Thursday 27 March 2014

गुलमोहर

जीव मुठीत घेऊन पळत होता. बराच वेळ तो तसाच पळत होता. सुरुवातीला त्याचा पळण्याचा जो वेग होता, तो आता राहिला नव्हता, तरी तो पळत होता. कारण किती वेळ आणि किती अंतर पळत गेलं म्हणजे धोका संपला याचा निर्णय त्याला घेता येत नव्हता. त्याच्यामागं अजून कुणीतरी पळत येत नव्हतं. तसं कुणी पळत येण्याची शक्यताही नव्हती; पण जर कुणी आलंच असतं तर मात्र त्याची धडगत नव्हती. असा एखादा सापडला तर सगळे मिळून त्याचा कसा भुगा करतात हे त्यानं अनेकदा पाहिलं हातं. बुक्क्यांवर बुक्क्या, लाथांवर लाथा बसतात. पोट बघत नाहीत, तोंड बघत नाहीत. डोळा बघत नाहीत की काही नाही. उगारलेली मूठ आपटेल तिथं आपटेल. एखाद्याला मारायचं म्हटलं की सगळ्यांच्या उत्साहाला उधाण येतं. अशाच
तNहेच्या धोक्यातून त्याला बाहेर पडायचं होतं आणि किती वेळ पळालो म्हणजे धोका टळला, हे त्याला कळत नव्हतं.

त्याची ती पहिलीच चोरी होती. चोरी करणारी माणसं चोNया का करतात हे त्याला कधी कळलंच नव्हतं. सगळी पापं पोटासाठीच करावी लागतात असं सरसकट सगळी म्हणायची; पण पोट भरण्यासाठी पापच का करावं लागतं याचा उलगडा त्याला आजवर झाला नव्हता.

तो उलगडा त्याला आज झाला. पाप का करावं लागतं हे त्याला इंटर होऊन कळलं नव्हतं. शिक्षणाचा उपयोग स्वत:च्या उन्नतीसाठी होतच नाही, तर कुणाची तरी सेवा करता यावी, त्यासाठी शिक्षण राबवलं जातं, हे त्याला शिक्षण घेतल्यावर समजलं होतं; पण त्याहीपेक्षा नोकरी करण्यासाठी, सेवा करण्यासाठी तो जेव्हा वणवण सहा महिने भटकला तेव्हा त्याला हेही कळलं की आपली सेवा कुणालाही नको आहे. सेवा करण्यासाठी त्याच्याहून जास्त शिकलेल्या माणसाची गरज जगाला होती. आटापिटा करून, घरातली पुंजी संपवून तो इंटरपर्यंत शिकला. ते शिक्षण कवडीमोलाचं ठरलं होतं हेही त्याला कळलं.

त्याला तशा बNयाच गोष्टी कळल्या. बेकार, निर्धन माणसाला कोणीही विचारीत नाही हे त्याला समजलं. ज्या वस्तूंवर आपण जिवापाड प्रेम केलं व ज्या वस्तूंना आपण वर्षानुवर्ष जिद्दीनं सांभाळलं, त्या वस्तू बाजारात विकायला गेलं की त्यांना काहीच भाव येत नाही, तरीही एक वेळच्या जेवणासाठी, दोन पोटांसाठी त्या वस्तू विकाव्याच लागतात हेही त्याला कळलं. 

सगळ्या वस्तू विवूâन झाल्यावर, आईला व त्याला दोन दिवस उपाशी राहावं लागल्यावर, तिसNया दिवशी त्याला ही शेवटची गोष्ट समजली की, पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.
तेच चोरीचं पाप त्यानं आज केलं होतं. काही मिनिटांपूर्वीच. पाप करायची जाणूनबुजून सवय नसल्यानं, असलं पाप कधी करतात हेही त्याला माहीत नव्हतं. चोरी करायला तो भर दिवसाढवळ्या प्रकाशाचा बाहेर पडला होता. चोरी कसली करायची याचाही डोक्यात विचार नव्हता, योजना नव्हती. जिथं योजना करूनही ती फसते, तिथं कसलीही योजनाच नसेल तर काय होणार? त्याप्रमाणे सकाळी वणवण भटवूâनही त्याला चोरी जमेना. भुकेचा डोंब पोटात उसळला तेव्हा तो एका हॉटेलात शिरला आणि तीन-चार ग्लास पाणी प्यायला. मग जवळच्याच बागेत गेला. तिथंच तासभर लवंडला. त्या तसल्या अस्थिर अवस्थेतही त्याचा जरा डोळा लागला. जाग आली तो अंगावर काहीतरी पडलं म्हणून. डोळे किलकिले करून पाहतो तो रंगीबेरंगी रबरी चेंडू. त्या चेंडूच्या पाठोपाठ दोन गोरे गोरे – मऊ इवलेसे हात, चांदण्यासारखं निष्पाप हास्य, बोबडे बोल, आर्जवी स्वर आणि सशासारखे डोळे. 

सशासारखीच बुजरी हालचाल. पण त्याच्या रिकाम्या पोटात आणि विवंचनेनं शिणलेल्या डोक्यात त्याक्षणी
सैतानाचं वास्तव्य होतं. समोर आलेलं ते बालरूप, परमेश्वरस्वरूप त्याला ओळखता आलं नाही. माया,ममता, वात्सल्य या सद्गुणांची आहुती त्या भुकेनं घेतली होती. पुण्यप्रभाव सरला आणि आणखी एक बळी मिळाला म्हणून पाप आनंदानं सरसावलं; त्याच्या डोळ्यांत प्रगट झालं.

त्या चिमुकल्या हातातल्या दोन सोन्याच्या बांगड्या त्याला दिसल्या. फक्त बांगड्याच– बाकी काही नाही. अर्जुनाला फक्त पक्ष्याचं डोवंâ दिसलं, मत्स्यवेध करताना, उकळत्या तेलाच्या प्रतिबिंबातही फक्त मासाच दिसला. तशा त्यालाही फक्त बांगड्या दिसल्या.

त्यानं झडप घातली, ती पोरगी भयानं ओरडेल असं वाटलं म्हणून तिचं तोंड त्यानं गच्च दाबलं. बांगड्या ओरबाडून काढल्या. त्या पोरीला ढकलून दिलं आणि बागेच्या वुंâपणावरून उडी मारून तो पळत सुटला.


Tuesday 25 March 2014

आपण सारे अर्जुन...

कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या जागी मीच मला दिसतो. चित्ताचा थरकाप होतो, कारण कृष्ण जाणून घ्यायलासुद्धा अर्जुनाची पात्रता हवी. कृष्ण म्हटलं की, किती रूपं आठवावीत?

लोणी पळवणारा कृष्ण, गोपांचा सवंगडी, कालियामर्दन करणारा, रासक्रीडेत रममाण होणारा प्रियकर ह्यांपैकी त्याचं कोणतंही रूप मला भावत नाही. एकमेव कृष्ण. सारथ्य करणारा!

सगुणसाकार म्हटलं की, कृष्ण. निराकार निर्गुण म्हटलं की, भव्य आकाश, गूढ, विराट, असीम, चिरंतन आणि असा एकमेव कृष्ण अर्जुनाला लाभला, म्हणून जगातला एकमेव भाग्यवान पुरुष म्हणजे अर्जुन!

आणि तरीही तो गोंधळलेला. मग तुमचं आमचं काय? कृष्णानं वारंवार जन्म घेतले, हे गीतेतलं कृष्णाचं वचन खरं मानायचं असेल, तर माझ्या मते ते चैतन्यरूपानं पण व्यावहारिक पातळीवर रोज अर्जुनच जन्माला येतोय. संपूर्ण चोवीस तासांत आपण स्वत: किती वेळा गोंधळलेले असतो, हे प्रत्येकानं आठवावं.

गोंधळून जाणाNयांतही दोन प्रकार आहेत. विचार कसा करावा, ह्याचंच आकलन न होणारे आणि अतिविचारी. अर्जुन विचारी आहे. म्हणूनच जिथं विचार आहेत, तिथं तर्वâ आहे. तर्कापाठोपाठ शंका आणि मग द्विधा मन:स्थिती आलीच. श्ळण्प् ऊप्घ्Nख्घ्Nउ ँथ्ळNऊए ऊप्E Aण्ऊघ्ध्N. अर्जुनानं कौरवसेना जवळून पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर कृष्ण धास्तावला. अर्जुन जर असं म्हणाला असता, ‘प्रथम मला सर्वांत बलाढ्य सेनापतीसमोर ने, म्हणजे तिथूनच युद्धाला प्रारंभ करतो.’ तर प्रश्न नव्हता. अवलोकन करायचं आहे म्हटल्यावर विचार आला.

एकदा ‘विचार’ ही अवस्था आली की, कृतीचा क्षण अंतरावर गेलाच. ही अवस्था आयुष्यातल्या प्रत्येक प्रांतात आणि षड्रिपूंच्या संदर्भातही जोखून पाहावी. प्रचंड क्रोधानं विंâवा एका क्षणात रागाचा पारा चढला आणि कर्मधर्मसंयोगानं आपण नेमक्या कोणत्या कारणासाठी रागावलो आहोत, ह्याचं त्याच क्षणी आत्मचिंतन
सुरू झालं, तर ती व्यक्ती कुणावरही डाफरणार नाही. लोभ, मोह ह्या सर्व रिपूंच्या बाबतीतही तेच तत्त्व आहे.
रणांगणावर जाण्यापूर्वी विचार योग्य. शत्रू समोर ठाकला की संपलं!

संसारात प्रत्यही आपण हेच करतो. पत्नी कामात असली की, पटकन मुलांशी काही गोष्टी बोलतो. नवरा कामावर जाण्याची बायका वाट पाहतात, हे नेहमीचं. प्रॉपर्टीच्या वाटण्या वगैरे जास्त गंभीर प्रश्न असतील, तर हडसून खडसून जाब विचारणारा. पैन्पैचा हिशेब करणाNयाचा आधार वाटणार असेल, तर ती व्यक्ती येईपर्यंत वाट पाहतो, नाही तर तो नसताना घाईघाईनं व्यवहार उरकतो. आणि इथं तर जीवन-मरणाचा प्रश्न होता. अर्जुन विचारी आहे, तसा दुर्योधनही नाही आणि भीमपण नाही. महाभारत आणि युद्ध ह्यांची विभागणीच तीन भागांत झाली आहे. विचारहीन, विचारी आणि निर्विचारी.

विचारहीन म्हणजे ज्याच्याजवळ विचार करण्याची क्षमताच नाही, अशी व्यक्ती. दुर्योधन आणि भीम म्हणजे विचारहीनतेचं प्रतीक. सरळ सरळ युद्धाला प्रारंभ करणारे. दोघांची वैचारिक पातळी एकच. म्हणूनच दुर्योधनानं युद्धाच्या वेंâद्रस्थानी भीमालाच मानलं होतं. त्यानं अर्जुनाचा विचार केला नव्हता. सैन्यात अशीच माणसं लागतात. तशी ती घडवली जातात. दिलेला हुवूâम ऐकणं हीच पहिली शिस्त. निर्णय घेणं हे स्वातंत्र्य जर प्रत्येक सैनिकाला दिलं, तर मिलिटरी उभीच राहू शकणार नाही. सैनिकाला विचारहीन बनावं लागतं; बनवलं जातं. भीम आणि अर्जुन ह्यांच्यात हाच फरक आणि भीम आणि दुर्योधन ह्यांच्यात हेच साम्य.

Friday 21 March 2014

मृत्यू ... माझ्या उंबरठ्याशी

तयार राहा ...

फार थोड्या माणसांची मृत्यूशी गाठभेट होते.... स्वतःचं जीवन स्वतःच संपवणारे विंâवा न्यायालयात फाशीची शिक्षा झालेले सोडून. वृद्ध आणि रुग्णाईतांना ‘तो’ दिवस समीप येत असल्याचं जाणवत असेल, पण त्यांना मृत्यू कोणत्या दिवशी, कुठल्या वेळी येणार आहे, ते नेमवंâ कधीही कळत नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी मरणाच्या दारात जाऊन आल्याचा अनुभव घेतलेला असतो — बस, रेल्वेच्या प्रवासात, विंâवा विमानप्रवासात ते विमान नंतर कोसळतं, अशा प्रकारचा.

मी मला आलेल्या अशा प्रकारच्या काही अनुभवांबद्दल लिहिलं आहे.. मी एका झाडाच्या भव्य फांदीखाली गाडी पार्वâ केली आणि तिथून बाजूला गेलो. अवघ्या काही सेवंâदातच अकस्मात वादळी तडाख्यानं ती फांदी कोसळली, त्याखाली माझ्या गाडीचा चुराडा झाला. शिवाय मी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर होतो; मला चाहूलसुद्धा नसताना त्यातला एकजण माझा फ्लॅट पाहून गेला होता, तो माझ्या मागोमाग कसौलीपर्यंतसुद्धा आला होता. तिथं त्याला पोलीस त्याच्या मागावर असल्याचं लक्षात आलं. दिल्लीला परत येत असताना तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पुढं त्याला पुण्याच्या तुरुंगात फासावर चढवण्यात आलं. (त्यानं पूर्वी केलेल्या खुनाची शिक्षा म्हणून) मृत्यू अटळ आहे ही गोष्ट आपण सदैव मनावर कोरली पाहिजे. आपण मरायलाच हवं हे लक्षात ठेवा. या विचारानं कुढत बसण्यापेक्षा त्यासाठी सज्ज राहा.

कवी असदुल्लाह खान गालिब यांनी हे फार सुंदर शब्दांत मांडलं आहे.

रौ मे है रख्श - ए - उमर कहाँ देखिये थामे?
नई हाथ बाग पर है ना पा है रकीब में

आयुष्य चौखूर वेगानं धावत आहे कोण जाणे कुठं थांबणार आहे? आपल्या हातात त्याचे लगाम नाहीत
आणि आपले पाय रिकिबीत नाहीत मला कसौलीत गेल्याच्या गेल्या वर्षी मरणाच्या दारात गेल्याचा अनुभव आला. त्यावेळी माझं वय होतं अठ्ठ्याऐंशी, पण मी वयाच्या मानानं चांगला ठणठणीत होतो. मी सकाळ-संध्याकाळ निरनिराळ्या प्रकारच्या औषधाच्या गोळ्या घ्यायचो... 

म्हातारपणातल्या आजारांशी दोन हात करण्यासाठी, कमी-जास्त होणारा रक्तदाब काबूत ठेवण्यासाठी, प्रोस्टेट ग्लँड वाढलेली, यकृताचं कार्य बिघडलेलं... अशा काय काय दुखण्यांसाठी. पावसाळा सरत आला होता, हवेत खूपच दमटपणा होता. गोळ्या ठेवण्याच्या जागी बुरशी आली होती आणि त्या निरुपयोगी झाल्या होत्या.
एके दिवशी दुपारी मी वामकुक्षी आटोपून उठलो. शाल पांघरून, लिहायचं पॅड घेऊन व्हरांड्याच्या दिशेने निघालो. या व्हरांड्यासमोर बाग आहे. मी या ठिकाणी सूर्यास्तापर्यंत नेहमीच बसतो. त्या दिवशी मला माथ्यावर छत कोसळतंय असं जाणवलं. पुस्तकांच्या शेल्फातली पुस्तवंâ माझ्यावर गडगडत कोसळली. मी तोंडावर आडवा झालो. नाक आणि कपाळ जमिनीला टेकलं. मी क्षणभर जमिनीवर तसाच अस्ताव्यस्त पडून राहिलो. त्या वेळी मदतीला कुणाला बोलावावं म्हटलं तर जवळपास कुणीही नव्हतं. मला उठता येत नव्हतं. मी खेकड्यासारखा तिडमिडत रांगत फर्निचरचा पाय विंâवा काही भाग हाताला येतो का याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे मला त्या आधारानं उठता आलं असतं. मला आपला अंत आला असं वाटलं. मग माझ्या मनात, अजून पूर्ण व्हायच्या कामांचा विचार आला. आता मी प्रकाशक आणि वृत्तपत्रांच्या संपादकांना निराश करणारा होतो... या मंडळींसाठी मी साठ वर्षांहून अधिक काळ लेखन करत होतो, लेखन देण्याची अंतिम तारीखसुद्धा
कधी न चुकवता. मी आणखी थोडं आयुष्य लाभावं अशी करुणा भाकली नाही.

मला अल्लामा इक्बाल यांच्या चेतनादायी काव्यपंक्ती आठवल्या.

बाग-ए बहिश्त से मुझे हुक्म-ए-सफर दिया था क्यों?
कार-ए-जहाँ दराज है, अब मेरा इन्तजार कर.

तू मला नंदनवनातून बाहेर जाण्याचा आदेश का दिलास? मला अजून बरंच अर्धवट काम पूर्ण करायचं आहे:
आता तू माझी वाट पाहावीस हे बरं. 

Wednesday 19 March 2014

मेहता पब्लिशिंग हाऊसचे भारत फोर्ज, चाकण येथे ग्रंथप्रदर्शन

‘आपल्या स्नेहीजनांना पुस्तके भेट द्या.’ या नव्या संकल्पनेला चाकणवासीयांपर्यंत  पोहोचवण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊस ने भारत फोर्ज, चाकण  शाखा यांच्या सहयोगाने  दोन दिवसांच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. 
 
दि. १२ व १३ मार्च, २०१४ या कालावधीत भरवण्यात आलेल्या या ग्रंथप्रदर्शनात मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकशित करण्या त आलेली अनेक  ऐतिहासिक, आत्मकथनपर, वैचारिक, मनोरंजक अशी विविध विषयांवर आधारित अनेक  पुस्तके एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची सुवर्णसंधी चाकणवासीयांना  मिळाल्ाी.

या प्रदर्शनाचे उद्घाटन भारत फोजचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर एन.के. नाईक सर यांनी केले. ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी चाकणमध्ये वाचनाला  प्रोत्साहन देण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊसने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक  केले. ‘समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी, भारत  फोर्जच्याच सदस्यांपासून सुरुवात करू’ अशीr घोषणा त्यांनी याप्रसंगी केली. यावेळी वंâपनीचे एच. आर. मॅनेजर विजय पारीख व भारत फोर्जचे अन्य सदस्य उपस्थित होते. 
 
आम्ही हाती घेतलेल्या या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिल्याबद्दल माननीय नाईक  सर, पारीख सर, आणि भारत फोर्जच्या संपूर्ण परिवाराचे मन:पूर्वक आभार! 


----
ऋचा बाक्रे 

 

Thursday 13 March 2014

द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स

जून १९९८मध्ये आम्ही हे तॉम दाय आसराघर बांधत असतानाच मला `प्रिन्स ऑव्ह अस्टुरिया' हे पारितोषिक मिळालं. तो फोन पिएरनं घेतला. त्यानं मला सांगितलं की, स्पेनच्या युवराजाने मानवतावादी मूल्यांचा प्रसार करण्याच्या कामाबद्दल एका खास पारितोषिकासाठी माझी निवड केली आहे. आम्हा दोघांपैकी कोणीही या
पारितोषिकाविषयी या आधी ऐकलेलंही नव्हतं आणि त्या लोकांना आमची माहिती कशी कळली हेही आम्हाला उलगडत नव्हतं. पण लौकरच आम्हाला कळून आलं की, हे एक फार मोठ्या प्रतिष्ठेचं पारितोषिक आहे आणि त्या पारितोषिकाबरोबर आमच्या स्वप्नातही कधी न आलेली ५० लक्ष पेसेटाज म्हणजे सुमारे ४०,०००
डॉलर्स एवढी रक्कमही आहे.

हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आम्ही स्पेनला गेलो. पाच वर्षांची अदनाही आमच्याबरोबर होती. मिंगची शाळा सुरू होती आणि माझ्या दत्तक आईने आमच्या गैरहजेरीत तिची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं. आम्ही पहिल्या वर्गाने प्रवास केला. याआधी मी असा प्रवास कधीच केला नव्हता. माझ्या लक्षात आलं की
पहिल्या वर्गाने प्रवास करीत असलात तर तुम्हाला राजेशाही वागणूक मिळते. आम्ही पूर्वीसारखेच सामान्य आणि गरीब दिसत होतो तरी आम्हालाही राजासारखंच वागवण्यात आलं. आम्ही अस्टुरियास या स्पॅनिश संस्थानाच्या राजधानीच्या शहरात, ओविएदोला पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, त्या रात्री मला भाषण करावं लागणार आहे. मी काहीच तयारी केलेली नव्हती आणि बुद्धिवंतांची िंकवा कोणत्याही
व्यवाqस्थत कपडे घातलेल्या लोकांच्या सभेची मला नेहमीच भयंकर भीती वाटत आलेली आहे.

एका मोठ्या खूप प्रशस्त अशा सभागृहामध्ये आमचं स्वागत करण्यात आलं. तिथे दूरचित्रवाणीची अनेक पथकं आपल्या सर्व सामग्रीसह हजर होती. स्पेनच्या राजपुत्राने आमची ओळख करून दिली. माझ्या शेजारी उभी असलेली सुंदर स्त्री म्हणजे ग्राका माचेल ही नेल्सन मंडेला यांची पत्नी होती. ती स्वत:ही एक अतिशय
थोर आणि सज्जन स्त्री आहे. माझ्या पाठीमागे रिगोबेर्ता मेन्शू उभ्या होत्या. ग्वाटेमालामधील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना याआधीच नोबेल शांतता पारितोषिक मिळालेलं होतं. माझ्यासारख्या अडाणी बाईनंही त्यांच्याविषयी ऐकलेलं होतं. एम्मा बोनिनोही तिथे होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहून हात हलवला आणि उत्तेजनपर असं एक ाqस्मतही केलं. स्त्रिया आणि मुलं यांच्या हक्कांसाठी काम करणाNया एवूâण
आठ ध्Eिायांना हे पारितोषिक देण्यात येणार होतं.

मला अगदी लहान, नगण्य असं  वाटायला लागलं. मी इतकी अस्वस्थ झाले होते की, राजपुत्र काय म्हणताहेत हेही मला नीटसं कळत नव्हतं. पण जे काही कळत होतं ते फार हेलावून टाकणारं होतं. ते जगातल्या इतर भागांमध्ये आqस्तत्वात असलेल्या भयानक क्रौर्याविषयी, स्त्रिया आणि मुलं यांना भोगाव्या लागणाNया अमानुष वागणुकीविषयी पाश्चात्य देशांमध्ये असलेल्या कमालीच्या उदासीनतेबद्दल बोलत होते. भाषण करण्याची माझी पाळी आली तेव्हा मी सरळ डोळे मिटून घेतले आणि कंबोडियामधल्या ध्Eिायांच्या
परिाqस्थतीबद्दल बोलायला सुरुवात केली.

मी माझ्या स्वत:च्या आयुष्याविषयी बोलले, तशीच कुंटणखान्यांमध्ये गुलामीचं आयुष्य जगत असलेल्या मुलींविषयीही बोलले. त्यांना किती वाईट वागवलं जातं, त्यांना कोणत्या थराच्या िंहसेला तोंड द्यावं लागतं, हे सांगितलं. मी म्हटलं, ‘लोक कंबोडियन मुलींच्या गोडशा ाqस्मताबद्दल बोलतात, पण ते हसू खरं नसतं.'
एवढ्या मोठ्या सभेसमोर मी इतका वेळ बोलू शकेन याची मला स्वत:लाच कल्पना नव्हती. माझं बोलणं संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. हळूहळू सभागृहात प्रकाश वाढला आणि श्रोत्यांमधल्या अनेक जणांच्या डोळ्यांतले अश्रू मला दिसले. मला अगदी थवूâन गेल्यासारखं वाटत होतं, पण आज काहीतरी
महत्त्वाचं साध्य केल्याचं समाधानही मला वाटत होतं. त्यानंतर दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींना माझी मुलाखत घ्यायची होती. खूप गर्दी होती. पण ग्राका माचेलनं त्यांना नंतर यायला सांगितलं. मी किती भावुक झाले होते हे तिला आणि एम्मा बोनिनोला स्पष्ट दिसत होतं. त्या मला माझ्या हॉटेलवर घेऊन गेल्या. माझी मुलगी तिथे दोन तास झोपली आणि उरलेली रात्र रडत होती. तिला थोपटत मी रात्रभर जागीच होते.

Tuesday 11 March 2014

!! गंध गुलाबाचा प्रवास क्षणांचा !!

कधी कधी वाटत उगाचंच माणसाच्या जन्माला आलो, नाही त्या रोजच्याच कटकटीत अडकलो... तेच तेच रोज कंटाळवाणं जिणं जगायचापण कधी कंटाळा येतोच.

मनात थैमान मांडलेल्या विचारांचं काहूर, नाही नाही त्या शंका-कुशंका मनात फेर धरून नाचत असतात, प्रत्येकजण असाच का वागतो, कशाला दुस-याच्या जीवनात घुटमळतो?? त्यापेक्षा एखादी शोभेची वस्तू म्हणून जन्माला आलो असतो तर... काही दिवसाच्या चमक-ढमक नंतर अडगळीच्या खोलीत तरी राहीलो असतो, पुन्हा उपयोगात येणारी वस्तू म्हणून...एक माणूस म्हणून अडगळीत आता जावू पण शकत नाही... वस्तू दुर्लक्षित होतात पण एक आपलं माणूस... कसा दुर्लक्षित  होईल... नाही म्हंटल तरी जास्त काळासाठी  अजिबात नाही त्या माणसाच्या नसण्याचा रितेपणा थोड्याच अवधीत जाणवू लागतो...

नकळत त्या माणसाची उणीव भासू लागते, असते ते तर... नेहमीच दूर केलेल्या  माणसाजवळ जाउन परत येण्यास किती वेळा साकड घालायचं?? काही दिवस नेटाने वागवून, आपल्या कामाचं ओझं हलक करून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायची सोडून... हिणवायचे?? उगाचं परत आणलं, होतात आश्रमात तेच बर होत, काहीच उपयोगाचे नाही, एक साध काम, धड करता येत नाही, अपमान करून अक्षरशः शेवटी  हाकलण्या पर्यंत मजल जाते... पण मनात साधा विचार येत नाही ते स्वत: नव्हते आले आपण बोलावलं होत, येण्याचं औचित्य आपण साधलं, आपलं काम झालं नेटाने आपण बोलुही शकत होतो या आता... येवढा घृणास्पद अपमान कशाला ?? पुन्हा गरज पडली तर दोन वेळच अर्धच जेवण, दुपारी एकदाच मिळणार्या दोन घोट चहा मध्ये दुसर कोण काम करणार आता?? स्वार्थ स्वताचा फक्त स्वार्थ साधतात इथली  माणस...


कधीच दुसर्याच्या मनाचा, भावनांचा विचारच करत नाही, काही बोलत नाही आपली  व्यक्ती म्हणून किती वेळा छळणार ?? कधी ना कधी सहनशीलतेचाही अंत होणारच ना?? चार भिंतीत, चार माणसात गुप्त असलेलं स्वभावाचं नागड रूप जर कुणाला कळलं तर... कापरं भरत ना नुसता विचारही करून, पण नाही ती व्यक्ती अस करूच शकत नाही एव्हडा ठाम विश्वास असतो, कितीही आपण चुकीची वागणूक दिली तरी ती  व्यक्ती आपलं वाईट कधीच करूच शकत नाही, मग आपण त्या व्यक्तीला असे तुच्छतेने का वागवतो?? यंदा चूक झाली पुढच्या वेळेस अस नाही होणार म्हणून वापस आणलं होत आता फक्त माफी मागायची आहे... पिकलेलं पान आहे गळून पडायच्या आधी सर्व चुकंना कबूल करायचं आहे... पण केव्हा आत्ता लगेच होय असतील कुठे ते माहीत आहेच पण माफी देतील?? देतीलच माझी माणस आहेत... पण ते आता तुला  आपलं समजतीलच कशावरून..? नाही ते अस वागूच शकत नाही खात्री आहे मला, आत्ता अजून उशीर नको जायला हवं आश्रमात...  हे काय सगळे पांढर्या पोशाखात, शिणलेला चेहरा, पाण्यात बरबटलेले डोळे.. हातात एक गुलाबच फुल कशाला?? काय चालू आहे आज नेमक आश्रमात?? प्रत्येकाच्या नजरेत काही समजतंयं का शोधत तो साहेबरावांच्या खोली कडे चालू लागला... खोली बाहेर गर्दी जमली होतीसाहेबरावांच्या आवडीच्या गुलाब अगरबत्तीचा मंद गंध पसरला होता.. त्याच गंधात धुंद होवून त्याने साहेबरावांच्या खोली प्रवेश केला, साहेबराव त्यांच्या कॉटवर शांत झोपले होते, चेहर्यावर समाधान होते, आलेल्या मृत्यूचे  संतुष्टीचे भाव चेह-यावर होते, काहीच बाकी राहिले नाही सगळे संपले... 


"आयुष्यभर माझ्या माणसांनी येथेच्छ हेटाळले, हिणवले, अगदी हाकललेही, पण  त्यांच्या या वर्तुणुकीचा मला राग कधीच आला नाही, दाखवत नसले कधी तरी, मनातून मला जपत होते, सांभाळत होते, माझ्यापासून दूर कधीच नव्हते एका माणसाला अजून काय पाहीजे? माझ्या मृत्युच्या दिवशी जन्मभर माझा राग करणारी व्यक्ती, माझा गतप्राण देह पाहून, दुखाच्या वादळात माझ्या इतक्या जवळ असेल  या पेक्षा सुखाची गोष्ट दुसरी कोणती? राग, द्वेष पैशांचे मिजास करावे पण मनात असलेल्या प्रेमाची तुलना कशाशीच होत नाही..." मी कधी कुणाचा राग केला नाही अन द्वेषही मी प्रेम करत होतो त्यांच्या प्रत्तेक वागण्यावर... कसलीच अपेक्षा ठेवता

थोरले सरकार साहेबरावांची शेवटची इच्छा होती त्यांचा "वैकुंठ धामाचा" पुढचा प्रवास तुम्ही आरंभवावा, मी फक्त होकारार्थी मान हलवली...  मी इथे आलो कशासाठी होतो, तब्बेतीने धड-धाकट असलेला माणूस इतकं सहज कसा सोडून जावू शकतो...?

साहेबरावांना गुलाब खूप आवडायचे एकदा म्हणाले होते.. मृत्यू नंतर एक जन्म  गुलाबाचं फुल म्हणून घेईल, प्रेमाचा धुंद लाल रंग माझ्या पाकळ्यांना मिळेल, माझ्या उमलण्याची आतुरतेने वाट कोणी बघत असेल,एका रम्य सकाळी जेव्हा मी सोनेरी किरणांसोबत हसेल, मोहक रुपात माझ्या काही क्षण तोही स्वताला हरवेलनाजूक हातांनी अलगत मला तोडून जेव्हा तो प्रेयसीला मला नजर करेल माझ्या लाल  गुलाबाची गुलाबी लाली तिच्या गालांवर त्याला दिसेल, त्याला होकार देतांना ओठ थोडे थरथरतील, हातात हात घेईल तेव्हा बोटांतून अलगत मी निसटेल, तू दिलेला पहीलाच गुलाब हा म्हणून ती सतत मला जपत राहील, कधी चिडून मला पायाखाली तुडवूनही जाईल, कधी तू नसतांना तुझ्या आठवांत माझ्याशी गुजगोष्टी  करत राहील, माझ्या पाकळ्यांना नाजूक बोटांनी कुरवाळत राहील, कारण फुलं आपलेपणा जपतात, म्हणून मला एक गुलाबाचं फुलं बनायचं आहे...!


---

मृदुंग