भिजलेली बाही सारे.
कौशल्ये घेउन गोळा
बळ एकवटूनी हाती
त्या पॅटन सैतानाच्या
खच्चून मारला माथी.
त्या भयाण दणक्यासरशी
हो स्फोट आतल्या आत
अन् अल्लासदनी गेले
जे सैनिक होते त्यात.
घ्यावया श्वासही आता
मोकळा वेळ ना त्याला
तो चौथा राक्षस मोठा
धावून अचानक आला.
सावधान होउन तोच
हातात घेतला बाँब
परि प्राणघातकी गोळ्या
चिंधडून गेल्या अंग.
तरि पॅटन तीन गजांना
चारूनी भारत-माती
अब्दूल ‘परम-वीर’ तो
तनु ठेवी धारातीर्थी.

Friday 8 August 2014

चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल

आम्ही बहिणी

तुमच्या मैत्रिणींबरोबर फोनवर दहा मिनिटं गावगप्पा (गॉसिपिंग) करून, तुमचा जबडा आणि हनुवटी जितकी डौलदार होईल, तेवढी ती प्लााqस्टक सर्जरीनंदेखील होणार नाही. 
- डॉक्टर जेन कर्टन

डायानाला तिच्या ब्राउनीचा मधला भाग आवडतो. मी प्रथम कोपरे आणि मग कडा खाते. तिला मफिन्चा वरचा भाग आवडतो. मला तळ आवडतो. तिचे केस लांब, दाट आणि कुरळे आहेत. माझे तारेसारखे सरळसोट आणि मऊ आहेत. आम्ही एकमेकींच्या केसांबद्दल असूया करतो. ती उजव्या हातानं कामं करते, मी डावखोरी आहे. ती उंच आहे आणि बाबांसारखी दिसते. मी आईसारखी दिसते; पण तरीही गावातल्या उपाहारगृहात आम्ही एकमेकींकडे तोंड करून बसतो, तेव्हा जणू लकबी आणि हावभावाचं आम्ही आरशात प्रतिबिंबच पाहत असतो. आमचे हात सारख्याच पद्धतीनं हलतात. आम्ही दोघीही टोस्ट खाण्यापूर्वी कॉफीचा घोट घेतो. (तिचे टोस्ट पांढरट असतात, माझे जळलेले असतात.) आम्ही एकमेकींसारखं वागताना जाणवलं, की आम्ही मनमोकळं हसतो. आमचे ओठ बोटांच्या टोकांनी झावूâन टाकतो, तेही अगदी एकमेकींप्रमाणे. आम्ही खिदळणं दाबतो. ‘‘हं!’’ आम्ही म्हणतो. कधीकधी लोक विचारतात, आम्ही जुळ्या बहिणी आहोत का? आम्ही जुळ्या नाही; पण आम्ही बहिणी आहोत.

मोठं होत असताना आम्ही सर्वात जवळच्या मैत्रिणी होतो. रस्त्यावरच्या दिव्यांखालून, तंग कपड्यांमध्ये, अनवाणी पळत आम्ही काजव्यांचा पाठलाग करत असू आणि पायांची माती रस्त्याच्या कडेच्या डबक्यामध्ये धुऊन टाकत असू. मग आम्हापैकी एकीला वटवाघूळ दिसलं, तर आम्ही घराच्या पोर्चच्या सुरक्षित आसNयाला विंâचाळत पोहोचून एकमेकींना मिठी मारत असू आणि खिदळत असू. मला ठाऊक आहे, की जवळून जाणाNया कुणालाही आम्ही वेडपट वाटत असणार; पण तेव्हा आम्ही त्याची कधीही फिकीर केली नाही. माझ्या बहिणीला मी कधी मूर्ख वाटले नाही.

आम्ही आमचा जवळजवळ सर्व वेळ एकत्र घालवत असू. आम्हाला इतर मैत्रिणी होत्या; पण आमची एकमेकींशी होती, तेवढी इतर कुणाशीही जवळीक नव्हती. आम्ही एकच खोली, एकच मोठा पलंग, एकच अंघोळीचा टब, आमचे कपडे-खेळणीसुद्धा वाटून घेत असू. आम्ही आमची गुपितं, भीती आणि स्वप्नंही
वाटून घेत असू. बहिणीच्या गुपितांहून अधिक महत्त्वाचं काहीही नसतं. आमच्या बार्बी बाहुल्या आमच्याप्रमाणेच वागत. तिची माझ्या बाहुलीहून मोठी होती, खूप सारे कपडे बाळगून होती आणि दादागिरी करणारी होती. माझी बाहुली कुरकुरणारी आणि मनासारखं झालं नाही तर आदळआपट करणारं लहान मूल
होती. आम्ही कधी तसं बोललो नाही, तरी आम्हाला ठाऊक होतं, की त्या बाहुल्याही बहिणी-बहिणीच होत्या.

माझा विवाह आधी झाला. मी माझ्या वाङ्निश्चयाबद्दल सर्वात आधी तिला सांगितलं. ती माझी ‘मेड ऑफ ऑनर’ - करवली - होती. तिनंदेखील लग्नाचं वचन दिल्यावर सर्वप्रथम मलाच सांगितलं. मीदेखील तिची ‘मेड ऑफ ऑनर’ करवली - होते. आम्हाला प्रश्न पडला होता, की मला ‘मेड ऑफ ऑनर’ न म्हणता ‘मेट्रन ऑफ ऑनर’ म्हणायला हवं का? पण आम्ही तो बेत रद्द केला. आमच्या समजुतीनं ‘मेट्रन’ म्हणजे म्हाताNया, जाडजूड, तिशीपुढच्या ध्Eिाया असतात. आम्ही बहिणी यापैकी काहीच नव्हतो. मला दिवस गेल्यावर डायानाला मी ते सर्वात आधी सांगितलं. ‘आधी मला सांगायचं’ यासारखे बहिणींचे नियम कधीच बदलत नाहीत. ती माझ्या मुलांचे फोटो तिच्या पाकिटात ठेवते आणि जो कुणी बघायला तयार असेल, त्याला दाखवते.

ती म्हणते, ‘‘माझे छोटे भाचे बघायचेत?’’ ते छोटे मुलगे सतरा आणि चौदा वर्षांचे आहेत. तिला तिची स्वत:ची मुलं नाहीत, म्हणून ती बहिणीचीच मुलं आपली मानते. माझ्या विवाहानंतर मी दूर राहायला गेले. आता आम्ही एकमेकींना वर्षातून काही वेळाच भेटतो. आम्ही अजून आमची गुपितं, भीती आणि स्वप्नं एकमेकींना
सांगतो; पण आता त्यात आमच्या आठवणी, आमचा भूतकाळ आणि आमच्या वेदनांची भर पडली आहे. आम्ही एकमेकींना टोपणनावानं हाका मारतो. आम्ही कधीही आमची खरी नावं वापरल्याचं मला आठवत नाही. ती आहे ‘गून’ आणि मी आहे ‘हूट’.

आमचे नवरे एकमेकांना त्यांच्या खNया नावांनी नेहमी हाका मारतात. आमच्या डोक्यात अजिबात अक्कल नाही, अशा मुद्रेनं ते आमच्याकडे बघतात. विशेषत: माझ्या नवNयाचा या अपमानास्पद टोपण नावांमुळे गोंधळ उडतो; पण ते अपेक्षितच आहे. कारण त्याला बहीणच नाही.

तिचा नवरा मात्र वाटेतून बाजूला सरतो. आमच्या भेटल्यावरच्या मिठ्या आणि दूर जातानाचे अश्रू यांचा त्याला अर्थच कळत नाही. फक्त डोळ्यांनी बोलली जाणारी आमची भाषाही त्याला समजत नाही. एका कटाक्षानं, एका खुणेनं विंâवा गूढ शांततेनं व्यक्त होणारे प्रचंड अर्थ त्याला उमगत नाहीत; पण मला आश्चर्य
वाटत नाही. कारण तो काही बहीण नाहीय. 

आम्ही एकमेकींना आठवड्यातून तीन ते चार वेळा फोन करतो; पण आम्ही फार वेळा बोलत नाही कारण दुसरी घरी नसेल तेव्हाच फोन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही सांकेतिक वाटतील असे निरोप ठेवतो. हे खरंच, आम्हाला खूप बोलायचं नसतं. आम्हाला फक्त एकमेकींशी संपर्वâ साधून एकमेकींची आठवण येतेय एवढंच सांगायचं असतं. मी जर तुम्हाला म्हणाले, केव्हा फोनवरला निरोपाचा दिवा माझ्या बहिणीचा आहे, हे मी ओळखू शकते, तर तुम्हाला वाटेल माझं डोवंâ ठिकाणावर नाही; पण तुम्हाला बहीण असली तर तुम्ही समजू शकाल. आम्ही एकत्र प्रवास करायचा प्रयत्न करतो. अधूनमधून फक्त आम्ही दोघीच! 

संभाषणाला स्पष्टीकरणाची गरज लागत नाही, अशा संभाषणातून मिळणाNया विसाव्याची आम्हाला गरज भासते. त्यातील सुखद निश्चिती विवाहातील नात्याहूनही अधिक गाढ असते. ती माझं उजवं अंग आहे. मी तिचं डावं. मला वाटतं, तुम्हाला बहीण असेल, तर मी काय म्हणतेय ते तुम्हाला कळेल. आता तुम्ही मला जायची परवानगी द्या, कारण मला फोन ऐवूâ येतोय. मी खात्रीनं सांगतेय, तो कुणाचा आहे ते मी ओळखलं आहे! 

– अ‍ॅन मरी रोलंड

Thursday 7 August 2014

द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

शनिवारी सकाळी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरसमोर बसता आणि एक अशी ई-मेल येऊन पडलेली असते... असं रोज-रोज घडत नसतं.

From : Ahd_businessman@gmail.com
Sent : 12/28/2005 11.40 p.m.
To : info@chetanbhagat.com

Subject : A final note

प्रिय चेतन,

ही ई-मेल म्हणजे माझं आत्महत्येपूर्वीचं अखेरचं पत्र आणि चुकांची कबुली असं दोन्हीही आहे. मी लोकांना निराश केलं आहे. मला जगायला काही कारणच नाहीये. तुम्ही मला ओळखत नाही. मी अहमदाबादमधला
एक सामान्य मुलगा आहे. मी तुमची पुस्तवंâ वाचतो. का कोण जाणे, पण तुमची पुस्तवंâ वाचल्यानंतर तुम्हाला लिहावं असं वाटलं. मी काय करतोय... मी प्रत्येक वाक्याच्या अखेरीस एक एक झोपेची गोळी घेतोय... ते मी कुणालाही सांगू शकत नाही – म्हणून मनात आलं, की हे तुम्हाला सांगावं.

मी कॉफीचा कप खाली ठेवून ओळी मोजल्या. एव्हाना पाच पूर्णविराम येऊन गेले होते मी तीन चुका केल्या आहेत; मला त्या तपशिलात शिरायचं नाही. माझी आत्महत्या हा भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय नाही. माझ्या आजूबाजूच्या बNयाच लोकांना मी चांगला बिझनेसमन म्हणून परिचित आहे. मी चांगला बिझनेसमन आहे, कारण माझ्यापाशी भावनेबिवनेला फारसा थारा नसतो. मला सणक आली आणि मी हा निर्णय घेतला अशातला भाग नाही. मी तीन वर्षं वाट पाहिली. मी दररोज ईशचा मूक चेहरा पाहत होतो. पण काल त्यानं माझा प्रस्ताव धुडकावल्यानंतर माझ्यापाशी कुठला पर्यायच उरला नाही. 

मला अजिबात खेद नाही. विद्याशी आणखी एकदा बोलावं असं मनात येतंय... पण आत्ता ते योग्य होणार नाही. तुम्हाला ही सगळी तसदी दिल्याबद्दल क्षमस्व! पण मला हे कुणालातरी सांगावं असं वाटलं. लेखक म्हणून तुम्हाला सुधारणेला वाव आहे. तुम्ही छान पुस्तवंâ लिहीत राहा. हॅव अ नाईस वीकेन्ड.

रिगार्ड्स
बिझनेसमन

१७, १८, १९. अहमदाबादमधल्या एका तरुण ‘सामान्य’ मुलानं मला मेल पाठवता पाठवता झोपेच्या १९ गोळ्या गट्टम केल्या होत्या आणि तरीही त्याचीमी वीकेन्ड मजेत साजरा करावा अशी अपेक्षा होती. कॉफीचा घोटमाझ्या घशाखाली उतरेना. मी अक्षरश: शहारलो होतो.

‘‘एक तर तू उशिरा उठ आणि मग उठल्या उठल्या पहिल्यांदा कॉम्प्युटरसमोर मांडी ठोवूâन बस. आपल्याला घरदार, बायकापोरं आहेत हे तरी लक्षात आहे का तुझ्या?’’ अनुशा म्हणाली. या वाक्यातल्या अधिकारयुक्त स्वरावरून लक्षात आलं नसेल तर सांगतो, अनुशा माझी बायको आहे. मी तिच्यासोबत फर्निचर खरेदीला जायचं कबूल केलं होतं. ...दहा आठवड्यांपूर्वी! तिनं माझा कॉफीचा मग उचलून ठेवला आणि माझ्या खुर्चीची पाठ हलवत ती म्हणाली, ‘‘आपल्याला डायनिंग चेअर्स घ्यायच्या आहेत. ए.... काय झालं? तू काळजीत दिसतोयस?’’ तिनं विचारलं. ‘‘बिझनेसमन?’’ तिनं मेल वाचल्याबरोबर प्रश्न केला. तीसुद्धा चांगलीच
हादरलेली दिसत होती.

‘‘आणि ही मेल अहमदाबादहून आली आहे.’’ मी म्हणालो, ‘‘एवढंच काय ते आपल्याला ठाऊक आहे.’’

‘‘हे खरं असेल असं वाटतंय?’’ तिनं विचारलं. तिचा आवाज कापत होता.
‘‘ही ‘स्पॅम’ नाही.’’ मी म्हणालो, ‘‘ती मला उद्देशून आहे.’’

माझी बायको स्टूल ओढून त्यावर बसली. मला वाटलं आम्हाला आणखी काही खुच्र्यांची खरंच गरज होती.
‘‘विचार कर.’’ ती म्हणाली, ‘‘आपण हे कुणालातरी कळवायलाच हवं. त्याच्या आईवडिलांना तरी.’’
‘‘पण कसं? मला तर ही मेल कुठून आली हेसुद्धा माहीत नाहीये.’’ मी म्हणालो. ‘‘आणि अहमदाबादमध्ये आपल्या ओळखीचं कोण आहे?’’ 

‘‘आपण अहमदाबादमध्येच भेटलो होतो, आठवतंय?’’ अनुशा म्हणाली. माझ्या मनात आलं, किती अर्थशून्य विधान आहे हे! होय, बNयाच वर्षांपूर्वी आम्ही घ्घ्श्-A मध्ये एका वर्गात होतो. ‘‘मग?’’ ‘‘इन्स्टिट्यूटमध्ये फोन कर. प्रोपेâसर बसंतना विंâवा आणखी कुणालातरी.’’ ती नाकानं चाहूल घेत आत गेली. ‘‘आई ग, डाळ जळली वाटतं.’’ बायको आपल्यापेक्षा हुशार असण्याचे फायदे असतात. मला ‘जासूसी’ कधीच जमत नाही.

मग मी इंटरनेटवर इन्स्टिट्यूटचे नंबर शोधून फोन लावला. ऑपरेटरनी मला प्रो. बसंत यांच्या निवासस्थानी फोन जोडून दिला. मी वेळ पाहिली, सिंगापूरमध्ये सकाळचे दहा म्हणजे भारतात सकाळचे साडेसात वाजले असणार. सकाळी सकाळी प्रोपेâसर महोदयांच्या तोंडाला लागणं ही वैतागवाणी गोष्ट असते. ‘‘हॅलो?’’ फोनवर एक झोपाळू स्वर आला. प्रोपेâसर असणार. ‘‘प्रोपेâसर बसंत, हाय. मी चेतन भगत बोलतोय. तुमचा जुना
विद्यार्थी, आठवतंय?’’

‘‘कोण?’’ त्यांच्या स्वरात जराही औत्सुक्य नव्हतं.

प्रथमग्रासे....

मग मी त्यांना आठवण करून दिली... ते आम्हाला कोणता विषय शिकवायचे, आम्ही त्यांना वॅâम्पसमधील सर्वांत स्नेहशील प्रोपेâसर म्हणून निवडलं होतं... पण या खुशामतीचा फारसा काही फायदा झाला नाही.
‘‘हां हां, तो चेतन भगत होय.’’ ते म्हणाले. जणू काही त्यांना लाखो चेतन भगत माहीत असावेत.

‘‘तू आता लेखक झाला आहेस, होय ना?’’
‘‘होय सर,’’ मी म्हणालो, ‘‘तोच मी.’’
‘‘तर तू पुस्तवंâ का लिहितोयस?’’
‘‘अवघड प्रश्न आहे, सर.’’ मी वेळ मारून नेत म्हणालो.
‘‘बरं, आता सोपा प्रश्न. तू शनिवारी सकाळी इतक्या लवकर कशाला फोन केला आहेस?’’
मी त्यांना फोन करण्याचं कारण सांगितलं आणि ती ई-मेल त्यांना ‘फॉरवर्ड’ केली.
‘‘नाव नाही. अं?’’ ते मेल वाचतावाचता म्हणाले.
‘‘कदाचित तो अहमदाबादमधल्या एखाद्या दवाखान्यात असेल. कदाचित
नुकतंच त्याला दवाखान्यात दाखल केलं असेल. कदाचित तो गेलाही असेल विंâवा तो घरीच असेल आणि हा सगळा थट्टेचा प्रकार असेल.’’ मी म्हणालो. मी फारच बडबडत होतो. मला मदतीचा हात हवा होता – त्या मुलासाठी आणि माझ्यासाठीही. प्रोपेâसरनी फार चांगला प्रश्न विचारला होता. मी पुस्तवंâ कशासाठी लिहितो – या असल्या भानगडीत अडकण्यासाठी? ‘‘आपण दवाखान्यात जाऊन पाहू शकतो.’’ प्रोपेâसर म्हणाले, ‘‘मी काही विद्याथ्र्यांना सांगतो. पण या नावाचा नक्की उपयोग होईल. अरे, थांब, या मुलाचं जी-मेल अकाऊंट आहे, कदाचित तो ऑर्वुâटवर सापडेल.’’ 

‘‘काय... ऑर... काय?’’ आपल्यापेक्षा हुशार लोकांशी बोलताना जीवन नेहमी कठीणच वाटतं.

‘‘चेतन, तू अगदीच ‘आऊट ऑफ टच’ आहेस. ऑर्वुâट ही नेटवर्विंâग साईट आहे. जी-मेल वापरणारे तिथं ‘साईन-अप’ करतात. तो जर तिथला सदस्य असेल आणि आपलं नशीब असेल तर आपल्याला त्याचा प्रोफाईल पाहता येईल.’’ 

मला त्यांच्या की-बोर्डच्या कीजचा आवाज ऐवूâ येत होता. मीही माझ्या पीसीसमोर बसलो. मी ऑर्वुâट साईटवर नुकता कुठं पोहोचलो तितक्यात प्रो. बसंत चीत्कारले, ‘‘आहा, अहमदाबाद बिझनेसमन. इथं संक्षिप्त परिचय आहे. नाव फक्त जी. पटेल असं दिलंय. बाकी इंटरेस्टचे विषय दिले आहेत. क्रिकेट, बिझनेस,
गणित आणि मित्र. हा मुलगा ऑर्वुâट फारसं वापरत नसावा.’’ 

‘‘प्रोपेâसर बसंत, हे काय सांगताय तुम्ही? आज सकाळी उठल्याउठल्या मला आत्महत्येपूर्वीचं पत्र आलंय. तेसुद्धा फक्त मला लिहिलंय आणि तुम्ही मला त्याचे छंद सांगताय. तुम्ही मला मदत करणार आहात की....’’
क्षणभर स्तब्धता पसरली.

मग ते म्हणाले, ‘‘मी काही विद्याथ्र्यांना सांगतो. आम्ही झोपेच्या गोळ्यांचा डोस जादा झाल्यामुळं दवाखान्यात नुकत्याच दाखल झालेल्या जी. पटेल नावाच्या तरुण रुग्णाचा शोध घेतो. आम्हाला काही शोध लागला तर तुला फोन करतो. ओके?’’

‘‘यस, सर.’’ मी म्हणालो. बNयाच वेळानं मी नीट श्वास घेतला.
‘‘आणि अनुशा कशी आहे? तुम्ही दोघं ‘डेट्स’साठी माझे क्लास बुडवायचात आणि आता मला विसरलात.’’
‘‘ती मजेत आहे. सर.’’
‘‘गुड. ती तुझ्यापेक्षा हुशार आहे असं मला नेहमी वाटायचं. एनी वे, आपण तुझ्या या मुलाला शोधून काढूया.’’ असं म्हणून प्रोपेâसरनी फोन ठेवला. मला र्फिनचर खरेदीला जायचं होतं. शिवाय ऑफिस प्रेझेंटेशनचं कामही
हातावेगळं करायचं होतं. माझ्या बॉसचा – मायकेलचा – बॉस न्यूयॉर्वâहून येणार होता. त्याच्यावर छाप पाडण्यासाठी मायकेलनं मला ग्रुपचं प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं होतं. त्यासाठी पन्नास चाटर््स करायचे होते. आदल्याच आठवड्यात सलग तीन रात्री मी एक-एक वाजेपर्यंत जागून काम केलं होतं, तरी अजून कुठं ते अध्र्यावर होतं.

‘‘मी एक सुचवते, ते वाईट अर्थानं घेऊ नकोस. पण अंघोळ करायचा विचार कर.’’ माझी बायको म्हणाली.
मी तिच्याकडं पाहिलं. 

‘‘फक्त एक पर्याय सुचवतेय.’’ ती म्हणाली.
ती कधीकधी अतिजागरूकपणे वागत असते. मी प्रतिवार केला नाही. ‘‘हो, हो, करतो.’’ असं म्हणून मी पुन्हा कॉम्प्युटर सुरू केला. माझ्या डोक्यात विचारांचा गदारोळ माजला होता. आपण स्वत:च काही दवाखान्यांत फोन करावा का? प्रोपेâसर बसंतना पुन्हा डुलकी लागली असली तर? त्यांना या मोहिमेसाठी विद्याथ्र्यांना गोळा करणं जमलंच नाही तर? जी. पटेलचा मृत्यू झाला असला तर? आणि मी या सगळ्यात इतका
का गुंतत चाललोय? मी नाखुशीनं अंघोळ केली. ऑफिस प्रेझेंटेशन उघडून बसलो, पण एक
शब्दही टाईप करता येईल तर शपथ! 

मी न्याहरी नको म्हणून सांगितलं, अर्थात काही क्षणांतच मला त्याचा पश्चात्तापही झाला... कारण भूक आणि चिंता हातात हात घालून गुण्यागोंविदानं एकत्र नांदू शकत नाहीत.

दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी माझा फोन वाजला. ‘‘सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे गोविंद पटेल. पंचवीस वर्षांचा आहे. दुसNया वर्षातल्या माझ्या एका विद्याथ्र्यानं त्याला शोधून काढलं.’’ 
‘‘आणि?’’
‘‘आणि तो जिवंत आहे, पण बोलत नाहीये. त्याच्या घरच्यांशीसुद्धा नाही. तो अजून धक्क्यातून सावरलेला नसणार.’’ ‘‘डॉक्टर काय म्हणतायत?’’ मी विचारलं. ‘‘काही नाही. तो सरकारी दवाखाना आहे. तुझी काय अपेक्षा आहे? एनी वे, ते त्याचं पोट धुऊन काढतील आणि त्याला घरी पाठवतील. आता जास्ता fचंता करू नकोस. मी माझ्या विद्याथ्र्याला संध्याकाळी पुन्हा तिकडं जाऊन यायला सांगेन.’’ 

‘‘पण तो कोण आहे? त्याच्याबाबतीत काय घडलंय?’’
‘‘ते सगळं मला माहीत नाही. हे बघ, जास्त गुंतू नकोस. भारत हा खूप मोठा देश आहे. अशा गोष्टी सतत घडत असतात. तू जितक्या जास्त खोदून चौकश्या करशील तितकी तुला पोलिसांकडून त्रास होण्याची शक्यता वाढेल.’’

मग मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फोन लावला. तिथल्या ऑपरेटरला या ‘केस’बद्दल काहीच माहिती नव्हती. आणि तिथं वॉर्डमध्ये फोन ‘ट्रान्स्फर’ करण्याची सुविधाही नव्हती.

तो मुलगा जिवंत आहे हे कळल्यावर अनुशानंही सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर तिनं त्या दिवसाचा बेत जाहीर केला – डायनिंग चेअर हंट. या मोहिमेची सुरुवात अलेक्झांड्रा रोडवरील ‘आयकिया’पासून होणार होती.
आम्ही दुपारी तीनच्या सुमारास ‘आयकिया’त पोहोचलो आणि जागेची बचत करणारे डायनिंग सेट्स पाहू लागलो. एक डायनिंग टेबल पाहिलं, त्याची चौघडी करून कॉफी टेबलही बनवता येत होतं. ...अगदी छान वाटलं. 
‘‘त्या पंचविशीतल्या बिझनेसमनच्या बाबतीत काय घडलं असेल ते मला जाणून घ्यायचं आहे.’’ मी हळू आवाजात म्हणालो. ‘‘ते तू शोधून काढशीलच. आधी त्याला बरं होऊ दे. तरुण पोरांच्या बाबतीत जी वेडपट कारणं असतात, त्यातलंच एखादं कारण असणार... प्रेमभंग, माक्र्स कमी विंâवा अमली पदार्थ.’’
मी गप्प राहिलो. 

‘‘कमॉन, त्यानं तुला ई-मेल केलीय. तुझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुझा आयडी आहे. तुला यात इतवंâ गुंतायची काही गरज नाहीये. आपण सहा घेऊ या की आठ?’’ ती ओक-वुड सेटकडं वळली होती. ‘‘आपल्याकडं खूप पाहुणे आलेत असं क्वचितच घडतं.’’ असं म्हणून मी माझा निषेध नोंदवला. आम्हाला सहा खुच्र्या पुरेशा होत्या. 
‘‘आणखी दोन खुच्र्यांच्या वापराची शक्यता दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे.’’ मी म्हणालो.
‘‘तुम्ही पुरुष काही कामाचे नसता.’’ तिनं परतपेâड केली आणि सहा खुच्र्या निवडल्या. माझं मन त्या ‘बिझनेसमन’भोवती घोटाळत होतं. होय, सगळेच बरोबर सांगतायत. मी यात गुंतता कामा नये. पण... पण या जगातल्या इतक्या सगळ्या माणसांमध्ये या मुलानं त्याचे अखेरचे शब्द फक्त मलाच पाठवले होते. मग मी कसं नाही गुंतायचं.... 

आम्ही ‘आयकिया’शेजारच्या ‘पूâड कोर्ट’मध्ये जेवायला गेलो. ‘‘मला जावं लागेल.’’ मी लेमन राईस चिवडत बायकोला म्हणालो. ‘‘कुठं? ऑफिसमध्ये. ओके. आता तू मोकळा आहेस. माझी खरेदी आटोपलीय.’’ बायको म्हणाली. ‘‘नाही, मला अहमदाबादला जायचंय. मला गोिंवद पटेलला भेटायचंय.’’ मी तिच्या नजरेला नजर न देता म्हणालो. माझं वागणं बहुतेक वेडपटासारखं होत असावं. ‘‘वेड लागलंय का तुला?’’ मला वाटतं, भारतीय बायकांनी आपल्या नवNयांना खाडकन फटकारण्याची प्रथा माझ्याच पिढीत सुरू झालीय. ‘‘माझं मन सारखं तिथंच घोटाळतंय.’’ मी म्हणालो. ‘‘तुझ्या प्रेझेंटेशनचं काय? मायकेल तुला ठार मारेल.’’ ‘‘मला माहीत आहे. त्यानं त्याच्या बॉसवर छाप पाडल्याखेरीज त्याला बढती मिळणार नाही.’’ माझ्या बायकोनं माझ्याकडं पाहिलं. माझा चेहराच काय ते बोलत होता. त्या मुलाला भेटल्याखेरीज मी माणसात येणार नाही हे तिनं ओळखलं होतं.

‘‘वेल, आज संध्याकाळी सहा वाजता एकमात्र थेट विमान आहे. तू तिकीट मिळतंय का बघ.’’ तिनं सिंगापूर एअरलाईन्सचा नंबर लावून माझ्याकडे दिला. मी परिचारिकेनं दाखवलेल्या खोलीत प्रवेश केला. तिथल्या गूढ शांततेत व काळ्याकुट्ट अंधारात माझ्या पावलांचा आवाज जास्तच मोठा भासत होता. निरनिराळ्या प्रकारची दहा उपकरणं पिक-पिक करत होती आणि ठरावीक वेळानं थ्ED चे दिवे लुकलुकत होते. त्या उपकरणांपासून निघालेल्या नळ्या ज्या माणसाच्या देहाशी येऊन लुप्त होत होत्या, त्या माणसाला पाहायला मी हजारो मैल पार करून इथं आलो होतो. त्या माणसाचं नाव होतं – गोविंद पटेल. माझ्या सर्वप्रथम लक्षात आले ते त्याचे कुरळे केस. त्याचा वर्ण सावळा होता. भुवया दाट व जाड होत्या. त्याचे पातळसे ओठ औषधांमुळे कोरडे पडले होते.
‘‘हाय, चेतन भगत... तू ज्याला लिहिलं होतंस तो लेखक.’’ मी म्हणालो, पण त्यानं मला ओळखलं होतं की नाही कोण जाणे! ‘‘ओ... पण तुम्ही... मला कसं काय शोधलंत?’’ तो कष्टानं शब्द उच्चारत होता. ‘‘मला वाटतं ते विधिलिखित असावं.’’ मी म्हणालो. मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्या शेजारी बसलो. तितक्यात त्याची आई खोलीत आली. तिला झोपेची इतकी प्रचंड गरज आहे असं दिसत होतं, की तिनंच झोपेची गोळी घेतली तर बरं असं वाटत होतं. मी तिला ‘नमस्ते’ केलं. त्यानंतर ती चहा आणायला बाहेर गेली.
मग मी त्या मुलाकडं वळलो. त्या क्षणी माझ्या मनात दोन अत्यंत निकडीच्या भावना होत्या – एक, त्याच्याकडून काय झालं ते जाणून घेणं आणि दुसरी, त्याच्या मुस्कटात लावणं.

‘‘माझ्याकडं असं पाहू नका.’’ तो बिछान्यात जरासा सरकत म्हणाला. ‘‘तुम्हाला राग आला असेल. माफ करा, मी तुम्हाला मेल करायला नको होती.’’ ‘‘मेलचं जाऊ दे. तू जे केलं आहेस ते करायला नको होतंस.’’ त्यानं उसासा सोडला. त्यानंतर त्यानं माझ्याकडं एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि मग नजर बाजूला वळवत तो म्हणाला, ‘‘मला अजिबात खेद नाही.’’ ‘‘गप्प बस. यात वीरश्रीयुक्त काहीही नाही. भेकड माणसं अशी गपागप
गोळ्या गिळतात.’’ ‘‘तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही हेच केलं असतं.’’ ‘‘का? काय झालं तुला?’’
‘‘त्यानं काहीही फरक पडत नाही.’’ काही वेळ आम्ही गप्प राहिलो. तितक्यात त्याची आई चहा घेऊन आली. तेवढ्यात परिचारिकाही खोलीत आली. तिनं त्याच्या आईला घरी जायला सांगितलं, पण त्याची आई तिथून हलायला तयार नव्हती. अखेर, डॉक्टरांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. अखेर रात्री साडेअकरा वाजता त्याची आई तिथून बाहेर पडली. मीही डॉक्टरना तिथून लगेचच बाहेर पडण्याचं कबूल केलं. आता खोलीत आम्ही दोघंच होतो. ‘‘तर मग... आता मला तुझी कहाणी सांग.’’ मी म्हणालो. ‘‘का? तुम्ही काय करणार आहात? जे काही घडलं ते तर तुम्ही बदलू शकत नाही.’’ तो वैतागलेपणानं म्हणाला. ‘‘आपण दुसNयाचं बोलणं ऐकतो ते काही भूतकाळ बदलण्यासाठी नाही. कधीकधी काय घडलं ते जाणून घेणंही महत्त्वाचं असतं.’’ ‘‘मी बिझनेसमन आहे. माझ्या नजरेतून म्हणाल तर लोक जे काही करतात ते फक्त स्वहितासाठी. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? आणि मी तुम्हाला काही सांगण्यात माझा वेळ का पुâकट दवडावा?’’ मृदू-मुलायम त्वचेच्या चेहNयाआडची ती करकरीत धार मी पाहतच राहिलो. ‘‘कारण, मला ते इतरांना सांगावंसं वाटेल.’’ मी म्हणालो. तोच माझा लाभांश होता.

‘‘आणि इतरांना काय गरज पडलीय? माझी कहाणी काही आयआयटी आणि कॉल सेंटर्समधल्यासारखी नव्या पॅâशनची विंâवा सेक्सी नाही. त्यानं अंगावरची गोधडी दूर केली. हिटर व आमचं संभाषण खोलीत ऊब
पसरवत होतं.
‘‘मला वाटतं... स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करणाNया एका तरुणाची कहाणी ते नक्की जाणून घेतील. हे कृत्य बरोबर नाहीच.’’ ‘‘कुणी काळं कुत्रंसुद्धा ढुंवूâन बघणार नाही.’ मी प्रयत्न केला, पण संयम राखणं कठीण होत होतं. त्याला मुस्कटात लावण्याचा विचार मनात पुन्हा डोवंâ वर काढत होता.

‘‘हे बघ,’’ मी दवाखान्यात जितक्या मोठ्यानं बोलणं शक्य होतं तितकी आवाजाची पट्टी चढवत म्हणालो, ‘‘तू तुझी अखेरची मेल मला पाठवलीस. म्हणजे कुठंतरी एका विशिष्ट स्तरावर तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास. तुझी मेल मिळाल्यापासून काही तासांत मी तुला शोधून काढलं आणि विमान पकडून थेट इथं धावत आलोय. तरी तू ‘मला काय पर्वा आहे’ असं विचारतोस? आणि आत्ताचा तुझा हा उद्दाम उर्मटपणा तुझ्या बिझनेसचाच भाग म्हणायचा का? तू माझ्याशी मित्राच्या नात्यानं बोलू शकत नाहीस? तुला ‘मित्र’ म्हणजे काय, ते तरी माहीत आहे का?’’

माझा चढलेला आवाज ऐवूâन परिचारिका खोलीत डोकावली. आम्ही गप्प झालो. रात्रीचे बारा वाजले होते.
तो सुन्नपणे बसला होता. आज दिवसभर सगळेजण त्याच्याशी छानच वाग होते. मी उठलो आणि तिथून निघालो. ‘‘मित्र म्हणजे काय ते मला माहीत आहे.’’ अखेर त्याच्या तोंडून शब्द आले. मी त्याच्या शेजारी बसलो. ‘‘मित्र म्हणजे काय ते मला नक्कीच माहीत आहे, कारण मला दोन मित्र होते. जगातले सर्वाेत्तम मित्र.’’ 

Tuesday 5 August 2014

केवळ मैत्रीसाठी...

प्रसंगी अखंडित खात जावे!

``जेव्हा पाहाल तेव्हा इथली उपाहारगृहं खचाखच भरलेली असतात! तसेच लोकही तळलेल्या व इतर तेलकट पदार्थांवर यथेच्छ ताव मारताना दिसतात!'' 

मलेशियात माझी नेमणूक झाल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती. ती मी माझा मलेशियन शीख मित्र सुखदेव िंसग याच्याशी एकदा गप्पा मारत असताना त्याला बोलून दाखवली.

``उमेश, `खाणे' हा मलेशियन लोकांचा राष्ट्रीय छंद आहे!'' हसत हसत सुखदेव म्हणाला.

मलेशियात जेवणाचे वैविध्य कसे, याचा उलगडा व्हायला वेळ लागला नाही. तेथील जवळ जवळ साठ टक्के लोक मलय वंशाचे मुसलमान, तीस टक्के मूळचे चिनी वंशाचे व उर्वरित भारतीय वंशाचे. त्या भारतीयांचे पूर्वज ब्रिटिशांच्या काळात स्थलांतरित झालेले. त्यावेळी प्रामुख्याने रबराच्या झाडांच्या लागवडी व ऊसमळे
याठिकाणी काम करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना तिकडे नेलेले. त्यांच्या पुढच्या पिढीतले बरेचसे लोक शिवूâन सवरून चांगल्या नोकNया िंकवा व्यवसाय करीत. ते मलेशियन नागरिक असले तरी त्यांनी भारतीय संस्कृती जतन करून ठेवली आहे. 

तीन प्रमुख वंशांच्या लोकांच्या गरजा पुरविण्यासाठी मलय, चिनी व भारतीय उपाहारगृहे मोठ्या प्रमाणावर उघडली गेली. शिवाय प्रवाशांना आर्किषत करण्यासाठी थाई, ाqव्हएतनामी, जपानी, इंडोनेशियन, कोरियन, युरोपियन व अरबी उपाहारगृहांचीही त्यात भर पडलेली. त्यापैकी काही २४ तास उघडी असतात. त्यातल्या त्यात मलय वंशाच्या लोकांना खाण्याचा मोठा शौक. सकाळी नाश्त्यासाठी `नासी लेमाक आयाम' म्हणजे भात व तेलातली चिकन करी, तोंडी लावायला तळलेले छोटे सुके मासे व तळलेले शेंगदाणे हे अतिशय लोकप्रिय. मलेशियातच चिकन डोसा, बीफ डोसा, फिशकरी डोसा असे पदार्थ पाहायला मिळाले. अलीकडचीच गोष्ट. मी कार्यालयात एक रिपोर्ट तयार करण्यात मग्न होतो.

इतक्यात आमच्या कार्यालयाची व्यवस्थापिका अ‍ॅन गोमेझ माझ्या खोलीत आली व म्हणाली, ``उमेश, आम्ही दवाखान्यात दलेनाच्या नवNयाला पाहायला निघालोय. यायचंय तुला?''

दलेना ही आमच्या कार्यालयात साहाय्यिका होती. ती छोटीशी, २५-२६ वर्षांची, नाजूक व गोरी; तर तिचा नवरा याह्या ताडासारखा उंच. ``काय झालंय त्याला?'' मी अ‍ॅनाला विचारले. ``खूप ताप आलाय म्हणे!''

``चल, मीही येतो तुमच्याबरोबर.'' आम्ही ५-६ जण पंताय हॉाqस्पटलमध्ये पोहोचलो. दलेना सिंचत मुद्रेने बसलेली. आम्ही याह्याला पाहून स्वागतकक्षात दलेना बरोबर बोलत बसलो.

``नेमवंâ काय झालं आहे डॉक्टरांच्या मते?'' मी तिला विचारले. ``ड्युरियनचा प्रताप!'' दलेना म्हणाली.
``म्हणजे काय?'' मला काहीच उलगडा होईना. 

``परवा गावाहून एक मित्र ड्युरियन घेऊन आला. याह्याने त्यांचा फडशा पाडला. ड्युरियनमध्ये उष्णता खूप. त्याची प्रतिक्रिया होऊन त्याचा ताप १०४ वर गेला. मी घाबरून गेले व सरळ इकडे आणलं.'' दलेना म्हणाली.

ड्युरियन हे उग्र वासाचे, फणसाच्या जातीचे फळ मी बाजारात पाहिले होते. पण एखादे फळ खाऊन दवाखान्यात दाखल व्हायची पाळी यावी हे मला नवीनच होते. नंतर मला कळले की त्यात एल.डी.एल. कोलेस्टेरॉलही खूप मोठ्या प्रमाणात असते व हे सर्वज्ञात असले तरी ते खायचा मोह लोक आवरू शकत नाहीत!

एकदा मला पूर्व मलेशियाच्या बोर्नीओ बेटावरील सारावाक प्रांतात बतांग-आय या छोट्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग आला. ते ठिकाण सारावाकची राजधानी कुिंचग येथून अडीचशे किलोमीटर अंतरावर होते. ते एका प्रचंड धरणाच्या काठावर वसलेले. तेथे जाण्याचा जवळजवळ संपूर्ण रस्ता घनदाट जंगलातून होता. माझ्या सोबत मलेशियन रेड व्रेâसेंट सोसायटीचे (रेड क्रॉस सारखीच, पण चिन्ह वेगळे) कुिंचग कार्यालयातील जॉन लाम व यो लिआँग हे दोन चिनी वंशाचे अधिकारी व माझ्याबरोबर कुआलालंपूर येथील त्या सोसायटीच्या मुख्य कार्यालयातून आलेले निवृत्त कर्नल हसन होते. आम्ही सर्वजण एका जीपने तिकडे जायला निघालो.
वाटेमध्ये जंगली ड्युरियन विकणारी आदिवासी मुले दिसली. त्यांच्याकडे पाहत जॉनने मला विचारले, ``उमेश, तू ड्युरियन खातोस ना?'' 

``नाही जॉन, मी अजून त्याची चव चाखलेली नाही.'' मी म्हणालो. 

``चल, आपण ड्युरियन घेऊया. एकदा चाखून तरी पाहा! कदाचित आवडलं तर कुआलालंपूर इथेही तुला मिळतील.'' जॉन म्हणाला. त्याचे मन न मोडण्यासाठी मी प्रसंगी अखंडित खात जावे! म्हणालो, ``ठीक आहे, पाहूया खाऊन.''

त्या मुलांकडून जॉनने चांगले पाच-सहा ड्युरियन विकत घेतले. जंगली ड्युरियन खूपच चविष्ट असतात असेही तो म्हणाला. ड्युरियन पाहून कर्नल हसन खूप खुष झाले होते. आम्ही गेस्ट हाउसवर पोहोचल्यावर कधी एकदा ड्युरियन खातो असे त्यांना झाले होते. जॉनने जाड काटेरी साल कापून आतील पिवळसर लुसलुशीत फणसासारखा एक गरा मला खायला दिला. तो खूप गोड होता पण त्याचा वास फार उग्र वाटला. तिकडे कर्नल हसननी जवळ जवळ अर्धा किलो ड्युरियन गरे खाल्ले. त्या जंगलात जवळपास वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती त्यामुळे मला त्यांची काळजी वाटली. पण सुदैवाने त्यांना काही त्रास झाला नाही. मी मात्र फक्त एकाच गNयावर थांबलो.

बतांग-आय येथील कार्यशाळेत जेवणाच्या वेळी आम्ही एकत्रच असू. बुपेâ पद्धतीचे आयोजन असायचे. त्यावेळी लक्षात आले की कर्नल हसन खाण्याचे भोत्तेâ आहेत! त्यांच्या प्लेटमध्ये पदार्थांची रेलचेल झालेली असायची. तेथून तिसNया दिवशी आम्ही पुन्हा कुिंचगला जायला निघालो. वाटेत एका खेड्याजवळ खूप लोक
रांगेमध्ये उभे असलेले दिसले. मी तिकडे कुतूहलाने पाहत होतो. तेव्हा कर्नल हसत म्हणाले, ``ओपन हाउस दिसतेय!''

``ते काय असतं?'' मला `ओपन हाउस' हा प्रकार माहीत नव्हता.

``ओपन हाउस म्हणजे कोणीही जेवायला जावं. काहीतरी निमित्ताने भोजन समारंभ आयोजित करायचा व तो सर्वांसाठी खुला ठेवायचा.'' जवळजवळ गावजेवणासारखेच. मी विचार केला की किती मोठ्या प्रमाणावर अशा प्रसंगी जेवण करावे लागत असावे. 

``रमझान ईद झाल्यानंतर मलेशियात जवळजवळ महिनाभर ओपन हाउस चालतात.'' कर्नल हसन उत्साहाने म्हणाले. ``म्हणजे एक महिनाभर फािंस्टग (उपास) व नंतरचा एक महिना फििंस्टग (मेजवान्या)!'' मी हसत हसत म्हणालो.

``आमच्याकडे ईदच्या दिवशी पंतप्रधान ओपन हाउस आयोजित करतात व प्रत्येक अतिथीशी हस्तांदोलन करून ईदच्या शुभेच्छाही देतात. तुम्ही सुद्धा त्याला जाऊ शकता.'' कर्नल हसननी मला सांगितले. ``त्यासाठी फक्त अडीच-तीन तास रांगेत उभे राहायची तयारी हवी!'' आमचे संभाषण ऐकत असलेले लिआँग म्हणाले.
आम्ही कुिंचगला पोहोचलो. जॉनने लिआँगना आधी त्यांच्या घरी सोडले. माझे व कर्नल हसन यांचे विमान रात्री साडेआठला सुटणार होते. आता सहा वाजत आले होते.

जॉन म्हणाला, ``चला, विमानतळाजवळ आपण जेवायला जाऊ. नंतर मी तुम्हा दोघांना विमानतळावर सोडेन.'' 

आम्ही एका चिनी उपाहारगृहात जेवायला गेलो. तिघेही व्यवाqस्थत जेवलो. सकाळचे जेवण लवकरच झाले होते. त्यामुळे तशी बNयापैकी भूक लागलेली. जेवण झाल्यावर जॉन आम्हाला सात वाजता विमानतळावर सोडून गेला. विमानतळावर समजले की आमचे विमान साडेआठऐवजी रात्री दहाला सुटणार आहे. मी घरी फोन करून उशिरा पोहोचत असल्याचे नीलिमास सांगितले. 

विमान वंâपनीने विमानास विलंब झाल्याबद्दल आम्हास जेवणाची कुपन्स दिली. विमानतळावरील उपाहारगृहात आमची जेवणाची सोय करण्यात आली होती. पण आमचे जेवण झाल्यामुळे त्यांचा आम्हा दोघांना काही उपयोग होणार नाही असा मी विचार केला. पण साडेआठच्या सुमारास कर्नल हसन म्हणाले, ``चला काय जेवण देतात पाहूया!''

ते ऐवूâन मला आश्चर्य वाटले. त्यांना फक्त सोबत व्हावी या उद्देशाने मी त्यांच्या बरोबर उपाहारगृहात गेलो. त्यांनी दीड एक तासांपूर्वीच यथेच्छ भोजन केले होते तरी देखील पुन्हा भात, बीफ करी व काही भाज्या वाढून घेतल्या. ``तुम्ही नाही घेत काही?'' माझ्याकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले. ``नाही. तुम्ही घ्या खाऊन. मी बसेन तुमच्याशी गप्पा मारत.'' मी म्हणालो. रात्री दहा वाजता विमान सुटले. कर्नल हसन व मी शेजारी शेजारी बसलो होतो. सकाळचा प्रवास व विमान सुटण्यास झालेला विलंब यामुळे मला बसल्या बसल्या डुलक्या येत होत्या. कदाचित मला झोपही लागली असावी. रात्री पावणे अकराच्या सुमारास कर्नलनी मला हलवून जागे केले.

``उठा, जेवण द्यायला सुरुवात केली आहे!'' कर्नल म्हणाले.

``मला नको. मी जरा आराम करतो.''

हवाई सुंदरीने देऊ केलेला जेवणाचा ट्रे कर्नलनी घेतला व पुन्हा खायला सुरुवात केली. मला त्यांच्या पोटाची कमाल वाटली. मी पुन्हा झोपी गेलो. अध्र्या तासाने मला जाग आली. पाहतो तर शेजारी कर्नल नव्हते. मी इकडे-तिकडे पाहिले तर ते टॉयलेटसमोर आतील व्यक्ती बाहेर यायची वाट पाहत उभे असलेले दिसले. विमान रात्री पावणेबाराच्या सुमारास कुआलालंपूरला पोहोचले. आम्ही सामान घेऊन टॅक्सीच्या रांगेत उभे होतो. कर्नलनी मोबाईलवरून आपल्या घरी फोन लावला असावा.

``हां, फातिमा, मी आत्ताच पोहोचलो. टॅक्सी मिळेल एवढ्यात. तरी घरी यायला पाऊण तास लागेल. त्या बेताने जेवण गरम करायला घे. मी पोहोचलो, की लगेचच आपण जेवायला बसू...!''

Monday 4 August 2014

How Jess and Casey became friends

Excerpts from the book "TRUE BLUE" By Deborah Ellis 

To those who have the courage to be friends

I’m in grade three the first time I notice Casey. It’s the end of recess. The bell rings and we all line up, yelling and pushing. Except for Casey. She’s standing still, her hands cupped in front of her, holding a large green insect. 

“What’s that?” a girl asks, then screeches, “Ewww!”


A lot of girls start to shriek, the way girls do. They run around, and then the boys run, and everyone scatters across the playground. I don’t run. I just watch. Ms. Thackeray has a hard time rounding them up again.

“That thing belongs on the playground,” she snarls at Casey.

“It’s a praying mantis,” Casey says. “I found it in the bushes.”

“Then you can just put it back in the bushes.” 

“After I look at it for a while.”

Casey doesn’t ask. She just says. I’ve never heard a kid talk like that to an adult before. Not asking. Not whining. Just saying. As if what she wants is as important as what the teacher wants. Casey walks right past Ms. Thackeray and into the school. She makes it into the classroom before Ms. Thackeray catches up with her. The teacher grabs her arm and the praying mantis goes flying around the room. All the kids scream and carry on. The bug finally lands on Nathan Ivory’s desk. Nathan smashes it with a book. Casey shoves him so hard he skids across the floor, knocks his face into a bookshelf, and bloodies his nose. Casey tries to pick up the pieces of the insect. Ms. Thackeray drags her away to the principal’s office.

After that, kids start calling Casey the Praying Mantis. Casey loves it. And we become friends. She likes me because I don’t squeal like an idiot at the sight of a bug. I don’t love bugs like Casey does, but I don’t see any reason to get worked up about them. Casey doesn’t care that no one else wants to be my friend. And I like that she likes me. 

Friday 1 August 2014

आगामी पुस्तके: 'चिकन सूप फॉर द फादर्स सोल'

गवताचा गंध

माझे वडील कोण होते; हे महत्त्वाचं नाही, मला ते कोण म्हणून आठवतात, हे महत्त्वाचं !
– अ‍ॅनी सेक्स्टन
प्ला
नुकत्याच कापलेल्या हिरव्यागार पाचूसारख्या गवतावर पहुडणं, हा किती शांत-निवांत अनुभव होता! ओल्या गवताच्या गंधानं अ‍ॅम्बरला भूतकाळात बरंच मागं नेलं... ती चार वर्षांची होती, तेव्हा ती गवतावर पसरून मऊशार निळ्या आभाळाकडं टक लावून पाहायची. ती आणि तिचे डॅड ढगांचे प्राणी करत असत.

ढग हत्तीसारखे दिसतात, असं तिचे डॅड नेहमी म्हणत असत. रातकिड्यांची किरकिर कानी पडत असे... उन्हाळ्याचा स्वर. उकाड्यानं अंगाची लाही-लाही होत असली तरी मागच्या अंगणातलं थंडगार गवत अ‍ॅम्बर व तिच्या डॅडना ताजंतवानं करत असे.

बालपणातले उन्हाळ्याचे दिवस आठवताना अ‍ॅम्बरला खरबुजं, बर्फाच्या कांड्या, प्लॉस्टिक पूल्स, तुषारांची कारंजी, निळंशार आभाळ, स्वच्छ नितळ पाणी आणि हिरवं-हिरवं गवत आठवतंच.

अ‍ॅम्बर आठवणींच्या प्रदेशातून बाहेर आली आणि तिनं पुढच्या दाराचं कुलूप काढलं. कितीतरी वेळ ती त्यांच्या घराचं मागचं अंगण आणि वडिलांसमवेत घालवलेले उन्हाळ्याचे दिवस, याबद्दल विचार करत होती. अ‍ॅम्बरचे वडील २४ ऑगस्ट १९९० रोजी निवर्तले होते. त्या वेळी ती फक्त पाच वर्षांची होती. त्यांना त्या वर्षीच्या उन्हाळ्यात कर्वâरोगाचं निदान झालं होतं; पण ही गोष्ट त्यांनी अ‍ॅम्बरला कळू दिली नव्हती. त्यांचे अखेरचे काही आठवडे उरले होते. त्या काळातल्या त्यांच्या सहवासावर त्यांना दु:खाचा झाकोळ नको होता. अलीकडं तिला त्यांची फार-फार आठवण होत होती, गेल्याच मंगळवारी ते पंचेचाळीस वर्षांचे झाले असते. ते गेले तेव्हा ती खूप लहान होती, तरीसुद्धा तिला त्यांच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. त्यांचं खळखळून हसणं, तांबुस रंग, त्यांचं दिलासादायक हास्य... त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षणन्क्षण तिला अतिशय प्रिय असायचा. ती डॅडची छकुली होती.

अ‍ॅम्बरनं तिच्या आईच्या डेस्कवर साहित्य आदळलं आणि इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केली. वीस मिनिटांनी तिनं आळोखे-पिळोखे देत आजूबाजूला पाहिलं – तिला पोqन्सलला टोक करायचं गिरमीट हवं होतं. तिनं जुन्या ओकच्या डेस्कच्या प्रत्येक डॉवरमध्ये शोधलं. एका ड्रॉवरमध्ये तिला इतर वह्यांच्या गठ्ठ्यात एक जीर्ण निळी वही सापडली. त्या वहीच्या चामडी कव्हरला स्पर्श करताना तिच्या हात थरथरला. तिनं दीर्घ श्वास घेतला आणि वही उघडून काळ्या किरट्या अक्षरातील मजवूâर वाचू लागली.

जुलै २६, १९९०

मी अजूनही माझ्या इवल्याशा परीपुढं ही बातमी फोडलेली नाही. जेव्हा-जेव्हा मी तिच्या गोड डोळ्यांत पाहतो, तेव्हा ही गोष्ट सहजतेनं सांगण्यासाठी मला शब्दच मिळत नाही. मला तिची सर्वांत जास्त आठवण होईल. मला तिला मोठं होताना पाहता आलं तर... आम्हा दोघांमध्ये खूप साम्य आहे. मी परमेश्वराजवळ प्रार्थना
करतो की, तिला कायम सुदृढ आणि सुंदर ठेव. मी या जगात नसेन तेव्हा मी तिच्यावर लक्ष ठेवीनच. आमच्या अंगणात गवतावर खेळतानाचे मौजेचे क्षण मला फार-फार आठवतील. ती माझ्यासोबत खेळायला स्वर्गात येईल, त्या दिवसाची मी वाट पाहात असेन.

अ‍ॅम्बरनं वही खाली ठेवली. तिला पुढं वाचायची आवश्यकता नव्हती. ती मूकपणे अश्रू ढाळत होती... थोडं दु:खानं तर थोडं आनंदानं; पण त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे, त्या वहीतून वाळलेल्या गवताची चार इवली पाती तिच्या हातात पडली होती.

– अ‍ॅडेलैड इसॅक

Wednesday 23 July 2014

व्हर्चुअल् रिअलिटी - श्री दिगंबर वि. बेहेरे



श्री दिगंबर वी.  बेहेरे 
कॅप्टन नितीन जोशी यांच्याशी माझी ओळख एका छोटया अपघातानेच झाली. आम्ही महाबळेश्र्वरला गेलो होतो. संध्याकाळी चार साडेचारची वेळ असेल. बरोबरीचे सर्वजण मार्केट मध्ये फिरायला गेले होते. मी मात्र मागे राहुन शेवटची ही संध्याकाळ हा.टेलच्या स्वीमिंग टॅंक मध्येच काढावी म्हणुन डुंबायला उतरलो. टॅंक मध्ये त्यावेळी साधारण माझ्याच वयाचे एक गृहस्थ पोहत होते. मी हाय करून डुंबु लागलोे. थोडया वेळाने त्या गृहस्थांनी हाक मारली. “सुबोध, मी इथे आहे.” मी वळुन पाहीले. चार ते पाच वर्षाचा एक मुलगा आपल्या आजोबांना भेटण्याच्या आनंदात स्वीमिंग टॅंककडे झेपावला.त्याने सरळ पाण्यात उडी मारली ती माझ्याच अंगावर आली. मी अर्थात त्याला लगेचच खांद्यावर घेतला. आजोबाही लगेच जवळ आले. त्याला अलगत त्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि मला म्हणालेहा माझा नातु सुबोध.आपल्याला त्याची लाथ वगैरे लागली नाही ना?”  मी म्हटलेनाही हो. माझाही नातु एवढाच आहे.”  हीच आमची ओळख.

पाण्याबाहेर आल्यावर तिथेच आम्ही कॉफी घेतली. त्यावेळी आमची अधिक ओळख झाली. गप्पा मारतांना लक्षात आले कि कॅप्टन नितीन इंडियन एअर लार्इन्स मधुन निवॄत्त झाले होते.बासष्ट सालच्या युध्दानंतर एअरफोर्स मध्ये कमिशन्ड .फिसर म्हणुन त्यांची निवड झाली होती.तिथेच वैमानिक होऊन   पंधरा सोळा वर्ष त्यानी देशाची सेवा केली. दिल्ली, चंदिगड, आसाम अशा अनेक ठिकाणी त्यांनी डयुटी केली होती. निवॄत्तीनंतर त्याना इंडियन एअरलार्इन्स मध्ये कमर्शियल पायलट म्हणुन इंडक्ट करण्यात आले. शेवटी त्याही सव्र्हीस मधुन ते मुंबर्इतुन निवॄत्त झाले. त्यांचा मुलगा अशोक आयआयटीतुन बी. टेक्. झाल्यावर अमेरिकेत एमेस् करण्याकरता गेला होता. एरा.ेना.टिक्स इंजिनिअरींगमध्ये पुढे डा.क्टरेट केल्यावर तिथेच सेटल् झाला. त्याची पत्नी मानसी सातारची. तिच्याच आग्रहावरून ते सर्वजण महाबळेश्वरला आले होते.

माझाही मुलगा अमेरिकेत असतो. त्याच्या कडे दोनतीन वेळा जाणे झालेले होते. प्रत्येक वेळी  मुंबर्इला रात्रीच्या वेळेला उतरतांना मुंबर्इ तर वरून बहारदार दिसतेच पण मनात येर्इ कि एवढया अवाढव्य पसरलेल्या दिव्यांच्या पसाळयात  वैमानिकाला विमानतळ कसा शोधता येत असेल? आणि त्यातही धावपट्टी नेमकी कशी ओळखता येते? कॅप्टन नितीन यांची ओळख झाल्याने मनातल्या अशा शंकांचे आज निरसन करून घ्यावे असे मला वाटले.

कॅप्टन नितीननी सांगितलेल्या गोष्टीचा सारांश असाभारताच्या वायु हद्दीत प्रवेश करणारे प्रत्येक .ब्जेक्ट मा.निटर केले जाते. माननीय श्री अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना पाकिस्तानचे एक विमान कच्छ मध्ये आपल्या वायु हद्दीत शिरतांशिरताच कसे पाडले गेले होते याची मला त्यावेळी आठवण झाली. मुंबर्इ एअर ट्र.फिक कंट्रोलरच्या संपर्कात येताच वैमानिकांना आपले फलार्इट आयडेंटिफाय करावे लागते. उजवीकडे बसलेला सहवैमानिक (कोपायलट) हे करतो. तो Íिक्वेंसी मा.निटर करीत असतो. रेडियोवरून कंट्रोलशी संपर्क साधतो. कॉम्प्युटरचा वापर करतो, प्रवाशांना वेळोवेळी सूचना देतो वगैरे. स्वत:ला आयडेंटिफाय करून कंट्रोलला विमानाची वस्तुस्थिती, म्हणजे समद्रसपाटीपासुनची उंची आणि इतर माहिती पुरवल्यावर आपल्याला टा.वरकडुन सूचना येतात.उदाहरणार्थ, सुचना असू शकते कि उजवीकडे (किंवा डावीकडे) अमुक अमुक डिग्री वळुन अमुक अमुक फुट उंचीवर विमान उतरवा वगैर. विमान एअरपोर्ट पासुन शंभर एक  किला.मिटरच्या आसपास असतांना सर्वसाधारणपणे हा संवाद घडत असतो. एअर ट्र.फिक कंट्रोल कडील रडार  विमानतळाकडे येणा-या आणि विमान तळावरून जाणा-या विमानांकरता जहाजाच्या लार्इट हाऊसचे काम करतो. अर्थात वैमानिकाच्या चार्ट मध्ये विमान तळाचे अक्षांश रेखांशासह बरीच माहिती असतेच, शिवाय  विमानतळावर एकाच वेळी हिरव्या पांढ-या रंगाचे लार्इट, बीकन लार्इट ज्याला म्हणतात ते सारखे फल. होत असतात. ते कमर्शियल विमानतळाची खूण म्हणुन असतात. त्यामुळे विमानतळ रात्रीच्यावेळी ओळखणे सोपे जाते. शिवाय वैमानिकाचा नेहेमीचा सरावही असतोच. त्यामुळे एअर ट्र.फिक कंट्रोलशी संपर्क झाल्यानंतर साधारण अध्र्या तासात धावपट्टी मार्क करणारे पांढ-या रंगाच्या दिव्यांचे लांबचलांब पसरलेले पट्टे दिसतात. धावपट्टीच्या टोकाला  “टच् डाऊन झोनअसतो. धावपट्टीच्या अगोदरचा पाचशेफुटाचाथ्रेशोल्डसंपल्यावर धावपट्टी सुरू होते.तिथे .प्रोच लार्इटच्या हिरव्या रंगाची आडवी पट्टी दिसते. टच् डाऊन झोन मध्ये प्रत्येक पाचशे फुटावर उभे पांढरे पट्टे असतात ते तीनहजार फुटापर्यंत असतात. धावपट्टीच्या दोन्ही अंगाना पांढरे दिवे असतात. शिवाय मधली पट्टीही पांढ-या रंगात प्रकाशित ठेवलेली असते. पहिल्या तीन हजार फुटापर्यंत पांढरे दिवे, पुढील दोन हजार फुटापर्यन्ंत पांढरा लाल पांढरा असे दिवे पुढे धावपट्टी संपेपर्यन्त लाल रंगाचे दिवे ती प्रकाशीत करत असतात. “इंस्ट्रुमेंट .न्डिंग सिस्टीमच्या सहाय्याने लॅंडिंग सहज करता येते.

तुम्ही एअर फोर्सची फायटर विमाने चालवीत होतात त्यात आणि कमर्शियल एअरक्रफट चालविण्यात फरक काय ?” मी.

फायटर विमाने तशी आकाराने लहान आणि हलकी असतात. वैमानिक स्वत: सर्व गोष्टी करीत असतो. फायटर एअर क्रॅफ्ट चालवताना आणि विषेशत: शत्रुच्या विमानाचा पाठलाग करतांना तर अंगात रग असतेच पण तिथली शिस्तही वेगळी असते. कमर्शिअल एअर क्रॅफ्ट आम्ही सहज चालवु शकतो. पण ती आकाराने आणि वजनानेही मोठी असतातत्यात  कंट्रोलही जास्त असतात. म्हणुनच कॅप्टन सहवैमानिकाची योजना केलेली असते. आपल्या बरोबरच्या चारशे पांचशे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्र्न असतो. तिथे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आणि पुस्तकाबरहुकुम गोष्टी होणे महत्वाचे असते. म्हणुनच कमर्शियल पायलटचे वेगळे लायसन्सही घ्यावे लागते.

अवजड विमान चालवण्या पूर्वी प्रथम आम्हा प्रत्येकालाच फलार्इट सिम्युलेटर मध्ये सराव करावा लागतो. फलार्इट सिम्युलेटर ही  एअरक्रॅफ्टच्या कॉकपिटची जमिनीवरील सही सही नक्कल असते. आंत गेल्यावर  अजिबात सांगता येत नाही कि आपण विमानाच्या कॉकपिट मध्ये बसलो आहोत कि सिम्युलेटर मध्ये. सर्व कंट्रोल तसेच्या तसे असतात. कंट्रोल व्हील मागे खेचल्या बरोबर तुम्ही टेकआ.फ् घेता. खिडकीतुन बाहेर पाहिलेत तरी तुम्ही हवेत वर वर जात असल्याचे जाणवते. ढगातुन जातांना विमान जसे हादरते तसेच तिथेही जाणवते. थोडक्यात सर्व अनुभव तंतोतंत विमानातल्या सारखेच आसताात.” आमच्या गप्पा चांगल्याच रंगत चालल्या होत्या. पण त्यांच्या कुटुंबियांकडून सूचना मिळाल्यामुळे लवकरच आम्हाला आटोपते घ्यावे लागले.

कॅप्टन नितीन यांनी सांगितलेला फलार्इट सिम्युलेटर मधला वैमानिकाचा अनुभव मात्र माझ्या डोक्यात नंतर बराच वेळ घोळत होता.थिअेटर मध्ये सिनेमा पहाताना नाही का आपल्याला तसाच अनुभव येत. आपल्याला माहित असते कि आपल्या समोर फक्त चित्र हालत आहेत. पण तरी सुध्दा विषेशत: तो सिनेमा जर चांगला असेल तर कित्येकदा आपण स्वत:ला विसरून चित्रपटातल्या त्या पात्रांच्या सुखदु:खात एकरूप होत असतो. तिथे आपण रडतो, हसतोघाबरतोही. किती तरी वेळा दात ओठ खाऊन आणि अगदी हाताच्या मुठी आवळुन  एखाद्या पात्राचे वार्इटही चिंतितो. चित्रपट जेव्हां आपल्याला तेवढा पसंत पडत नाही तेव्हा अधुन मधुन भानावर येऊन आपण आजुबाजुला पहातो. इतर लोक  वासून तो पहात आहेत असे दॄष्य दिसते. प्रक्षेपणाच्या तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतिकारक प्रगतीने त्रिमिती सिनेमा,आयम.क्स, आयम.क्सडोम आणि त्रिमिती आयम.क्स सिनेमा प्रक्षेपणांतुन प्रेक्षकांना जबरदस्त अनुभव मिळवून देतात यात शंकाच नाही. थोडक्यात सिनेमा पाहताना कित्येकवेळा आपले बदललेले वास्तव आपण अनुभवतो.

मात्र तरीहि कोणताही चित्रपट पहात असतांना त्यामध्ये आपल्या समोर घडणा-या गोष्टीत आपला सहभाग असत नाही. आपण जे घडते त्याचे फक्त साक्षीदार असतो. चित्रपटाला एक कथा असते आणि प्रत्येक वेळी तशाच सर्व घटना त्या चित्रपटात घडत रहातात.पण फलार्इट सिम्युलेटरमध्ये तसे होत नाही.तिथे वैमानिकाने कंट्रोल व्हील मागे खेचल्या बरोबर विमान टेक . घेतल्याचे जाणवते त्याचा अनुभव मिळतो.म्हणजे त्याने निर्णय करून केलेल्या कृतीच्या परिणाम स्वरूप जणु त्याच्या ओवती भोवतीच्या वास्तविक जगातच बदल होत आहेत असे त्याला अनुभवायला मिळते.आणि वैमानिक ते बदल स्वत: कृति करून घडवून आणित असतो. यामुळेच फलार्इट सिम्युलेटरने माझी उत्सुकता वाढवली. त्याचे कारण म्हणजे वैमानिकाच्या सहभागामुळे फलार्इट सिम्युलेटर मधला अनुभव, चित्रपटगॄहातील चित्रपटा पेक्षाव्हर्चुअल रिअॅलिटीच्या जास्त जवळ जाणारा आहे.

व्हर्चुअल रिअॅलिटीम्हणजे संगणकाच्या सहाय्याने दॄकशाव्य माध्यमातुन कोणत्याही वातावरणाचा इतका हुबेहुब आभास निर्माण करायचा कि त्यात असताना जणु आपण त्या वातावरणात होणा-या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असेच तो घेणा-याला वाटावे इतका तो प्रभावी करण्याचे तंत्र असे म्हणता येर्इल. हे तंत्र करमणुक क्षेत्रात, थेरपीच्या क्षेत्रात आणि कौशल्य कमावण्याच्या किंवा वाढविण्याच्या क्षेत्रात वापरले जाते. फलार्इट सिम्यलेटर हे त्यातलेच एक उदाहरण म्हणता येर्इल. व्हर्चुअल रिअॅलिटी मध्ये आंधळी कोशिंबिर खेळताना जसे डोळयावर झापड बांधले जाते तसे एक हेल्मेट वापरले जाते. त्यामध्ये कॉम्प्युटर स्क्रीन डोळयावर असतो आणि स्टिरिओफोनिक साऊंड ऐकण्याकरता कानांवर हेडफोन असतात. आपण ज्या वातावरणात जाणार असु त्याचा संपूर्ण सीन  कॉम्प्युटरच्या स्क्रीन वर आपल्याला दिसतो. कारण संपूर्ण डाटा कॉम्प्युटरच्या सिप्यिु मध्ये ग्रथित केलेला असतो. चित्रपटा प्रमाणे येथे कथा नसते. आपण डोके फिरवुन ज्या प्रमाणे आपल्या आजुबाजुचे दॄष्य प्रत्यक्षात न्याहाळतो त्याच प्रमाणे व्हर्चुअल रिअॅलिटी मध्येही डोके फिरवना, हालचाली करताना दिसणारी दॄष्यें कॉम्प्युटर स्क्रीनवर आपण न्याहाळतो आणि आवाजही ऐकतो. उदाहरणार्थ,, आपण जर पॅरॅशुट मधुन विमानातुन उडी मारण्याचा जमिनी लगदच अनुभव घ्यायचे ठरवले  तर व्हर्चुअल रिअॅलिटी सारखे दुसरे माध्यम नाही. पॅरॅशूट मधुन उतरणा-या सैनिकाला जो अनुभव येर्इल अगदी तसाच अनुभव कोणालाही घेता येतो. विमानातुन उडी मारल्या पासुनच्या उंची पासुन जमिनीला आपले पाय टेके पर्यन्तची सर्व दॄष्ये दिसतात.उतरताना इकडे तिकडे पाहिल्यावर आकाशातील, जमिनीची आणि अगदी आपल्या शरिराच्या दॄष्य भागाची सुध्दा सर्वच्या सर्व दॄष्ये त्यांच्या अनुभवांचे परिणाम कॉम्प्युटर मध्ये ग्रथित केलेले असतात. ते आपल्याला अनुभवता येतात. ..शुट मधुन उडी मारण्याच्या अनुभवा प्रमाणे दुसराही एखादा अनुभव आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण खोल महासागराच्या तळाशी जाऊन तिथल्या विश्र्वाचा अनुभवही घेऊ शकतो. थोडक्यात व्हर्चुअल रिअॅलिटी अनुभवणारी व्यक्ति  फलार्इट सिम्युलेटर प्रमाणे स्वत: त्या घडणा-या घटनांमध्ये सहभागी होते.

आपल्याला निसर्गदत्त पाच ज्ञानेंद्रिये लाभलेली आहेत. त्वचा, ज्याने स्पर्श ज्ञान होते. नासिका, नाकाने आपण श्र्वास गंध घेतो. चक्षु, आपण सर्व जग पहातो. कर्ण, ज्याने आपण श्रवण करतो आणि जिव्हा ज्याने आपण रस आणि स्वाद घेतो. ह्मा इंद्रियां मार्फत आपण शरीरा बाहेरील  जग अनुभवतो. मात्र  व्हर्चुअल रिअॅलिटी ही यापैकी दोनच इंद्रियंाना, म्हणजे डोळे आणि कान, यांनाच फक्त बाहेरून कृत्रिम संवेदना पुरवुन आपल्या अनुभवाला येते. मग आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना बाहेरील संवेदना पोचवणारी अशी एखादीव्हर्चुअल रिअॅलिटीअसु शकेल काय कि जिच्या मध्ये आपण त्यातील पात्रांना पाहु शकु, त्यांच्याशी बोलु शकु नि ती पात्रेही आपल्याशी बोलतील ते आपण ऐकु शकु, त्यानां स्पर्श करू शकु ती ही आपल्याला स्पर्श करतील, ज्या मधे आपण खाणे खाऊ शकु  आपल्याला पोट भरलेले अनुभवता येर्इल, आपण चालु शकु, पळु शकु , खरेदी विक्री सारखे व्यवहार करू शकु वगैरे? हो. असु शकेल काय आहे. ती आपण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज अनुभवीतच जगत असतो. मात्र आपल्याला तीव्हर्चुअल रिअॅलिटीवाटत नाही तर आपले ते खरेखुरे  वास्तव असते.*या वास्तवात आपण प्रत्येक क्षणाला कोणता तरी निर्णय घेऊन हालचाली आणि कृती करतो  त्यामुळे बाहेरच्या जगात कांही तरी घडत असते. त्याचे दॄष्य परिणाम कांही वेळा आपल्याला तत्क्षणी, तर कधीं कधीं कांही वेळे नंतर पण आपल्याला अनुभवयला मिळतात. आपल्या कडुन निर्णय आणि कृती अनिच्छेने किंवा अजाणतेपणी झाली तरीही त्याच्या परिणाम स्वरूप झालेले बदलही अनुभवावे लागतात.

कोणत्याही व्यक्तिला जर त्याच्या वास्तवातील, म्हणजेच त्याच्या स्वत:च्या प्रत्यक्ष जीवनात येत असलेले, अनुभव बदलायचे असतील तर त्याने आपले निर्णय बदलुन कृती करायला हवी पॅरॅशुट मधुन उडी मारण्याचा निर्णय बदलुन आपण महासागराच्या तळाशी काय आहे ते अनुभवण्याच्या निर्णय करण्या सारखेच आहे हे. स्वत:चे वास्तव बदलु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तिने निर्णय घेऊन कृती करायची आहे म्हणजे बाहेरील जगात त्या कृतीने बदललेले वास्तव त्याला अनुभवायला मिळेल. आणि निर्णय बदलले नाहीत तर? तर काय होते *याची अनेक उदाहरणे आपण नेहेमी सर्वत्र पहात असतो. उदाहरणार्थ, आपण अनुभवतो कि चिडखोर माणसे चिडचिड करीतच राहिलेली दिसतात. भित्री माणसे घाबरलेलीच रहातात. हे सर्व कशामुळे? कित्येकवेळा त्याचे एक प्रमूख कारण त्यानी निर्णय बदलणे हे असते. अर्थात त्यांना मात्र आपण निर्णय बदलत असतो असेच नेहेमी वाटत असते असेही अनेकजणाच्या बोलण्यात आल्याचे आपण पहातो. मात्र कित्येकदा प्रत्यक्षात परिस्थिती बदलत असते आणि निर्णय मात्र बहुतांशी सवर्इनी तेच तेच असतात असेही दिसते. अर्थात चिडखोर माणसे कोणावर चिडलेली आहेत किंवा भित्री माणसे कशाला घाबरत आहेत हे महत्वाचे नाही. पण ती चिडलेली असणे किंवा घाबरलेली असणे हे महत्वाचे.चिडायचे नाही किंवा घाबरायचे नाही हा निर्णय सर्वस्वी चिडखोर व्यक्तिंनी अंर्तमुख होऊन स्वत:च्यास्वत: करायचा असतो. असा निर्णय केला कि वास्तव ही बदलते. कोणते निर्णय करीत आहोत हे निर्णय करणा-याच्या संपर्कात येणा-या इतर प्रत्येक व्यक्तिच्या त्याच्या बरोबरच्या व्यवहारा वरून, त्याच्या विषयींच्या त्यांच्या मतां वरून ठरविता येते. इतरांच्या त्या व्यक्ति विषयींच्या मतांमध्ये त्याच्या निर्णयांचे प्रतिबिंब पडलेले असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तिच्या सानिध्यात येणा-या व्यक्तिंपैकी कित्येक माणसे ही चिडचिड करणारी आहेत असे ज्यावेळी त्याच्या लक्षात येते तेव्हा आपण स्वत: तर चिडखोर नाहीना असा प्रश्र्न त्याने स्वत:ला विचारून त्याचे काय उत्तर मिळते हे पाहिले पाहिजे. आणि त्याचे उत्तर जर होकारार्थी असेल आणि आपले वास्तविक जग बदलणे आवश्यक आहे अशी त्याच्या मनाची खात्री झाल्यावर त्याने आपले निर्णय तपासुन बदलले पाहिजेत.

विषेशत: आर्थिक चणचणीमुळे गरीबीत दिवस काढीत असलेल्या कित्येक कुटुंबांची अशा प्रकारे वेळीच निर्णय घेऊन आपले वास्तव बदलण्याची क्षमता अधिकच कमकुवत झालेली असते. याचे एक कारण इच्छा असूनही कित्येकांच्या बाबतीत डोक्यात राख घालुन निर्णय घेतल्यास सर्व डावच उधळला जार्इल की काय अशी भीति असते. म्हणुन कित्येकवेळी निर्णय घेतलेच जात नाहीत. किंवा चुकीचे निर्णय घेऊन कित्येकजण कर्जबाजारी होतात किंवा व्यसनी होतात. त्यामुळे निर्णय बदलण्याची क्षमता आणखीनच क्षीण होत जाते. त्यातील कांही व्यक्ति तर आत्महत्येस प्रवॄत्त होतातकांही जणांच्या जीवनपटातील इतर पात्रेच एखाद्याला आत्महत्येस प्रवॄत्त केल्याचीही उदाहरणे क्वचित् कानांवर येतात. महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात मोठया प्रमाणावर झालेल्या आत्महत्यांच्या मागे अशीच काही कारणे असावीत.

परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा स्वयंस्फूर्तितून पण जाणीव पूर्वक कृति करून स्वत:चे  वास्तव बदलुन टाकले आहे अशी अनेक उदाहरणे आपला इतिहासात  दिसतात. कित्येक शतकां पूर्वी प्रभू श्रीरामचंद्राना दक्षिणेकडे मुलुखगिरी करणे भाग पडले होते. त्यामुळे त्यांचे बदलेले वास्तव हे रामायण आपण सर्वजण जाणतोच.समर्थ रामदासांनी तर आपले वास्तव स्वत:चे स्वत: घडवण्याचा  निर्णय  अगदी लहानपणीच घेतला होता.अगदी अलिकडील तशी उदाहरणे सांगायची म्हणजे महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत विनोबा भावे, डा..बाबासाहेब आबेडकर, स्वतंत्रता संग्रामाच्या चळवळीत स्वत:ला झोकुन दिलेले अगणित लोक, डा..बाबा आमटे, सुधीर फडके अशी कितीतरी नावें सांगता येतील

आपल्या ज्ञानेंद्रियांत कोणत्याही कारणाने जेव्हां बिघाड होतो तेव्हां आपले अनुभव विश्र्वही बदलते हे आपण जाणतोच.मुके बहिरे आणि आंधळयांचे जग वेगळे असते. आजारी पडल्यावर कितीतरी वेळा आपल्या तोंडाची चव बदलल्याचे आपण अनुभवतो. भाजल्यावर किंवा जखम झालेल्या भागात आपल्या स्पर्श ज्ञानाच्या जाणिवाही कमकुवत झालेल्या आपणाला जाणवतेज्ञान हे मेंदु मध्ये साठवले जाते प्रत्येक व्यक्ति आपआपल्या ज्ञानाचा उपयोग करीत निर्णय घेऊन कृती करीत असते. मात्र मेंदुला जेव्हा इजा होते किंवा जन्मजात त्यामध्ये जेव्हां कांही दोष असतो, तेव्हा त्या व्यक्तिचे जीवन ही सर्वसामान्यांच्या तुलनेत पूर्णपणे बदललेले असते. उदाहणार्थ, पॅरॅप्लेजिया आणि सेरेब्रल पाल्सीने आजारी व्यक्तिंचे जग वेगळे असते. तसेच मतिमंदता(मेण्टल रिटार्डेशन) आणि आॅटिझम् हेही मेंदुशी निगडीत असलेले आजार आहेत. ते सुध्दा जन्मजात असू शकतात. अशा व्यक्तिंचे जगही सर्वसामान्यांच्या जगापेक्षा वेगळे असते हे आपण जाणतो. मेंदु मध्ये जडणघडण ही सतत होत असते. मेंदूसंरचना शास्त्रज्ञ डाॅ. मेरियन डायमंड यांनी त्यांच्या लॅब मधील कोणत्याही वयाच्या उंदिरांवर प्रयोग करून असे दाखवून दिले कि ज्या उंदिरांचे कुपोषण होते. ज्यांना पिंज-यात नीट बसायला जागाही नसते. खेळायला सवंगडीही कमी आहेत. सर्वत्र एक प्रकारचेच पिंजरे असतात आणि ज्यांच्याकडे लक्षही तुलनेने कमी पुरवले जाते अशा उंदिरांच्या तुलनेत, ज्या उंदिरांच्या आजुबाजुचे वातावरण भरपूर खेळायला आणि बागडायला वाव देणार आहे भीति कमी करून ज्यांचे वातावरण कुतुहल वाढवणा-या वस्तुंच्या विविधतेने भरलेले आहे ज्यांना मिळणारा आहार चांगल्या प्रतीचा आहे  मिळणारी वागणुक ही प्रेमळ आणि चांगले संगोपन करणारी आहे  त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत विषेश प्रकर्षाने वाढ होते. म्हणुनच आपण सर्वानीच कमितकमी आपआपल्या संपर्कात येणा-या सामान्यत: सर्वच व्यक्तिंबरोबर व्यवहार करतांना पण विषेशत: मेंदूला इजा झालेल्या किंवा जन्मजात मेंदूमध्ये दोष असलेल्या व्यक्तिंचे बरोबर वागतांना सहसंवेदनशील मनाने व्यवहार करून एकमेकां मधील वातावरण उत्साहवर्धक कसे राहील याकडे लक्ष पुरवणे हेच सर्वात जास्त हितकारक आहे.

मेंदू मध्ये जन्मजात दोषच निर्माण होतात असे नाही. आपल्याला सहसा कल्पनाही करता येणार नाही इतके त्याच्या कार्यशक्तिचे अद्भुत नमूनेही क्वचित् आपल्याला दिसतात. “मानवी संगणकशकुन्तलदेवी चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे. असेच दुसरे एक नाव आहे स्टीफन विल्शायर नामक व्यक्तिचे. लंडन मध्ये रहाणारा स्टीफन विल्शायर, जन्म 1974, हा जन्मा पासून ठार मुका आहे. शिवाय वयाच्या तिस-या वर्षी तो .टिस्टिक आहे म्हणुन त्याचे निदान केले गेले होते. पण तो एक निष्णात चित्रकार आहे. इतका कि  “युमन कॅमेराम्हणुनच तो ओळखला जातोतो जे पहातो त्या गोष्टीचे हुबेहुब चित्र त्यातील कोणतीही गोष्ट परत बघता तो काढतो. हेलिकॉप्टर मध्ये बसवुन शहरावरून नुसती एक फेरी मारून आल्यावर रोम, टोकियो हा.न्गकॉन्ग सारख्या शहरांच्या त्याने एकदाच पाहिलेल्या सर्व इमारतींसह संपूर्ण .ण्डस्केप त्याने परत आल्यावर भिंतीवर काढल्याच्या चित्रफितीयू टयूबच्या वेब सार्इटवर उपलब्ध आहेत. *यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि सर्व सामान्यपणे आपण सर्वजण जे पहातो त्या सर्व गोष्टींची नांेद आपल्या मेंदुमध्ये सुध्दा होत असते पण त्यातील बहुतेक सर्व निरर्थक भाग आपल्या स्मॄतितून गळुन जात असतो.

आपल्या ज्ञानेंद्रियानी ग्रहण केलेल्या संवेदना आपल्या मेंदुतील त्यांच्या संवेदना केंद्रांत नोंदवल्या जातात त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच आपल्याला ज्ञान झाल्याचे, समजल्याचे, ध्यानात आल्याचे आपण मानतो. पण आपल्याला ज्ञान होते म्हणजे नेमक काय होते हा एक फारच गहन असा संशोधनाचा विषय आहे. अमेरिकेतील फा.रिन पा.लिसी नामक मासिकाने जगातील अव्वल दर्जाच्या शंभर विद्वानांची एक सूची मे 2008 मध्ये प्रसिध्द केली आहे. त्यात .लिफोर्नियाच्या सॅन डिॅगो विश्र्वविद्यालयाच्या सेंटर फाॅर ब्रेन अॅण्ड कॉगनिशन या संस्थेचे डायरेक्टर, मूळचे भारतीय, डाक्टर विलयानुर रामचंद्रन् यांच्या मते आपण जे बा* जग नजरेने सतत टिपीत असतो त्यादॄष्टीच्या संवेदनांची नोंद, विश्लेषण आणि त्यानुसार आज्ञा देणे इत्यादि अनेक गुंतागुंतीच्या संवेदनांचे ज्ञानात रूपांतर करणारी अशी एकुण तीस संवेदना केंद्रे आपल्या मेंदुमध्ये कार्यरत असतात.मेंदुला इजा झाल्यास इजा कोणत्या केन्द्राला कशी झाली आहे वगैरे गोष्टींवर त्या  व्यक्तिचे बदलेले वास्तव अवलंबुन असतो. डाॅक्टर रामचंद्रन् यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितलेले हे उदाहरण फार बोलके आहे. त्याच्याकडे आलेल्या एका पेशंटला आपल्या स्वत:ची आर्इ समोर बघुन ओळखता येत नव्हती. ती आपल्या आर्इसारखीच दिसणारी पण कोणीतरी अनोळखी स्त्री आहे असा त्याचा समज होत असे. तिच्या जवळ टेलिफोनवरून बोलतांना मात्र आपल्या आर्इशी ज्या आपुलकीने माणुस बोलतो तसा तो बोलत असे. त्या व्यक्तिला झालेल्या अपघाताने त्याचे ते चेहेरा ओळखणारे विशिष्टदॄष्टीकेंद्र आणि आर्इ या नात्याशी निगडीत असलेल्या भावना मेंदुच्या ज्या केंद्रात सामावलेल्या असतात किंवा प्रभावित केल्या जातात, ज्यालालिंबिक सिस्टीमअसे संबोधले जाते, यांच्यातील दुवा असलेल्या सर्किटची पार मोडतोड झालेली होती. मात्र तशाच प्रकारचे श्रवण केंद्र आणि लिंबिक सिस्टीम  यांच्यातील सर्किट शाबुत होते. अशा प्रकारची फार नाजुक ठिकाणी इजा झालेल्या व्यक्ति स्वत:ला देखील आरशात पाहुन ओळखत नाहीत. म्हणजे अपघाताने त्यांचे वास्तव किती बदलु शकते याची कल्पना येर्इल.

मेंदुवर जेव्हा आघात होतो किंवा अपघातात त्याला इजा होते तेव्हा निसटलेत्या त्या क्षणी व्यक्तिला आपल्या विश्र्वात नेमके काय बदल होत आहेत, आपली रिॅलिटी कशी बदलते आहे हे समजून घ्यायला वेळच नसतो. त्याला कांही समजायच्या आतच एका झपाटयात ती घटना घडुन जाते. पण जेव्हा एखाद्याला स्ट्रोक येतो तेव्हा त्याच्या वास्तवात होणारे बदल त्यामानाने संथ गतीने  घडत असतात. ती व्यक्ती कावरी बावरी होते. घाबरते. पण कांही वेळेला त्या व्यक्तीला मूर्छा वगैरे आल्यास, आपल्याला काय होते आहे याचे थोडे फार वर्णन त्याला करता येणे शक्य होते. असेही दिसून आलेले आहे कि अश्या स्ट्रोक मधुन सहीसलामतपणे बरे झालेले पेशंट स्ट्रोक आला त्यावेळी आपल्याला काय झाले होते हे ते विसरूही शकत नाहीत. तेव्हा अशा प्रकारचा स्ट्रोक जर एखाद्या मेंदु शास्त्रज्ञाला आला तर? आणि आल्यावर नेमके काय होते आहे याचे ज्ञानही त्याला होर्इल का?असे मनात येणे साहजिक आहे. अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता किरकोळ असली तरी अशक्य नक्कीच नाही. सुदैवाने मेंदुवर विषेश संशोधन करीत असलेल्या शास्त्रज्ञ डा.क्टर जिल् बोल्ते टेलर यांचे भाषण जेव्हा मी ऐकले तेव्हा मला समजले कि त्यांच्या बाबतीत नेमकी अशीच घटना घडली आहे. डा.. टेलर यांनी हार्वर्ड विद्यापीठातुन न्यूरोअनाटा.मी(मेंदुसंरचना शास्त्र) विषयात शिक्षण घेतले. सध्या त्या इंडियाना विद्यापीठातील मेडिसीन विभागात शिकवितात. 1994 मध्येनॅशनल अलायन्स . मेन्टल इल्नेसच्या डायरेक्टर बोर्डावर त्यांची निवड झाली होती. मेंदुचे पोस्टमार्टेम हा त्यांचा विषेश अभ्यासाचा विषय आहे. डिसेंबर 10, 1996 रोजी त्या एकटयाच घरी होत्या. सकाळी उठल्या उठल्या  त्यांच्या डाव्या मेंदूतील नस तुटुन तेथे रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतरच्या चार तासातच त्यांचे वास्तव क्षणक्षणाला बदलत गेलेले त्यानी अनुभवले. या अवधीत त्यांच्या मेंदुचे कार्या मध्ये इतक्या पराकोटीचा बिघाड झाला कि त्याना चालण्या बोलण्या पासुन ते लिहिण्या वाचण्या पैकी कोणतीही गोष्ट करणे अगदी दुरापास्त होऊन बसलेआपल्या स्ट्रोकचा त्यानी स्वत:हुन कसा शोध घेतला त्याची ही त्यानी आपल्या भाषणात सांगितलेली गोष्ट.

प्रथम डा..टेलर यांच्या डाव्या डोळयाच्या बरोबर मागे सुर्इने टोचल्यासारख्या तीक्ष्ण वेदनानी त्याना जाग आली. थोडा वेळ तिथे दुखायच आणि मग धोडा वेळाने ते थांबायचे असे होऊ लागले.त्यांचा डावा डोळा सारखा फडफडत होता. तोंडाला अनोळखी चव आल्या सारखे वाटलेपूर्वी फारशा कधी आजारी पडल्यामुळे या सर्वच गोष्टी त्याना तशा अनोळखी होत्या. व्यायाम केल्यावर कदाचित या वेदना नाहीशा होतील म्हणुन नेहेमीच्या मशीनवर त्यानी व्यायाम करायला सुरवात केली. आणि तेव्हाच प्रथम त्याना विचित्र असे वाटायला लागलेआपण आजारी वगैरे पडलो नाहीना अशी शंकाही त्याच्या मनाला चाटुन गेली. त्यांच्या लक्षात आले कि त्या विचार करीत होत्या. पण शरिरावरील त्यांचा ताबा नाहीसा झाला होता. मशीनवर त्यांचे हात पुढे मागे झोके घेत असल्याचे त्या पहात होत्या. पण त्यांच्या होणा-या हालचाली त्याना पाहिजे तशा होत नव्हत्या. आपले वास्तव बदलत आहे असे त्याना सारखे भासु लागले. आपल्याला जे करावेसे वाटते ते आणि आपले शरीर ज्या हालचाली करीत आहे त्यातील फरक झपाटयाने वाढतोच आहे असे लवकरच त्यांच्या लक्षात आले. मशीनवर ठेवलेले त्यांचे हात त्याना एखाद्या जंगली श्र्वापदाच्या पंज्या सारखे दिसायला लागले.आपले मन नेहेमीच्या ओळखीच्या वातावरणा ऐवजी दूर कुठेतरी हवेत टांगुन ठेवले आहे अशी त्यांची भावना झाली. पण तरी सुध्दा ध्यानधारणा केल्यावर जशी मन्नशांती लाभते तसेच त्याना अतीशय शांत पण अगदी सुन्न सुन्न वाटायला लागले. मात्र आपण त्यातच अडकुन पडलो आहोत आणि त्यातुन बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाहीये असेही वाटले. डाव्या डोळया मागची वेदना उलट अधिकच तीव्र झाली आहे असे त्याना जाणवले. मशीन वरून मोठया कष्टाने त्या उतरल्या आणि बाथरूम कडे निघाल्या. चालताना शरीराच्या हालचाली नेहेमी प्रमाणे लयीत होत नव्हत्या. आपले शरीर आपल्याला ओढुन न्यावे लागत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यात त्यांचा तोलही जात होता. स्नायु मधले कोआर्डिनेशन नाहीसे झाले होते. पाय उचलुन तो टबात ठेवतांना त्यांच्या मेंदुच्या अगदी आतल्या भागातशरीर पडण्यापासुन वाचवण्यासाठी  हाता पायाच्या स्नायुंची जी मागेपुढे हालचाल होते त्याकरता मेंदुत होणा-या त्या प्रवाहांचीही जाणीव आपल्याला होते आते आहे असे त्याना भासले. त्यांच्या शरीराला असलेल्या प्रचंड धोक्याची त्याना कल्पना नव्हती. भिंतीचा आधार घेऊन त्यानी शावर सुरू केला. टबात पडणा-या पाण्याचा आवाजही त्याना एखाद्या अजस्त्र धबधब्या इतका मोठा वाटला.पण तो आवाज एकाच वेळी सुखकारक आणि त्रासदायकही वाटला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि आपल्या शारिरीक हालचालीतील समतोल गेला आहे, लय बिघडलेली आहे. आणि त्यातच भर म्हणुन आता श्रवणयंत्रणेवरील त्यांचा ताबा ही सुटला आहे. मेंदुच्या संरचनेच्या त्यांच्या ज्ञानाने त्याना माहीत होते कि शारिरीक हालचालीतील समतोल, लय, श्रवण आणि लयबध्द श्र्वासोच्छवास यांच्या संवेदना लहान मेंदू मधल्यापान्सनावाने ओळखल्या जाणा-या भागातुन होत असतात. त्या क्षणी प्रथम त्यांच्या लक्षात आले कि आपल्या मज्जासंस्थेमध्ये बिघाड झालेला आहे.

आता त्यांच्या डाव्या मेंदुतील रक्तस्त्राव हळु हळु सगळीकडे पसरायला लागला होता.आपल्याला नेमके काय होते आहे याचा विचार करण्याचा त्यानी प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि डोक्यात सारख्या चाललेल्या विचारात आणि भोवतालच्या गोष्टींच्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देणारा तो चिवचिवाट रीमोटने टीव्हीचा आवाज बंद व्हावा तसा बंद झालेला आहे. रस्त्यावरील वर्दळीच्या आवाजांच्या संवेदनाही  क्षीण झाल्या होत्या.रक्तस्त्रावामुळे आपला रक्तदाबही कमी होत असणार असे त्यांच्या जाणवले कारण आपल्या हालचालीत सुध्दा आता संथपणा आला आहे हे त्याना जाणवले. डोक्यातील चिवचिवाट जरी नाहीसा झाला असला तरी त्यांच्या जाणीवा मात्र अजुन जागॄत होत्या. पण विचार करूनही त्यांच्या प्रश्र्नांची उत्तरे त्याना मिळत नव्हती. या उलट संध्याकाळ जशी पसरत जाते तशी नीरव शांतता सगळीकडे पसरते आहे असे त्यांना भासु लागले. आपण एखाद्या आनंददार्इ आणि चिरंतर अशा शांततेच्या गोधडीत लपेटले गेलो आहोत असे त्याना भासले. आपण किती भाग्यवान् आहोत कि मेंदु मधल्याअमिग्डालानावाच्या भागामध्ये जेथे भीतिची भावना नोंदवली जाते, त्याच्या प्रभावाखाली  प्रचंड भीतीपोटी आपण अजिबात गोंधळुन आणि गडबडुन गेलो नाही. डाव्या मेंदुतील त्यांची भाषेची ज्ञानकेंदे आता शांत झाल्यामुळे त्यांच्या मागील स्मॄतीही नाहिशा झाल्या होत्या. उच्च संवेदना आणि नेहेमीच्या त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या स्मॄती नाहिशा झाल्यामुळे आपण सर्व विश्र्वाशीच एकरूप झाल्याचा भास त्याना झाला. शारिरीक अस्तिवाच्या त्यांच्या जाणीवाही आतापर्यन्त नष्ट झालेल्या होत्या.त्यांचे शरीर शावरच्या भिंतीवर रेललेले होते. पण त्यांच्या शरीरच्या अवयवांच्या जाणिवाही नष्ट झालेल्या होत्या. आपले शरीर काठे. सुरू होते आणि कोठे संपते हे त्यांना समजत नव्हते. आपले शरीर घट्ट नसून आपण पाण्यासारखे पातळ आहोत असेच त्याना वाटत होते.आपण आपल्या आसमंतात असलेल्या इतर गोष्टीं पेक्षा  वेगळे कोणी आहोत ही त्यांची भावनाच नाहिशी झालेली होती.मध्येच शावरच्या अंगावर पडणा-या थेंबानी अचानक त्याना आपल्या अस्तित्वाची क्षणभर जाणीव झाली. आणि आपल्याला यातुन बाहेर पडायला हवे असे वाटले.

पुढे बाथटबातुन त्या बाहेर आल्या. कसेबसे जोर करून, वेदना सहन करीत, फार कष्टानी आपल्या मेंदुला त्रास देऊन त्यानी बाहेरच्या जगाशी संपर्क केला. सुदैवाने वेळीच त्यांना मदतही मिळाली आणि .परेशन मधुन त्या सुखरूप बाहेर पडल्या आणि आता परत नेहेमीचे संशोधनाचे कामही त्या करीत आहेत.

थोडक्यात आपल्या जीवनातील वास्तव बदलायचे असेल तर निर्णय घेऊन कृती केली तर आपले जीवन आपण बदलु शकतो. आपला वास्तवानुभव हा व्हर्चुअल रियालिटी प्रमाणेच आहे हे लक्षात घेऊन आपले वागणे आणि निर्णय नियमितपणे तपासत राहील्यास जीवन सुस* होण्यास त्याची निश्र्चित मदत होर्इल.