Thursday 31 October 2013

डोंगरी ते दुबई

दाऊदचा परिचय : थेट मुलाखत

१९९० नंतरच्या दशकात भारतात दोन घटना घडल्या. त्यामुळे मुंबईतील टोळीवाल्यांच्या दादांचे दैवच बदलून गेले. जेव्हा मी मुंबईतील गुन्हेगारी जगातील या टोळीवाल्यांच्या दादांवरती लिहीत होतो, त्या वेळी दाऊदने भारत सोडून सुमारे दहा वर्षे झाली होती. माझ्या लिहिण्याआधी तीन वर्षांपूर्वी मार्च १९९३मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटामागचा मुख्य सूत्रधार म्हणून दाऊदचे नाव प्रसिद्धीस आले. त्या वेळचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारतालालायसेन्स राजमधून मुक्त करण्याचे ठरवले आणि भारतीय अर्थकारण मुक्त होण्याची क्रिया सुरू झाली. जेव्हा भारतात अशा प्रकारच्या सुधारणा सुरू झाल्या, तेव्हा विविध आर्थिक संधीचा नुसता महापूर आला. या संधीतून होणारा लाभ प्रथम अचूक जोखला तो निरनिराळ्या टोळ्यांच्या दादांनी! त्या वेळी ते बॉलिवूडमधील जगात गुंतले होते.

मग एकदम जागांच्या व्यवहारात अफाट पैसा निर्माण होण्याची क्षमता निर्माण झाली. आता मुंबईतील बंद  डलेल्या गिरण्यांच्या जागा विकण्यासंदर्भात लोक बोलू लागले. त्या वेळी मुंबईतील गिरण्या एकामागोमाग एकेक बंद पडत होत्या. यातून नवीन इमारतींना भरपूर जागा उपलब्ध होऊ शकत होती. या जागांच्या आधारे जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बिल्डरांच्या इमारतींच्या योजना असे उद्योग पुढे येणार होते. त्याभोवती आता हालचाली सुरू झाल्या. त्या वेळी मुंबईत निरनिराळ्या टोळ्यांचे दादा अस्तित्वात होते. त्यात अरुण गवळी होता. त्याने बराच काळ तुरुंगात काढला होता. आश्विन नाईक हा दादा फरारी झाला होता. दाऊद हा दुबईला जाऊन तेथून आपला मुंबईतील व्यवसाय रिमोट वंâट्रोलद्वारे चालवत होता. अनीस इब्राहिम हा दाऊदचा भाऊही व्यवसायाला हातभार लावत होता. अबू सालेम पळून गेलेला होता. दाऊदच्या टोळीतून छोटा राजन हा पुâटून निघाला होता आणि तो स्वत:लाएक हिंदू डॉनअसे म्हणवून घेत होता. ते दोघेही एकमेंकाविरुद्ध सूडाची भाषा बोलत होते

त्यांच्या भांडणाच्या दरम्यान ते एकमेकांच्या व्यवसायातील साथीदारांवरती भर दिवसा तुटून पडत होते. त्या वेळीईस्ट वेस्ट एअरलइन्सनावाची विमान वंâपनी होती. आता ती अस्तित्वात नाही. त्या विमान वंâपनीचा प्रमुख थकियुद्दीन वाहिद याचा खून या भांडणात केला गेला, तर ओमप्रकाश कुकरेजा या बिल्डरचा खून नंतर केला गेला. ज्या पद्धतीने धडाधड खुनांची संख्या वाढत होती, ते पाहून पोलीस शरमिंदे होत होते. ही परिस्थिती पाहून पोलीस कमिशनरने तर असे सुचवले की, आता लोकांनी सरळ हॉकी स्टिक्स हातात घेऊन आपले संरक्षण करावे. गुन्हेगारी जगातल्या बातम्या या काळात देणे ही एक फार मोठी महत्त्वाची गोष्ट होऊन बसली होती.

माझ्या आधीच्या पिढीने दाऊदचाडॉनम्हणून उदय होताना पाहिला होता. मी फक्त मुंबईतील अशा डॉन मंडळीचा बीमोड होताना पाहिले. त्याबद्दलच्या कथा लिहिताना मी माझ्या लिखाणात त्या दादांवरती तुटून पडत होतो, त्यांच्या रहाण्याच्या जागांचे उल्लेख करीत होतो आणि त्यांच्या पसरलेल्या जाळ्यांचे वर्णन करीत होतो.

त्यांच्या आवडीनिवडी, त्यांनी ठेवलेल्या बायका, त्यांचे भडक पद्धतीने जगणे, त्यांचे बॉलिवूडवर असलेले नियंत्रण आणि स्थावर जंगम, प्रॉपर्टीच्या व्यवहारात होणारी त्यांची लुडबूड, असे मी सर्वकाही उघड करीत होतो. अशा दादा मंडळींना मी अनेकदा स्वत: जाऊन भेटत होतो त्यांच्या तोंडून विविध कथा ऐकत होतो आणि त्या प्रसिद्धही करीत होतो. दगडी चाळीत राहणारा दादा अरुण गवळी याची औरंगाबादच्या हर्सुल तुरुंगात जाऊन मी भेट घेतली होती. मी छोटा राजनशीही बोललो होतो. छोटा राजन हा एके काळी दाऊदच्या टोळीत होता. नंतर तो आग्नेय आशियातील एका देशात जाऊन लपून बसला होता. नंतर मी दाऊदच्या छोटा शकीलचीही गाठ घेतली होती. अन् अबू सालेम आश्विन नाईक यांनाही मी भेटलो होतो. परंतु जो मुंबई सोडून परदेशात गेला तरीही आपल्या कृत्यांनी मुंबईवर दूरवरून वर्चस्व ठेवू पहात होता, अशा दाऊदची मुलाखत घेतल्याशिवाय माझे गुन्हेगारी जगावरील लिखाण पुरे होऊ शकणार नव्हते.

तोपर्यंत अनेक जण दाऊदवर लिहू लागले होते; पण ते सर्व जण दाऊदशी थेट संपर्वâ साधू शकत नव्हते. दाऊदने १९९३पूर्वी पत्रकारांना जरी मुलाखती दिल्या होत्या, तरी १९९५नंतर दाऊदचा प्रसारमाध्यमांशी संपर्वâ राहिला नव्हता. जणूकाही प्रसारमाध्यमांच्या रडारावरून दाऊद अदृश्य झाला होता. एव्हाना दाऊद कराचीत स्थायिक झाल्याचे समजले होते; पण त्याच्याशी फोनवरचा संपर्वâ होणे हे जवळजवळ अशक्य होऊन बसले होते.

मग मी दुसरा एक मार्ग अवलंबायचे ठरवले. मुंबईतील छोटा शकीलच्या जाळ्याजवळ जाण्याचा प्रयत्न मी करू लागलो. हे जाळे हवाला ऑपरेटर, गँग मॅनेजर्स आणि अन्य कोणी संपर्कातील व्यक्ती यांनी बनवलेले होते. काही महिन्यांतच माझ्या प्रयत्नांना यश आले आणि मी छोटा शकीलशी हाय  इनवरून थेट संपर्वâ साधणारा पहिला पत्रकार ठरलो. दाऊदशी थेट मुलाखत मला मिळवून द्या, म्हणून मी शकीलला गळ
घातली. ‘टी-सीरीजच्या म्युझिक वॅâसेट्स काढणारा प्रसिद्ध गुलशन कुमार याची हत्या अबू सालेमकडून झाली. त्या वेळी तो स्वत:ची टोळी स्वतंत्रपणे चालवीत होता; पण या हत्येचा दोष दाऊदकडे जाऊ नये, असे छोटा शकीलला वाटले. कारण यात दाऊदचा हात नव्हता, फक्त सालेमच त्या हत्येला जबाबदार होता. म्हणून शेवटी दाऊद इब्राहिम मला मुलाखत देण्यास तयार झाला. मग मुलाखतीसाठी काही अटी  च्याकडूनच पुढे करण्यात आल्या. पहिली म्हणजे ती मुलाखत जशीच्या तशी प्रसिद्ध करायची. त्यात कोणतीही काटछाट विंâवा बदल करायचा नाही. दुसरी अट ही, जो कोणी मला दाऊदशी संपर्वâ साधून देईल त्याच्याशी मी नंतर कधीही संपर्वâ ठेवता कामा नये.

 मुलाखतीची एवढी विंâमत मला चुकवायलाच हवी होती. कसे काय ते घडले याची हकिगत अशी आहे. मला दिलेल्या सूचनांनुसार मी निरोप येईपर्यंत शांतपणे वाट पहात बसायला हवे होते. जेव्हा दाऊदला सोयीचे वाटेल तेव्हाच तो आपण होऊन मला निरोप पाठवणार होता. त्यानंतर बरेच दिवस उलटले. पण आउटलुकया मासिकाने दाऊद हा जनतेचा शत्रू क्र. कसा आहे, यावर एक लेख प्रसिद्ध केला. हा लेख दाऊदला चांगलाच झोंबला. इतका की, त्याने आपली माणसे आउटलुकच्या ऑफिसात राडा करण्यासाठी सोडली. त्यांनी तेथे जाऊन विध्वंसक कृत्ये केली पार धुमावूâ घातला. परंतु कोणाही व्यक्तीला विंâचितही दुखापत केली नाही. मग एक-दोन दिवसांतच माझा पेजर वाजला. मला त्यावर निरोप दिला गेला की, अमुक एका स्थानिक फोन नंबरवरती संपर्वâ साधावा. त्या वेळी मी एका रिक्षात बसून कलिना येथे चाललो होतो. मी रिक्षा थांबवून जवळच्या एका रेस्टॉरन्टमध्ये गेलो तिथल्या फोनवरून तो स्थानिक नंबर फिरवला. पलीकडून कोणीतरी मला फोन खाली ठेवून दोन मिनिटे थांबण्यास सांगितले. थोड्याच कालावधीत त्या क्रमांकावर माझ्यासाठी फोन आला.


जो कोणी पलीकडून बोलत होता तो अत्यंत सभ्यपणे अदबशीरपणे बोलत होता. जसे काही एखादा उच्चभ्रू लखनवी माणूस बोलावा, तसे त्याचे बोलणे होते. मला याचे आश्चर्य वाटले. याचा अर्थ या दादानेडॉनने शेवटी कोणीतरी सुसंस्कृत माणूस फोन घेण्यासाठी ठेवला होता. एवढे त्याला आदबशीरपणाचे व मॅनर्सचे महत्त्व कळले असावे. बोलणारी व्यक्ती खानदानी उर्दूमध्ये बोलत असल्याने मीही उर्दूतच बोलणे सुरू केले. मी विचारले, ‘‘जनाब,  आपका इसमे गेरामी?’’  

No comments:

Post a Comment