Saturday 30 November 2013

आजीच्या पोतडीतल्या गोष्टी

न संपणारी गोष्ट

आ ज आजोबा, आजी, विष्णू काका असे सगळेच उदास होते. मुलांची उन्हाळ्याची सुट्टी आता जवळजवळ संपल्यासारखीच होती. लवकरच सगळ्या मुलांना आपापल्या घरी परत जावं लागणार होतं. गेले तीन आठवडे त्यांच्या खेळण्यानं, हसण्या-खिदळण्यानं, धावपळीनं, भांडणानं, घर नुसतं गजबजलेलं होतं. आता परत सारं कसं शांत शांत होणार. पुढच्या वर्षी सुट्टीत मुलं परत येईपर्यंत सगळं नुसतं शांत, उदास. मुलांनापण वाईट वाटत होतं. सगळी मुलं आपल्या आजीआजोबांच्या भोवती जमली होती. रघू त्यांच्यात सगळ्यात मोठा.

तो म्हणाला, ‘‘या वर्षीच्या सुट्टीत नेहमीपेक्षा जास्त मजा आली. आम्ही डिस्नेलँड बघायला गेलो होतो ना, तेव्हापेक्षासुद्धा जास्त मजा इथे आली. 

आणि त्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी.’’

आजोबा म्हणाले, ‘‘मी जेव्हा शाळेत शिक्षक म्हणून काम करायचो ना, तेव्हा मुलांना जर काही शिकवायचं असेल, काही धडे द्यायचे असतील, तर ते मी गोष्टीरूपानं द्यायचो. ते मला जास्त सोपं पडायचं.’’

आनंद म्हणाला,‘‘मला इतिहासाचं पुस्तक वाचायचा ना खूप वंâटाळा येतो. पण त्याऐवजी तुम्ही जर आम्हाला ऐतिहासिक गोष्टींमधून इतिहास शिकवला तर आमच्या सगळं नीट लक्षात राहील.’’

आता सर्वांचे डोळे चमवूâन उठले आणि नजरा आजीकडे वळल्या. 

‘‘आजी, आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे ना? मग आम्ही फक्त एक गोष्ट ऐवूâन गप्प बसणार नाही, बरं का. आम्हाला आणखी गोष्टी सांग.’’ मग सगळे एकदम गोंगाट करू लागले, ‘‘गोष्ट! गोष्ट! गोष्ट!’’

पण आजी मान हलवत म्हणाली, ‘‘तुम्ही जर फक्त लोणची आणि लाडू एवढंच खात राहिलात, तर तुमची तब्येत नीट राहील का? गोष्टीपण अशाच असतात. तुम्ही तुमचा सगळा वेळ फक्त गोष्टी ऐकण्यात वाया नसतो घालवायचा. मग त्यानं वंâटाळा येतो. एकदा एका राजाला कधी न संपणारी गोष्ट ऐकावी लागली ना, तसं होतं बरं का मग आपलं.’’ ।

‘‘मला कथा ऐकायची आहे! ही माझी आज्ञा आहे,’’ मायानगरचा राजा प्रतापसिंह ओरडून म्हणाला. हा राजा प्रताप केवळ पंधरा वर्षांचा होता. तसा मनानं तो एक लहान मुलगाच होता. खरंतर त्याला हे राजाचं पद भूषवणं मुळीच आवडायचं नाही. कारण त्यामुळे कायदेकानूंवर लक्ष ठेवणं, जनतेच्या समस्या लक्षपूर्वक ऐकणं आणि इतर अनेक वंâटाळवाण्या गोष्टी करणं त्याला भाग पडायचं. राजा असण्यामधली फक्त एकच गोष्ट त्याला आवडायची. तो जे म्हणेल ते सर्वांना ऐकावंच लागायचं. लोकांना आज्ञा सोडणं, त्यांच्याकडे
विविध मागण्या करणं त्याला खूप आवडायचं; पण त्याहीपेक्षा त्याला सर्वांत जास्त काय आवडायचं, तर ते म्हणजे गोष्टी ऐकणं. त्याच्या राजधानीत देशोदेशीचे कथाकथनकार गोळा व्हायचे. ते त्याच्या दरबारात रीघ लावायचे. 

त्याला गंमतीदार गोष्टी सांगायचे, भीतिदायक गोष्टी सांगायचे, जादू आणि चमत्कारांच्या, मंत्रतंत्राच्या गोष्टी सांगायचे, इतरही अनेक गोष्टी सांगायचे. राजा प्रताप त्या सर्वच गोष्टी अगदी लक्षपूर्वक ऐकायचा. त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडत. एखाद्या कथाकथनकारानं जर फार चांगली कथा सांगितली तर तो त्याच्यावर इतका प्रसन्न व्हायचा की मग त्याच्यावर बक्षिशी आणि देणग्यांचा वर्षाव करायचा. सोन्या-चांदीचा वर्षाव
करायचा. त्याच्या दरबारातले मंत्री त्याच्या या वागण्यामुळे अगदी वंâटाळले होते. ते कधीतरी एक सुस्कारा टावूâन त्याला समजावण्याचा प्रयत्नसुद्धा करत. ‘‘महाराज, हे कथा ऐकणं वगैरे सगळं ठीक आहे; पण तुम्ही आधी हातातलं काम करून मग कथा ऐकल्यात तर ते जास्त योग्य ठरेल. तुमच्या प्रजाजनांसाठी तुम्हाला खूप कामं करावी लागणार आहेत. ती सगळी कामं पडून राहिली आणि तुम्ही तुमचा सगळा वेळ जर असा कल्पनाविश्वात रममाण होण्यात घालवलात तर आपल्या राज्याची प्रगती कशी काय होणार?’’

पण हे ऐवूâनही राजा प्रतापनं त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याला फक्त कथा ऐकण्यात रस होता आणि त्या कोणाकडूनही ऐकण्याची त्याची तयारी होती; पण हे असं किती दिवस चालणार? रोज रोज त्याला नवीन
नवीन कथा कुठून ऐकायला मिळणार? काही दिवसांतच लोकांकडचा गोष्टींचा साठा संपत आला. त्यात मग काही लोकांनी लबाडी सुरू केली. खूप दिवसांपूर्वी सांगितलेल्या गोष्टीच ते परत येऊन सांगायचे. पण प्रताप अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता. तो म्हणायचा, ‘‘मी ही गोष्ट पूर्वी ऐकलेली आहे. तीच गोष्ट परत येऊन सांगणाNयाचा ताबडतोब शिरच्छेद करा!’’

Friday 29 November 2013

डॉलर बहू

बेंगळूरहून मिरजेकडे जाणाNया कित्तूर-चन्नम्मा एक्सप्रेसची चंद्रू अस्वस्थ मनानं वाट पाहत होता. त्याला स्टेशनवर येऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही गाडीचा पत्ता नव्हता.

चंद्रूचा धाकटा भाऊ गिरीशही त्याच्याबरोबर होता. पण `आलोच एका मिनिटात दोन पेपर घेऊन!-’ असं सांगून तो जो निघून गेला होता, तो अर्धा तास होऊन गेला तरी आला नव्हता. चंद्रू मनातल्या मनात चडफडत पुन्हा-पुन्हा घड्याळ पाहत होता.

रेल्वे सावकाश स्टेशनमध्ये शिरताना दिसली. ती सावकाश प्लॅटफॉर्मला लागली तेव्हा चंद्रूच्या मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. तरीही मनाच्या एका कोपNयात कातरता भरली होती. वाटत होतं, आजवर न पाहिलेलं गाव - धारवाड! कसं आहे कोण जाणे!

आयुष्यात प्रथमच आपलं लाडवंâ आणि चिरपरिचित माहेर सोडून अपरिचित पतीमागून आनंदानं, तरीही कातर मनानं जाणाNया नव-विवाहितेसारखी चंद्रूची मन:स्थिती झाली होती.

बेंगळूर, मंड्य, मैसूर, शिवमोगा ह्या प्रदेशापलीकडे चंद्रू आजवर कधीही गेला नव्हता. आता शिक्षण संपल्यावर पहिल्या-वहिल्या नोकरीच्या निमित्तानं तो धारवाडला निघाला होता.

धारवाडमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. आज-काल नोकरी मिळणंच कठीण असल्यामुळे हाताला लागलेली पहिली नोकरी सोडण्याचा प्रश्नच नव्हता. गावाचा मोह मोठा, की पैशाचा मोह मोठा ? राष्ट्रीय बँकेत टेक्निकल ऑफिसरच्या हुद्द्यावर काम करायचं म्हणजे चांगलीच नोकरी म्हणायची! त्यामुळे निरुपायानं
तो धारवाडला जायला तयार झाला होता.

कुठूनतरी अचानक समोर आलेला गिरीश म्हणाला, `गाडी आली चंद्रू. चल, सामान दे.’

चंद्रू विचाराच्या तंद्रीतून भानावर आला. या गिरीशचा स्वभावच असा! क्षणभरही निवांत म्हणून राहणार नाही हा! सतत काही ना काही धावपळ चालूच असते याची!-

चंद्रू आपल्या जागेवर बसला. गाडी सुटताच त्यानं प्लॅटफॉर्मवरच्या गिरीशला हात हलवून निरोप दिला. गाडीनं हळूहळू प्लॅटफॉर्म सोडला आणि ती धावू लागली. बघता-बघता गिरीशचा हलणारा हात नजरेआड झाला.
गाडीनं वेग घेताच चंद्रूनं आत नजर टाकली. शेजारपाजारचे प्रवासीही काही वेळ आपापलं सामान नीट लावण्यात आणि आपसात गप्पा मारण्यात गढून गेले.

`यंदा पाऊस काय करतोय कोण जाणे!’

`गेल्या वर्षी बरा झाला पाऊस! यम्मी केरि- म्हशींचं तळं पूर्ण भरून गेलं होतं.’

`त्याच्या मागच्या वर्षी- सांगतो मी- घटप्रभेचा धबधबा अस्सा भरून वाहत होता म्हणून सांगू! मस्त दिसत होता!’

चंद्रू ऐकत होता. मनातल्या मनात तो गडबडला होता. भोवतालची माणसं त्याच्या मातृभाषेतच- म्हणजे कन्नडमध्येच- बोलत होती. पण त्याला त्यातले कितीतरी शब्दांचे अर्थच समजत नव्हते! एखादी परक्या प्रांतातली भाषा ऐकावी तसं वाटून तो कावरा-बावरा झाला होता.

तपकिरी रंगाचा कोट आणि काळी टोपी घातलेले एक प्रौढ गृहस्थ तळहातावर तंबाखू अंगठ्यानं मळता-मळता शेजारी बसलेल्या पागोटेवाल्या गृहस्थांना बजावून सांगत होते, `तू काहीही म्हण- पण मला तर हुक्केरी बाळप्पाची गाणीच आवडतात.’

यावर ते पागोटं आणि धोतरवाले गृहस्थ जोरात सांगत होते, `असेल! पण मला मात्र बाले खाँ साहेबांची सतार फार आवडते.’ 

मुकाट्यानं बसलेल्या चंद्रूलाही बोलण्यात ओढत त्यांनी विचारलं, `कुठल्या गावाला निघालाय?’

`धारवाडला.’

`असं होय! धारवाडला कुणाच्या घरी?’

अरेच्चा! हा काय प्रकार आहे? साNया धारवाडमधल्या प्रत्येक घराची ओळख असल्यासारखं विचारताहेत हे!

`कुठल्याच घरी नाही.’

`मग? नोकरीसाठी निघालाय वाटतं!’

`होय.’ चंद्रूनं निरुत्साहानं सांगितलं. पुढचं संभाषण टाळण्याचा हेतू त्यात स्पष्ट होता.

धारवाडमध्ये त्याचा दूरचा नातेवाईक कृष्णमूर्ती राहत होता. कृष्णमूर्ती, म्हणजे किटीच्या घरची माणसं मूळची बेंगळूरची असली तरी, गेली कितीतरी वर्षं धारवाडला राहत होती. किटीच्या वडिलांनी तर तिथं स्वत:चं घरच बांधलं होतं.

किटीलाही धारवाडमध्येच नोकरी लागली होती. तो आणि चंद्रू साधारण बरोबरीच्या वयाचेच होते. आता किटीची कन्नड भाषाही बेंगळूरी ढंग सोडून धारवाडी ढंगाची झाली होती.

चंद्रूला घेऊन जाण्यासाठी आपण स्टेशनवर येत असल्याचं किटीनं कळवलं होतं. त्याच्या घरी जास्तीतजास्त आठवडाभर राहता येईल. वेगळी खोली िंकवा घर बघण्यासाठी त्यानं किटीलाही सांगून ठेवलं होतं. किटीनं घर पाहून ठेवलंय की नाही, देव जाणे!

गाडी तुमवूâरला थांबली. काळ्या टोपीवाल्या गृहस्थांनी चंद्रूला विचारलं, `आमच्याबरोबर जेवताय काय ? चपात्या आहेत.’ चंद्रू चकित झाला. अपरिचित तरुणाला आपल्याबरोबर जेवायला बोलवण्याइतवंâ
औदार्य किती माणसांत पाहायला मिळतं? नकळत त्याच्या आवाजात सौम्यपणा आला, `नको-नको! थँक्स! मी जेवण करूनच घराबाहेर पडलो.’ 

सहप्रवाशांनी आपापले जेवणाचे डबे उघडले. चंद्रू बाहेरच्या मैदानावर नजर खिळवून उद्याचा विचार करण्यात गढून गेला.

सुरेख, सुमधुर स्वर! कुणीही मोहून जावं असे स्वर!

चकित झालेल्या चंद्रूच्या मनाला ग्रासून टाकणारे सारे विचार क्षणार्धात नाहीसे झाले आणि त्याचं मन त्या स्वरांवर एकाग्र झालं. 

र्पािटशनच्या पलीकडून गाणं ऐवूâ येत होतं- `वसंत बनी ती गाते कोकिळ राजमुद्रेची तिला न आशा-’ कोकिळावंâठी कुणी गायिका पलीकडे अति-सुरेल स्वरात आत्ममग्न होऊन गात होती. कुठल्याही वाद्याची साथ नाही- साधं सरळ भावपूर्ण गाणं! अगदी हलक्या आवाजात गाणं सुरू झालं. बघता-बघता डब्यातले इतर
सारे आवाज थांबले. केवळ गाण्याचा आवाज चढत राहिला आणि काही क्षणातच त्यानं संपूर्ण डबा भारून टाकला. सारेच माना डोलावत तल्लीन होउâन गाणं ऐकत होते.

चंद्रू त्या गंधर्व-लोकातल्या गंधर्व-गायनात पूर्णपणे बुडून गेला होता. मागं राहिलेल्या बेंगळूरचं आणि पुढं येणाNया धारवाडचं भानही काही क्षण त्याला राहिलं नाही.

गाणं संपलं. पाठोपाठ हसण्याचा किलकिलाट कानांवर आला तेव्हा चंद्रू भानावर आला. तो तरुणींचा आवाज ऐकताना त्याला आपण कित्तूर-एक्सप्रेसमध्ये असल्याची जाणीव झाली.

पाठोपाठ मागणी झाली, `वन्स मोअर! वन्स मोअर, विनू.’

अच्छा ! या अभिनव लता मंगेशकरचं नाव `विनू’ आहे तर! पण विनू म्हणजे काय? वनिता? वंदना? त्या सुरेल स्वराच्या मालकिणीला पाहण्याची इच्छा चंद्रूच्या मनात प्रबल झाली.

र्पािटशनमागून धारवाडी कन्नड भाषेत तोच स्वर पुन्हा ऐवूâ आला, `नको गं बाई! पुरे आता माझं गाणं! साडेदहा वाजून गेले आहेत. लवकर झोपलं नाही तर धारवाडऐवजी पुढं लोंढ्याला उतरायची पाळी येईल!’ त्या विनूनं आणखी गाणी म्हणायचा प्रस्ताव धुडकावून टाकला.

चंद्रूला त्या बोलण्यामुळे बरं वाटलं. म्हणजे ही विनू आणि तिच्या मैत्रिणीही धारवाडला उतरणार आहेत तर! चंद्रूचा उत्साह द्विगुणित झाला. `विनू, तुलाच गान-गंधर्व पुरस्कार मिळायला हवा बघ! कालच्या स्पर्धेत
तुझाच पहिला नंबर येणार याविषयी आमच्या मनात तरी तिळभरही शंका नव्हती!’

म्हणजे या सगळ्या बेंगळूरला कुठल्याशा गायनाच्या स्पर्धेसाठी आल्या होत्या तर! तिथं या विनूला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं तर त्यात काहीही आश्चर्य नाही- चंद्रूच्या अंतर्मनानं न पाहिलेल्या विनूच्या वतीनं निर्वाळा दिला.

`खरंच गं! काल तू `तुंगा-तीर विहारी’ गात होतीस तेव्हा जज्जांसह सगळेच कसे माना डोलावत होते!’

`ते सगळं ठीक आहे! पण आता गाणं बंद! उद्या दुपारी लेडीज-रूममध्ये हवं तर म्हणेन. समजलं?’

बहुधा मैत्रिणींना एवढं बजावत विनू उठून उभी राहिली असावी. काचेच्या बांगड्यांचे आवाज ऐवूâ आले. चंद्रूच्या ज्ञानात आणखी भर पडली- या कॉलेजमध्ये शिकणाNया मुली दिसताहेत.

`एक्सक्यूज मी! मिस्टर- उठता ना?’ तोच आवाज. चंद्रूनं मान वर करून पाहिलं. गोरापान वर्ण, मोठाले काळेभोर डोळे, सरळ टोकदार नाक, दाट काळेभोर केस- अपरिचित तरुणाबरोबर बोलत असल्यामुळे चेहNयावर उमटलेले मिश्र भाव- एका हातात बेडशिट आणि उशी, दुसNया हातात तिकीट.

`माझी सीट आहे ही.’

चंद्रूचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो तिच्याकडेच भान हरपून पाहत राहिला होता. धारवाडी काठा-पदराची साधी सुती साडी आणि लाल काचेच्या बांगड्या घातलेल्या निराभरण सुंदर युवतीनं त्याची ही गत केली होती! 


Wednesday 27 November 2013

झोंबी

ताराचं लग्न झालेलं ताराला माहीत नाही. ती एक वर्षाची असताना तिचं लग्न झालं. तिच्या पाळण्यालाच बाशिंग बांधलं होतं. रतनू त्या वेळी आठ-नऊ वर्षांचा होता. ‘‘वरातीच्या वक्ताला लगाम धरून एकटाच घोड्यावर बसलो हुतो; त्येची आठवण हाय.’’ असं सांगत होता. त्याला तेवढंच आठवतं.

रतनूचा बा आणि ताराचा बा हे दोस्त. रतनूच्या बाऽला दहा-बारा पोरं झाली. त्यांत आठ मुलगे झाले. पण ते लहानपणीच एक-दोन एक-दोन वर्षांचे होऊन मरत असत.

नवरा-बायकोला संशय यायचा. त्यांना वाटायचं भाऊबंदच पोरांना बाध्या घालतात विंâवा लिंबू मंतरून मारतात. भाऊबंद म्हणजे रतनूच्या बाऽचे सख्खे चार भाऊ आणि त्यांच्या बायका. हे पाचीही भाऊ, त्यांचा बा मेल्यावर वाली-सुग्रीवासारखे एकमेकांत भांडू लागले. भांडणं, माNयामाNया, खून हे ह्या घराण्याच्या पाचवीला पुजलेलं.

ह्या घराण्याचा मूळ पुरुष कर्नाटकातून आपल्या बहिणीसह एका रात्रीत पळून कोल्हापूर संस्थानात– कागलला आला होता. पळून येण्याचं कारण; त्यानं कर्नाटकातल्या आपल्या राहत्या गावच्या पाटलाचा खून केला होता. पाटलानं याच्या विधवा बहिणीला ओढण्याचा प्रयत्न केला होता. कागल भाग हा कर्नाटकाच्या सीमेवर आहे. सीमा अगदी दोन मैलांवर चालू होते. त्या मुलखात खेड्यापाड्यांत खुनांचे प्रमाण भरपूर.

त्या कानडी खेड्यात आमच्या मूळ पूर्वजाचा पिंड पोसलेला. त्याचा स्वभाव संतापी, भांडखोर आणि आडव्या डोस्क्यानं वागण्याचा. या घराण्याच्या मूळ पुरुषापासून रतनूच्या बाऽची पाचवी पिढी होती. या पाचव्या पिढीचे पाच सख्खे भाऊ. त्यांचा बाऽ असेतोपर्यंत ते एकजुटीनं राहिले. हूमदांडगे, दादागिरी करणारे म्हणून ते गावात प्रसिद्ध. त्या पाच जणांच्या बाऽला, कागलला होणाNया गुरांच्या बाजाराची जकात गोळा करण्याची कामगिरी असे. तीच कामगिरी या पाच मुलांकडं आलेली. महाराष्ट्र आणि कानडी मुलूख यांच्या सीमेवरचा हा भाग असल्यानं, जकात गोळा करणं फार जिकिरीचं काम होतं. अडाणी माणसं जकात चुकवत. न देता दांडगाईनं निघून जाण्याचा प्रयत्न करत. कमी देण्याची धडपड करत. पुष्कळ वेळा भांडत, मारामाNया करत. त्यात हे पाच जण तयार झालेले. याच काळात ते ‘यादवां’चे ‘जकाते’ झाले.

पुढं; बाऽ मेल्यावर हे पाचजण भाऊ स्वतंत्र झाले. त्यांतील एकाला मूलबाळ नव्हतं, म्हणून त्याला बाकीचे चौघेजण भाऊ वाटा देण्यास तयार नव्हते. पण त्यानं तो भांडून घेतला. नोटांपेक्षा चांदीचे रुपये जास्त वापरात होते. मुलंबाळं असलेल्या भावांवर चिडून, त्यानं वाटणीला आलेले सगळे पैसे एका फाटक्या पोत्यात घालून, ते पोतं एका रेड्यावर लादलं नि रेडा गावभर उधळवला. गावाला पैसे खिरापत म्हणून विस्कटून दिले. ‘‘मी माझ्या गावाला सारी इस्टेट देईन. पर ह्या मांगाच्या बोड्याच्या भावांस्नी एक पै बी देणार न्हाई.’’ अशी त्याची प्रतिज्ञा.

जकातीचा पैसा भरपूर आलेला.

पुढं; कागलचा गुरांचा बाजार बंद झाला आणि कोल्हापुरास गेला. त्याबरोबर ह्यांचं जकातीचं काम बंद पडलं. मागं फक्त ‘जकाते’ हे पड-नाव राहिलं. मग ह्या पाच भावांचा सगळ्या गावालाच त्रास होऊ लागला. पाचांतील दुसरा भाऊ जळितं करण्यात प्रसिद्ध. तिसरा मग सरकारी रानं लिलावात घेऊन, तीच निम्मीनिम्मी वाटून, जास्त पैसे घेऊन पोटवाट्यानं देऊ लागला. चौथा शेती करत असे. पाचवा; म्हणचे रतनूचा वडील, शेती बघता बघताच लांबलांबच्या गावांना जाऊन, तेथून धान्य खरेदी करून दुसNया मुलुखाला नेऊन विके. असा उद्योग करण्यासाठी मनगटात भरपूर सामथ्र्य लागे. वाटा आडरानांतल्या. रानांत लुटालूट, दरोडे नेहमी होत. परक्या गावात आलेल्या माणसाजवळची नगद रक्कम लुटली जाई. त्यामुळं बरोबर ताकदीची माणसं घेऊन, सानेचे विळे, भाले, कुNहाडी घेऊन खरेदीला जावं लागत असे. रतनूही आपल्या बाऽ बरोबर पुष्कळ वेळा खरेदीला जाई. पण पुढं रतनूच्या बाऽला वाटलं; एकुलतं एक पोरगं. अशा जोखमीच्या धंद्यात घालण्यापेक्षा त्येला शेतकरीच करावा.

...पाची भाऊ आपापल्या घरात सवते होते; पण एकमेकांचे वैर विसरले नव्हते. एकमेकाच्या वैरणी जाळायचे. कापणीला आलेली पिवंâ कापून न्यायचे, चोरून गवतं कापायचे. अधनं मधनं एखादं जनावर टाचा खुरडून मरायचं नि प्रत्येकाच्या पोटात संशयाचा गोळा उठायचा... रतनूच्या आई-वडलांना वाटायचं; ह्या भाऊबंदकीत आपलं एकबी पोरगं जगणार नाही. म्हणून रतनूच्या वडलानं लांब जाऊन मांगवाड्याशेजारी जागा विकत घेतली नि तिथं तीन जप्त्यांचं साधं घर बांधलं. त्या घरात त्याची तीन पोरं जगली. त्यांतला थोरला रतनू. त्याच्या खालच्या दोन बहिणी; वंâबळा नि आकणी... ह्या तिघांतही घराण्याचे गुण उतरलेले. अंगातली शक्ती कमी होईल, वय वाढत जाईल तसं रतनूच्या वडलाचं ध्यान शेतीकडं जास्त लागलं. गावात मिळेल त्याची पाच-सात एकरांची जमीन तो फाळ्यानं करायचा. त्यातच ऊस, माळवं, मिरची, गहू-हरभरा पिकवायचा. फाळा
भागवून मिळेल तेवढ्यात तो दर साल गुदरायचा. सुगी झाली की, कधीमधी जवळपासच्या खेड्यावरच जायचा नि जोंधळ्या-तांदळाची खरेदी करायचा. कोल्हापुरात गाडीनं नेऊन विकायचा. कधी चार पैसे उरायचे, कधी जेवढ्यास तेवढंच व्हायचं.

चार दिसाचं पोटपाणी बाहेर पडायचं. ‘‘निदान बैलभाडं नि आमची पोटं तरी बाहीर पडली. बसून घरातलंच खाण्यापेक्षा हे काय वंगाळ न्हाई.’’ अशी तो स्वत:ची नि बायकोची समजूत घालायचा. पण हळूहळू त्यानं हा व्यापार बंद करून टाकला नि पोराबाळांसह शेतावरच कष्टपाणी करू लागला... तरी भाऊबंदकीची भुणभूण
अधनंमधनं चालूच होती. हाडवैरी असलेल्या मधल्या भावानं त्याच्या शेजारीच मोकळी जागा घेऊन, इर्षेला पडून टोलेजंग घर बांधलं.

ताराला दोन भाऊ. एक मोठा आणि एक धाकटा. रामा आणि लिंगाप्पा. रामा तारापेक्षा सहासात वर्षांनी मोठा आणि लिंगाप्पा बNयाच वर्षांनी लहान. ताराचा बाऽ शिवाप्पा जाधव वाळली शेती फाळ्यानं करायचा. मृगापासनं संक्रान्तीपर्यंत त्या शेतात राबायचा. उन्हाळ्यात मोलमजुरी करायचा. घाण्यागुNहाळात गुळव्याच्या हाताबुडी आडसोडी म्हणून काम करायचा. सालाच्या बेजमीचा गूळ मिळवायचा.

सुगीच्या दिसांत आपली सुगी झटक्यासरशी घरात आणून, कुणाकुणाच्या इथं भात-जोंधळा कापायला जायचा. त्याचं शेर-पायली मिळत राहायचं. पावसाळ्याचं दीस जवळ आलं की, भटाबामणांची घरं शाकारायचा. ह्या सगळ्या कामांना साध्या रोजगारापेक्षा दोन आणे जास्त मजुरी असायची. ती उन्हाळभर पदरात पाडून
घ्यायचा. त्या वरच्या दोन आण्यांची रोज रात्री गुत्त्यावर जाऊन नेमानं दारू प्यायचा. ताराचा बाऽ शिवाप्पा आणि रतनूचा बाऽ आप्पाजी हे कधीतरी, रानाकडेला रान आल्यानं एकमेकाचे दोस्त झाले. एकमेकाला बारीसारीक गोष्टीत मदत करू लागले, आधार देत गेले.

रतनू आता आठनऊ वर्षांचा पोरगा झाला होता. एकुलता एक जगल्यामुळं लाडात वाढत होता. घरातलं म्हशीचं दुभतं एकटा खात होता. भाऊबंदांच्या इर्षेवर वाढत असणारं पोरगं. सातव्या वर्षीच तालमीत जाऊ लागलं. भोकरी रंगाचं पाणीदार डोळं. कट्यारीच्या आकाराचं धारदार नाक. पुâगवट नाकपुड्या. गुटगुटीत अंग. तांबूस गोरा रंग. उन्हात तापला की गाजरासारखा दिसे. शाहूमहाराजांच्या तांबड्या मातीत लोळू लागल्यावर तर, तांब्याच्या घासलेल्या घागरीसारखा दिसू लागे. बोलताना रागात, आक्रमक पवित्र्यात बोलल्यागत वाटे. त्यात पुन्हा आवाज मोठा. ओरडला की जनावरंही मागं फिरत असत. आता तर तालमीमुळं त्याच्या अंगात खुमखुमीची पैदास होऊ लागली.

कागल हे शाहूमहाराजांचं औरस गाव. वर्षाला गैबीच्या उरुसात जंगी कुस्त्यांचं मैदान व्हायचं. बैलगाड्यांच्या शर्यती, रेड्या-बकNयांच्या टकरी, ताकदीनं अवजड वस्तू ओढण्याच्या पैजा व्हायच्या. शाहू महाराजांचा हात पाठीवरनं फिरायचा.

प्रत्येक शेतकNयाला वाटायचं; आपल्या पोराच्या पाठीवरनं तो फिरावा. बैलांच्या पाठीवर महाराजांची थाप पडावी. बकNयाच्या तोंडात महाराजांची मूठभर डाळ स्वहस्ते जावी... वर्षभर गाव घुमू लागायचं. प्रत्येक गल्लीच्या तिकटीला तालीम. पहाट झाली की, बारकीसारकी पोरं घुमायची नि अंगं तांबड्या मातीत घुसळायची. गावाच्या उगवतीच्या माळाला कायमचाच बैलगाड्यांच्या शर्यतीचा राऊंड केलेला.

त्या राऊंडवर, पावसाळा झाल्यावर रोज एखाद-दुसरी गाडी सरावासाठी पळतेली दिसायची. माळाला पोरंटोरं दीसभर बकNयांच्या, रेडकांच्या टकरी लावून चुरस करायची. तांबूळ रानात हीच पोरं कुस्त्या लावून बटनं, पैसा-दोन पैसे जिंवूâन घ्यायची. असा कायमचा शाहू महाराजांचा वारा प्यालेलं गाव.

Tuesday 26 November 2013

२६/११ मुंबईवरील हल्ला

हॉटेल ताजमधील अंधारयात्रा

आशिष खेतान

दृश्य एक :


पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचा थोडा डोळा लागला होता. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. तिशीतले, रुंद कपाळ, भक्कम जबडा, काळे कुळकुळीत केस आणि बारीक कोरलेल्या मिशा असलेले नांगरे-पाटील मुंबईच्या विभाग एकचे प्रमुख होते. पोलीस व्यवस्थेसाठी मुंबईचे बारा विभाग पाडले आहेत. विभाग एकमध्ये दक्षिण मुंबईतील कुलाबा, नरिमन पॉर्इंट आणि मरिन ड्राईव्हसारखे भाग आहेत. ते त्यांच्या अधिकार कक्षेत येतात. तासापूर्वीच ट्रायडेंट हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेसंबंधीची एक बैठक आटोपून ते आले होते. भव्य अरबी समुद्राचा वक्रांकित किनारा, ‘राणीचा वंâठहार’ (क्वीन्स नेकलेस) म्हणून ओळखला जातो.

तेथील ओबेरॉय हॉटेलच्या लगत गगनचुंबी इमारतीत ट्रायडेंट आहे. २८ नोव्हेंबरला एका पारितोषिक प्रदान समारंभाला पंतप्रधान मनमोहनिंसग ट्रायडेंटमध्ये उपाqस्थत राहणार होते. भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी जरी विशेष सुरक्षा दलाकडे (एसपीजी) असली तरी पंतप्रधानांच्या मार्गावर नियंत्रण ठेवणे, त्या मार्गावर अडथळे उभे करणे, प्रवेश बंद करणे यासारख्या किरकोळ संरक्षक व्यवस्था स्थानिक
पोलिसांकडे असतात.

एसपीजीच्या पथकाच्या सभासदांना भेटून रात्री साडेआठ वाजता नांगरे-पाटील घरी परतले. नरिमन पॉर्इंट ते मेट्रो सिनेमाजवळील स्टोन बिाqल्डंग हा प्रवास मोटारीने पंधरा मिनिटांचा होता. तिथे एका साध्या सरकारी सदनिकेत ते राहत होते. आपल्या पत्नी आणि दोन मुलांबरोबर जेवल्यानंतर ते एक डुलकी घेण्यासाठी आडवे झाले.

रात्री ११ वाजता त्यांना आणखी एका बैठकीला जायचे होते. तेवढ्यात दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांचा फोन आला तेव्हा रात्रीचे ९:४० झाले होते. वेंकटेशम यांनी घाईने निरोप सांगितला, `लिओपोल्ड वॅâपेâच्या बाहेर गोळीबार झाल्याची बातमी आहे. आपला एक कॉन्स्टेबल जखमी झाला आहे.
कृपया घटनास्थळी ताबडतोब जावे.' नांगरे-पाटील यांनी चटकन आपला गणवेश चढवला. ग्लॉक पिस्तूल आणि गोळ्यांची दोन पाकिटे कातडी पिशवीत घातली. आपले वैयाqक्तक संरक्षक अमित खेपलेला बरोबर घेऊन कुलाबा मार्केटच्या दाट वस्तीतील लिओपोल्ड हॉटेलकडे ते रवाना झाले. पाश्चात्त्य, परदेशी पर्यटकांची तिथे विशेष गर्दी असते.

मोटार कुलाब्याच्या दिशेने वेगाने जात असताना नांगरे-पाटील यांच्या डोक्यात अनेक शक्यता येत होत्या. या गोळीबाराशी टोळीयुद्धाचा संबंध असेल का? का वैयाqक्तक सूड हे कारण असावे? लिओपोल्ड वॅâपेâच्या समोरच असलेल्या पोलीस स्टेशनवरील अधिकाNयांकडून काही माहिती मिळवण्याच्या आधीच पाटील यांना
आणखी एक फोन आला. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक ए.एन. रॉय फोनवर होते.

त्यावेळी रात्रीचे पावणेदहा वाजले होते.

`हॉटेल ताजमहाल पॅलेसकडे तातडीने जा. मला ताजमधून गोळीबार आणि  स्फोटाचे आवाज ऐवूâ येत आहेत.’ त्यांच्या आवाजात घबराट होती. महाराष्ट्र सरकारमधील दुसNया क्रमांकाच्या वरिष्ठ अधिकारी, राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चित्कुला झुत्शी यावेळी ताजमध्येच होत्या. झुत्शींनी रॉय यांना फोनवरून
कळवले की, काही अज्ञात बंदुकधाNयांनी हॉटेलवर हल्ला केला आहे. पाटील यांचे सर्वांत वाईट दु:स्वप्न खरे ठरले होते. जेमतेम दोन महिन्यांपूर्वीच नांगरे-पाटील यांना गुप्तचर विभागाकडून (आयबी) माहिती मिळाली होती की, ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे. त्यानुसार २९ सप्टेंबरला काही पोलीस अधिकाNयांसह नांगरे-पाटील यांनी संपूर्ण हॉटेलच्या रचनेची आणि व्यवस्थापनाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती. ३० सप्टेंबरला हॉटेल व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीत त्यांनी सुरक्षाव्यवस्थेविषयी
आणखी काही सूचना केल्या होत्या. त्या बैठकीचे टिप्पण तयार करून ते कुलाबा पोलीस स्टेशनला दिले होते. हॉटेल व्यवस्थापनाने काही गोष्टी करायच्या होत्या. त्यांचा पाठपुरावा कुलाबा पोलिसांनी करायचा होता.
‘ताज टॉवर’ या नावाने ओळखल्या जाणाNया नव्या ताज हॉटेलचे केवळ ५० मुख्य प्रवेशद्वारच वापरावे आणि जुन्या ताजची (सहा मजली, ताजमहाल पॅलेस) सर्व प्रवेशद्वारे बंद ठेवावीत.

सहज भेद्य अशा दरवाजांच्या जागी धोक्याची जाणीव होताच क्षणार्धात बंद करता येतील असे स्वयंचलित दरवाजे बसवावेत.

सर्व पाहुणे दरवाज्यात बसवलेल्या मेटल डिटेक्टर्समधूनच (Dइश्D) जातील आणि नंतर त्यांची हातात धरता येणाNया मेटल डिटेक्टरने झडती घेतली जावी.

एक्स-रे यंत्राच्या सहाय्याने सर्व सामानाची तपासणी करावी.

हॉटेलच्या दक्षिणेकडील लाकडी चौकटी असलेला काचेचा दरवाजा लोखंडी जाळी लावून कायमचा बंद ठेवावा. सीसीटीव्ही वंâट्रोल रूममधून सीसीटीव्ही पूâटेजवर चोवीस तास नजर ठेवावी. ‘ताज टॉवर’ – नव्या ताज हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ शध्Eाधारी रक्षक ठेवावेत.

१९९३ मध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्यानंतर तिथे जशी बहुस्तरीय काटेकोर सुरक्षा व्यवस्था केली गेली, तशाच पद्धतीची व्यवस्था नांगरे- पाटील यांनी सुचवली होती. हॉटेलजवळ मुंबई पोलीस दलातील चार शध्Eाधारी पोलीसही तैनात केले गेले होते.

महाराष्ट्रातील दूरच्या धुळे जिल्ह्यात दंगल झाल्याने मुंबईतील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तासाठी १४ ऑक्टोबरला हे चार पोलीस हॉटेलजवळून काढून घेतले गेले. ताज हॉटेलने मेटल डिटेक्टर बसवले, पण हल्ल्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच ग्राहकांची गैरसोय होते म्हणून ते काढून टाकले गेले. इतर संरक्षक उपाय अंमलात आणलेच गेले नाहीत. आधी लिओपोल्ड वॅâपेâतील गोळीबाराची बातमी आणि नंतर ताज हॉटेल... हा काही टोळीयुद्धातील गोळीबार नाही हे नांगरे-पाटील यांच्या लक्षात आले.

दृश्य दोन :

ताजमहाल पॅलेस आणि ताज टॉवर या दोन इमारती, अपोलो बंदरासमोरच्या समुद्रकिनाNयावर समुद्रात भर टावूâन तयार केलेल्या जेमतेम तीन एकर जागेत उभ्या आहेत. समोर अथांग अरबी समुद्र पसरलेला आहे. पहिली इमारत सुमारे शंभर वर्षांपूर्वीची आहे आणि ती पौर्वात्य स्थापत्य शैलीची आहे तर दुसरी गगनचुंबी इमारत १९७० नंतर बांधली गेली. २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी इतर संध्याकाळांप्रमाणेच हॉटेल दिव्यांनी लखलखत होते. मुख्य कळस चंद्राप्रमाणे प्रकाशमान होता, तरदोन्ही बाजूंचे कळस ताNयांप्रमाणे चमकत होते. हॉटेलच्या आत वैभव आणि चैन ऊतू जात होती. दोन्ही लॉबी आणि कॉरिडॉर्समधून हळूवार संगीत चालू होते. बॉलरूममध्ये प्रसिद्ध व्यक्तींची ये-जा होती. टेबलांवर काटे चमच्यांच्या आवाजाबरोबर गप्पांची किलबिल चालू होती. बाहेर समोरचा समुद्र शांत होता. ‘गेट वे ऑफ इंडिया’ तुरळक पर्यटक परतत होते आणि रस्त्यावरून काही वाहने धावत होती. ताज हॉटेलच्या पश्चिमेस पाचशे मीटर अंतरावरील कुलाबा मार्केटमध्ये मात्र खूप गजबजाट होता. पर्यटकांची गर्दी होती. मध्यरात्रीही हौशी चैनी लोकांची लहानलहान गल्ल्यातून
गर्दी होती. चोखंदळ ग्राहक, फळांपासून ते अनेक फालतू वस्तू विकणारे पेâरीवाले यांनी पदपथ भरून गेले होते. अरूंद रस्त्यांवरून मोटारी, टॅक्सी, आणि बसेस मिळेल तेवढ्या इंचभर जागेतून पुढे सरकत होत्या. माणसांच्या कोलाहलात वाहनांचा आवाज, मोटारींचे हॉर्न ह्यांची भर पडत होती. ताज लगत असलेल्या एका गल्लीच्या तोंडाशी लिओपोल्ड वॅâपेâ आहे. तिथे हरतNहेचे लोक जमलेले असले तरी त्यातून पाठीवर सॅक घेतलेले, थंड बिअरचे घोट घेणारे परदेशी प्रवासी उठून दिसत होते. त्या रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तरुण उभे होते. ते आत जाण्यापूर्वी एखाद्या मित्राची वाट पाहत असल्यासारखे वाटत होते. त्यांच्या पाठीवर दोन पुâगलेल्या पिशव्या होत्या आणि पदपथावर दोन गच्च भरलेल्या बॅगाही होत्या. रेस्टॉरंटमधील गडबड-
गोंधळाचा आस्वाद घेत असलेल्या गर्दीकडे ते एकटक पाहत होते. नंतर त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि पाठीवर थोपटले. त्यांच्यापैकी एकाच्या डोळ्यात पाणी आल्याचेही एका पेâरीवाल्याने पाहिले. दोन जिवलग मित्रांच्या ताटातुटीचा तो क्षण होता.

पुन्हा केव्हा भेट होईल याची काहीच कल्पना नव्हती. आता जायचे म्हणून थैल्या उचलण्यासाठी ते खाली वाकले. पण ते तसे नव्हते. थैल्या उघडून त्यातून त्यांनी दोन बंदुका काढल्या. त्या खरं तर अ‍ॅसॉल्ट रायफल्स होत्या. त्यांच्या काळ्या नळ्या दोघांच्याही काळ्या पोशाखाशी मिळत्याजुळत्या होत्या. नंतर लिओपोल्ड वॅâपेâच्या दोन दरवाजांमधून दोघे आत गेले. एक डाव्या बाजूने आणि दुसरा उजव्या बाजूने. एकाने वॅâश
काऊंटरच्या दिशेने एक छोटी गोल वस्तू पेâकली. तो बॉम्ब होता, क्षणार्धात कान बधिर करणारा एक मोठा स्फोट झाला. नंतर सगळा धूर आणि जाळ... कुलाबा मार्केटमधील नेहमीच्या रात्रीच्या गोंगाटाला या अपरिचित आवाजाने छेद दिला. त्यानंतर पाठोपाठ बंदुकीच्या पैâरी झडल्या. खाण्यापिण्यात दंग असलेल्या गिNहाईकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. संपूर्ण जागा आधी निळी आणि नंतर लालभडक बनली. रक्तामांसाच्या रंगाने इतर सगळे रंग गिळून टाकले. तपकिरी फर्निचर, पांढरी शुभ्र फरशी, निळ्या िंभती सगळं
लाल-लाल झालं.

नंतर ते दोघे बाहेर पदपथावर आले आणि नेम धरून खेळाचा रंग उडवावा तसा गोळ्यांचा वर्षाव केला. नंतर उजवीकडे वळून ताजकडे जाणाNया गल्लीत ते शिरले. तिथेही जणूकाही रस्ता मोकळा करण्यासाठी ते अंदाधुंद गोळीबार करतच होते आणि खरं तर या दोन बंदुकधाNयांचे मित्र तिथंच जवळपास कुठेतरी होते. जेमतेम शंभर पुâटांवर असलेल्या त्यांच्या दोन मित्रांनी वेगळ्या हालचाली केल्या आणि रक्ताचा सडा पाडण्यास तेही तयार झाले. तेही त्या गल्लीत शिरले. पण सरळ जाण्याऐवजी पहिल्यांदा ते डावीकडे वळले. वाटेत गोकुळ रेस्टॉरंटपाशी थांबून पदपथावर एक गच्च भरलेली पिशवी ठेवली. थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळले आणि ‘गेट वे ऑफ इंडिया’ समोरील विस्तीर्ण प्रांगणात आले. नव्या ताजच्या मुख्य पोर्चपासून शंभर
पुâटांवर त्यांनी आणखी एक पिशवी ठेवली आणि पोर्चमधून त्यांनी ‘ताज टॉवर’ हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी रात्रीचे ९:३८ झाले होते. त्यांना हटकण्यासाठी तिथं कुणीही नव्हतं. प्रथम ते स्वागतकक्षापाशी गेले. त्या वास्तुचे वैभव आणि तेथील सुखसोयी न्याहाळत त्यांनी पाच मिनिटे काढली. नंतर त्यांच्यापैकी एकजण ‘शामियाना’ रेस्टॉरंटकडे गेला. त्याच्या सुंदर काचेच्या दरवाज्यासमोर तो उभा राहिला. त्याच्या मनात काहीतरी आलं असावं. थैलीतून त्याने अ‍ॅसॉल्ट रायफल बाहेर काढली आणि काचेच्या दरवाज्यांवर नेम धरला. अध्र्या मिनिटाने दुसरा तरुण स्वागतकक्ष सोडून जुन्या आणि नव्या ताजला जोडणाNया मार्गाने निघाला.
उजवीकडे हार्बर बार, माँट ब्लॅक, रॉqव्हसाँ शोरूम्स आणि डावीकडील ‘मसाला क्राफ्ट’ रेस्टॉरंट असलेल्या मार्गाने पोहोण्याच्या तलावासमोरच्या छोट्या मोकळ्या जागेपर्यंत तो पोहोचला. एवढे होईपर्यंत लिओपोल्डमध्ये गोळीबार केलेले ते दोन तरुण जुन्या ताजच्या दक्षिण बाजूला पोहोचले. त्यांनी बंदुकीच्या दस्त्यांनी लाकडी दरवाजा फोडला आणि ते हॉटेलमध्ये शिरले. तेव्हा रात्रीचे ९:४३ वाजले होते. नंतर ते पोहोण्याच्या तलावापाशी गेले आणि तिथे त्यांनी गोळीबार सुरू केला. त्याचवेळी तलावासमोरच्या छोट्या जागेतील इसमानेही थैलीतून अ‍ॅसॉल्ट रायफल काढून गोळ्यांचा वर्षाव केला. एक माग काढणारा कुत्रा आणि त्याची काळजी घेणारा माणूस तिकडे धावले. पण त्यांनाही बंदुकधाNयाने ठार केले. नंतर ते चौघेही एकत्र
आले आणि इलेव्हेटरमधून जुन्या ताजच्या सर्वांत वरच्या म्हणजे सहाव्या मजल्यावर पोहोचले.

Monday 25 November 2013

Betrayed

I’m known as Latifa—‘the gentle one’—now, although that’s not the name my parents gave me. But dangers that came to surround me forced me to take on a new identity. Fear, threats and suffering—they are nothing new to me or my people, the Kurds, who for centuries have struggled to keep out invaders and have their independence recognised. In the decades before I came into the world—and before Saddam Hussein began his own brutal oppression in the 1980s—the Kurdish people, who make up about 20 per cent of Iraq’s 20 million population, had suffered persecution under Iraq’s former leader, President Ahmad Hasan al-Bakr. By the time Saddam Hussein placed al-Bakr under house arrest and declared himself president in 1979, my father was a fierce and respected member of that honoured group of Kurdish freedom fighters, the Peshmerga.

And how he was needed. There had been fierce clashes between the Iraqi army and the guerrillas in 1977, but in the following two years hundreds of Kurdish villages were razed to the ground and more than 200,000 Kurds were deported to other parts of the country. I never found out how many soldiers my father killed up there in the mountains—I’ve seen him shoot and I know how good he is—and I know he would have been a one-man force to be reckoned with. 

But now he was even more of a man among his peers. He was a father. And his bride, his wife, my mother, was among the most beautiful women in Iraq; blonde, green eyed and shapely, men would have killed for her hand but my father’s family claimed her for him when she was just 15. Baian was born in Dohuk, the name of which means ‘small village’, but with a population today of half a million it is anything but small. With the mountains and the Tigris River nearby, it is an attractive city and its university is recognised as one of the best in the region. But my mother’s loveliness denied her any university education—in fact, her family were so
concerned that she might be molested or raped by government agents who search towns and villages for attractive girls and women—that was the life—that they even kept her home from school. She became a prisoner of her beauty.

It was her father who gave Baian her education because he was a teacher and she had the added advantage of learning from her three brothers and four sisters when they came home from school. But while her early teenage years put her ahead of her peers as a scholar, she was never allowed to mix with girls of her own age.

My mother’s and my father’s families were distantly related through my great-great-grandmother, which was agreeable to everyone for it meant that when Baian and Khalid married the ‘good genes’ were passed on. The wedding, like all Kurdish ceremonies, was a grand affair, with singing and dancing and much merriment and then the couple retired to their room.

This was where the bride would give herself to her husband and heaven forbid any woman who was found not to be a virgin. Just as in other households, his mother and his oldest brother waited outside Baian’ and Khalid’s bedroom door for the moment when Khalid emerged. Then they went in and, taking no notice of the bride, inspected the bed. They were looking for ‘the blood on the cloth’. Yes, she was a true virgin
and Khalid, well, he was now a man among men. Music was played, baklava was served. There was great rejoicing. My father was to tell me years later, when I was old enough to understand, that he came to truly love my mother, although to this day I believe this is all the wrong way around and that love must come first. However, this was the Kurdish region of northern Iraq and that was the way things were.

Like his young bride, Khalid was well educated. He was born in Mosul, the regional capital, Iraq’s fourth largest city and some 40 miles to the south of my mother’s city of Dohuk, and shortly after leaving high school he worked hard at setting up his own welding business. All his employees were family members and the business flourished, so his bride and the family they would raise were guaranteed a good start to life.
As is the way, Khalid and Baian’s marital home was his family’s house, a three-storey building in the middle of the city. It was crowded, because they shared it with Khalid’s parents, his seven sisters and a brother. And it was expected of the new bride that she would be a slave to the whole family, doing the cooking, washing and cleaning. She had moved from one domestic prison before her marriage to another as a new bride. 

After three months Baian found herself pregnant with me. Again, it was a victory for Khalid. Now he was free to return to the mountains with the Peshmerga, for whom he had been fighting before his marriage, leaving his relatives to run the welding business. His wife was pregnant and while she coped with that he could fight for Kurdish independence until the time came when his baby was born. During those summer
months he dressed himself in the traditional Peshmerga clothing of baggy harem pants and a khaftan top, while around his waist was a wide black belt in which he carried his ammunition and his dagger.

I learned from my mother how I was raised in my first few months. Like all children I was strapped very tightly into a cot so I wouldn’t fall out as they rocked it back and forth. I’ve looked at family photos of my mother holding me and seen the smile on my father’s face as he gazed at me. But there is one photo that I’ll never forget. It shows me, still a baby, giggling at the camera my father is aiming at me but my mother, who is holding me in her arms, is glaring at me. I’ve studied it so many times over the years and wondered whether,
from those very early months of my life, Baian had seen me as a burden. I’ve tried to pass it off as a trick of the camera, one of those unguarded moments where an expression is not a true reflection of feelings, but I’m convinced now that the photo caught the truth.

There is no doubt that my mother suffered among her husband’s sisters. Her beauty was outstanding and there would have been intense jealousy among her sisters-in-law. She put up with the ill-feeling, although she rebelled when the demands on her became too much.

Saturday 23 November 2013

10th Anniversary of Corporate office at Mehta Publishing House


India’s largest and the most loved Marathi publishing house, Mehta Publishing House celebrates its 10 years in its Sadashiv Peth, Pune corporate office. Since its inception in the year 1976 by Mr. Anil Mehta, we began publishing in October 1976 with Malavarchi Maina, a collection of short stories by Dr. Anand Yadav, being the first in the list. This was the time when Mehta Publishing House was located near Perugate Police Station in Pune. A humble beginning from their lead to the mammoth numbers of 150 new titles every year and an active backlist of over 3000 titles and 300 reprints.

Known for its strong fiction and narrative non-fiction list, Mehta Publishing House publishes across virtually every segment including biography, travel, business, politics, history, religion and philosophy, lifestyle, cookery, health and fitness, sports and leisure, e-Books and even children’s books.

With the initial publishing of only Marathi titles, Mehta Publishing House started publishing the Marathi translations of books from all genres from other Indian languages like Bengali, Hindi, Kannada and Gujarati along with English. Apart from these, we have also published the English as well as Marathi translations of original writings in Korean as well as Japanese languages.

Apart from being the trendsetters in Marathi, Mehta Publishing House has recently forayed into the publishing of English books with initial 40 titles across various genres like biographies, self help, motivational, cooking, health and fitness, humor, lifestyle, fiction, relationships etc.

After thirty seven years of hard work and commitment Mehta Publishing House is the proud receiver of Sahitya Akademi Award & Marathi Sahitya Parishad Award. We have won an award for the Excellence in Book Production by The Federation of Indian Publishers. We have been felicitated by the Pune Municipal Corporation in 1991 for our tremendous contributions in Marathi literature. Mehta Publishing House is also a receiver of the Distinguished Publisher Award for 96-97 from The Federation of Indian Publishers. We are also the recepients of the "V.P. Bhagwat Award" in 1996-97 which is the most prestigious award in the Marathi book publishing. Our founder CEO, Mr. Anil Mehta has served as the Ex-President of Marathi Prakashak Parishad along with being the Ex-Vice President (West) Federation of Indian Publishers.

But all this couldn’t have been achieved without the constant unending love and support received from all our authors, translators, proof readers, editors, associates and ofcourse, our readers who have been selfless with their support to us throughout.


Thank You all and Happy Reading !!

निसटलेले

एखाद्या वेळीच
स्टेशनावरच्या संमिश्र कोलाहलाने अभिरामला जाग आली. त्याने डोक्यावरली चादर बाजूला केली. मुंबई-हावरा मेल कुठल्या तरी मोठ्या स्टेशनवर थांबली होती. थोडे उजाडलेही होते. चहा घ्यायचा तर तो इथेच चांगला मिळू शकतो; पण डोळ्यातली झोप पुरती गेली नव्हती. अजून चोवीस तास गाडीत काढायचे आहेत.
इतक्या लवकर उठून काय करायचं ! पुन्हा लागेल झोप तर पहावं म्हणून चादर पुन्हा डोक्यावर ओढून घेतली. पण येणाNया-जाणाNयांची गर्दी आणि प्लॅटफॉर्मवरचे सरमिसळ आवाज ! त्याला झोपून राहणे अशक्य झाले. चहावाल्याला त्याने आवाज दिला. नुसते गरम गोड पाणी. आता पाऊस भुरभुरायला सुरुवात झाली. रात्रभर आकाश कोंदलेलेच होते. जोराने कोसळेल असे वाटत होते पण पाऊस हळूहळू सावधपणे, बेताबेताने पडत राहिला.

त्याच्या खिडकीसमोर एक घोळका आला. त्यातल्या एकाने घाईत डब्यात चढून सीट नंबर, बर्थ शोधला. तो त्याच्या समोरच होता. दोनच सीटचाखिड कीजवळचा बर्थ त्याचा होता. वरच्या बर्थवर त्या दुसNयाने सामान ठेवले. आणि त्याच्या समोरच्या सीटवर हँडबॅग. मग तो अभिरामला म्हणाला, ‘माय सिस्टर इज अलोन. वुईल यू मार्इंड एक्स्चेंजिंग द बर्थ.’ ‘ओ यस, डोन्ट मार्इंड’ तो तत्परतेने म्हणाला, ‘वर काय, खाली काय, फरक काय पडतो !’ 

मग त्या माणसाने खाली उतरल्यावर आपल्या बहिणीलाही सांगितले, की वरचा बर्थ तू एक्स्चेंज करून घे.
‘तशी काही गरज नाही.’ ती म्हणाली.

अभिरामचे आता अभावितपणेच त्या घोळक्याकडे लक्ष गेले. दोन साधारण वयस्कर बायका, दोन पुरुष, एक तरुण, पंजाबी ड्रेसमधली ध्Eाी आणि तिचा हात धरून एक साडेतीन-चार वर्षाचा मुलगा. तो छोटा मुलगा तिच्या हाताला हिसके देत होता. इकडेतिकडे बोट दाखवत होता. पण मुलाकडे विशेष लक्ष न देता तिच्या
माणसांशी बोलण्यात ती गुंतली होती. मधून मधून त्या बायका तिला चढ चढ म्हणून घाई करत होत्या. पण तिला तशी काही घाई नव्हती. गाडी सुटायची वेळ झाली, की ती शांतपणे डब्यात चढेल असे अभिरामला वाटले. मध्येच एका ढकलगाडीकडे तिच्या मुलाने बोट दाखवले. त्यात मुलांना आकर्षित करणारे सटरफटर सामान होते. त्या मुलाला बहुधा चेंडू हवा होता. पण त्याच्या आईने तो त्याला घेऊन दिला नाही. याच्या केसांवरून हात फिरवला. दोन्ही हातांनी मोठा चेंडूचा आकार दाखवून तो आपण घेऊ असे समजावले. न बोलताच. अभिरामला
त्याची बायको आठवली. तिला असे मुलांना समजावता येत नाही. मुले आता सहा-सात वर्षांची आहेत. आणि लहानपणापासून हट्टी होत चालली. त्यांच्याकरता आपल्याजवळ आणि आपल्या बायकोजवळही वेळ नाही.

गाडी जरा जास्तच थांबली का या स्टेशनवर ? स्टेशन कोणते ? त्याने कुणाला तरी विचारले. ‘भुसावळ’ सांगितल्यावर मग त्याच्याच लक्षात आले, भुसावळच असणार. या लाईनने अनेकदा प्रवास झाला, पण स्टेशने लक्षात ठेवत नाही आपण. त्यांच्या वेळा, त्यांच्या जागा... त्यांचा चेहरा- तो पुन्हा समोरच्या
घोळक्याकडे पाहू लागला. ती तिच्या माणसांशी बोलण्यात रमली होती. तिच्या मुलाने तिचे धरलेले बोट सोडले. तो तिथेच इकडेतिकडे फिरू लागला. अभिरामला वाटले की, याच्या आईने याचे बोट धरून ठेवावे. गर्दीत इकडेतिकडे गेला म्हणजे ! तिच्या भावाने तिच्या हातात केळी ठेवली. मोठा घड ती नको म्हणत
होती.

‘आनंद घ्यायला येतील की नाही ? अपरात्री गाडी पोचते चक्रधरपूरला. तिथून उतरून पुढे असनसोल... वयस्कर बाईने विचारले. ‘प्रत्येक वेळी उतरवून घ्यायला कुणी कशाला यायला हवं’? जाईन मी.’

‘लहान मूल आहे !’

‘म्हणून काय झालं ?’

‘आनंद नाही आले तर सकाळ होईतो थांब वेिंटग रूममध्ये टॅक्सीनं निघायची घाई करू नकोस.’

‘अगं, लहान आहे का मी आता ! ती म्हणाली. अभिरामला वंâटाळल्यासारखे झाले तो खाली उतरला. तेवढ्यात गाडीची अनाऊन्समेंट झाली. पाच-दहा मिनिटात गाडी सुटणार होती. तो डब्यासमोरच थांबला. तिला निरोप द्यायला आलेल्या बायका डोळे पुसू लागल्या. बरोबरचे पुरुषही गंभीर झाले.

‘आनंदच्या मुंबईच्या बदलीचं कळव,’ भाऊ म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी होते की नाही हे अभिरामला दिसले नाही. मुलाला तिने पाहिले तर तो नव्हता. तिने इकडेतिकडे पाहिले. सगळे घाबरले. इकडेतिकडे करू लागले. पण ती घाबरली नाही. शांतपणेच तिने मुलाला शोधले. असेलच इकडेतिकडे ! तिनेच बाकीच्यांना
सांगितले, आणि तिलाच तो दिसला. तिने बोट दाखवून सांगितले. त्याच्यामागून हमालांची झुंबड आणि सामानाची ढकलगाडी येत होती. ती त्याला आवाज देत होती, आणि तो तिकडे लक्ष न देता इकडेतिकडे पाहत जात होता. तिचा भाऊ पोहोचायच्या आतच तिने मुलाला गाठले आणि अलगद बाजूला घेऊन कडेवर घेतले. ढकलगाडीवाला हमाल तिच्यावरच खेकसला. गाडी बाजूने वळवायलाही जागा नव्हती. तिने मुलाला गाडीकडे बोट करून दाखवले, की ती सुटते आहे. बस इतकेच. तो असा हात सोडून गेल्याबद्दल ती त्याला रागावली नाही. आपली बायको असती तर तिने मुलाला दोन लगावल्या असत्या, अभिरामला वाटले. पण आपला
मुलगा असा हात सोडून नसताच गेला. आपल्या बायकोला थोडीही अनिश्चितता सहन होत नाही. ती मुलाला घेऊन डब्यात बसून राहिली असती. तिने त्याला खाली उतरवलेच नसते. तिला सगळे जिथल्या तिथे. जसेच्या तसे लागते. आताच निघताना कितीवेळा बजावले, उतरल्यावर फोन करा. काम झाल्यावर निघतानाही करा. बायको तर अशी लहान मुलाला घेऊन एकटी कधी निघालीच नसती. ती आता मुलाला घेऊन गाडीत चढली. दाराशीच उभी राहिली.

पत्र पाठव. जप स्वत:ला, फोन कर. इतकी गॅप नको ठेवू येण्यात, असे सांगताना त्या आजी दिसणाNया बाईचे डोळे वहायलाच लागले. गाडी हलली तिने कडेवरच्या मुलाला हात घेऊन तो साNयांच्या दिशेने हलवला. तो मुलाने दोन्ही हात त्या लोकांकडे घेण्यासाठी पसरले. पण गाडीने हळूहळू वेग घेतला. ती मग मुलाला घेऊन आपल्या सीटवर आली. तिच्या जागेवर ठेवलेली तिची हँडबॅग वर ठेवून ाी बसली. मुलाला दोघांच्या मध्ये बसवताना अभिरामकडे पाहून हसली. 

सहजच ओळख करून घेणारे ते सहज अकृत्रिम हसू. आणि आपोआपच त्यानेही सहजच विचारले. माहीत झाले होते तरी... ‘कुठे उतरणार ?’

Friday 22 November 2013

अ‍ॅना आणि सयामचा राजा

वेल्स ते भारत

वेल्समधील कार्नरव्हॉन या ठिकाणी ५ नोव्हेंबर १८३४ रोजी तिचा जन्म झाला होता. थॉमस मॅक्सवेल क्रॉफर्ड पतिपत्नींच्या अ‍ॅना हॅरिएट या मुलीला ओळखणारे आता तेथे कोणीही नव्हते. पण तेथून अध्र्या जगाइतक्या लांब असलेल्या, आशियातल्या एका सुंदर शहरात अजूनही तिची आठवण काढली जाते.

अरुंद रस्त्यांचे स्वच्छ गाव असलेले कार्नरव्हॉन, आयुष्याची सुरुवात करण्यासाठी फारच सुरेख जागा होती. मोठ्या रस्त्यांना छोट्या अरुंद गल्ल्या मिळत होत्या. पण सगळे रस्ते अतिशय स्वच्छ होते. समुद्रावरून वाहणारा ताजा वारा आणि त्या विशाल समुद्रावर क्षितिजावरून उगवणारी आणि क्षितिजापार नाहीशी होणारी
जहाजे; उन्हाळ्यातल्या संध्याकाळी शहराच्या उत्तरेकडल्या चौपाटीवर िंहडणे आणि एजलसी हिल्सच्या मागे ढगांच्या रंगीबेरंगी स्वप्नभूमीत सूर्य मावळताना पाहणे फार सुखकारक असायचे.

गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देणाNया अनेक गोष्टी त्या भागात पसरलेल्या होत्या. छावण्यांचे अवशेष, गढ्या, किल्ले, क्रॉमलेक्स (म्rदस्तम्प्ेपुराणैतिहासिक काळातील वर्तुळाकार दगडी रचना), मठ यांतून त्या खुणा दिसत होत्या. पूर्वी सतत होणाNया हल्ल्यांपुढे ब्रिटनने अखेर या भागात माघार घेतली
होती. वेल्सच्या या भागात रोमनांनी जरी खूप मोठा तोफखाना ठेवलेला असला तरी येथे या वेल्सभूमीवर त्यांना पूर्ण वर्चस्व कधीच स्थापन करता आले नव्हते. वेल्स लोकांची स्वातंत्र्याची भूक ते मारू शकले नव्हते आणि त्यानंतरची अनेक शतके इंग्लिश लोकही हे काम करू शकले नाहीत. या एल्फ आणि मर्लिनच्या भूमीत
घालवलेल्या बालपणाची एक आठवण अ‍ॅना हॅरिएट क्रॉफर्ड अजूनही विसरली नव्हती. वनपNया आणि जंगलातील आत्म्यांच्या नावाने ती झाडांना पत्रे अडकवून ठेवत असे आणि त्यांना छान-छान उत्तरे येत असत. या सगळ्यातून स्वातंत्र्याबद्दल अत्युत्कट प्रेम, गाढ धर्मश्रद्धा, धैर्य आणि अभिमानाची भावना हे सर्व ज्या तNहेने अ‍ॅनाच्या मनात जोपासत राहिले त्यात काही नवल नव्हते आणि त्या मूल्यांनीही तिला कधी सोडले नाही.

ती फक्त सहा वर्षांची असताना तिचे आईवडील भारतात निघून गेले. भारतात स्वातंत्र्ययुद्धाला तोंड पुâटल्यामुळे वॅâप्टन क्रॉफर्ड आणि त्यांच्या रेजिमेंटला भारतात बोलावण्यात आले होते. त्यांचे एक नातेवाईक मुलींसाठी शाळा चालवत होते. त्यांच्याकडे सहा वर्षांच्या छोट्या अ‍ॅनाला त्यांनी ठेवले. परंतु काही महिन्यांतच
म्हणजे अ‍ॅनाची सात वर्षे पूर्ण व्हायच्या आतच, एके दिवशी मिसेस वॉलपोलने तिला आपल्या उबदार बाहूंत घेतले आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी तिला हळुवारपणे सांगितली. मायदेशापासून हजारो मैल दूर देशात, राणीसाठी लढताना तिच्या वडिलांनी देह ठेवला होता.

१८४९ साली भारतातील सर्वांत छान आणि थंड नोव्हेंबर महिन्यात मुंबई बंदरात एक जहाज थडकले. पंधरा वर्षांची अ‍ॅना ही त्यातली एक प्रवासी होती. शाळेतून नुकतीच बाहेर पडलेली, ताजी, कोवळी अ‍ॅना आपल्या आईला भेटायला अतिशय उत्सुक होती. तिच्या आईने पुन्हा लग्न केले होते. पहाटेच्या धुक्यातून सूर्य हळूहळू बाहेर पडत होता. ही मुलगी उत्सुकतेने आणि आश्चर्याने आपल्या केबिनच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. ती लहान चणीची; पण देखणी अन् नाजूक मुलगी होती. तिचे डोळे आणि केसही तपकिरी होते. तिच्या कुरळ्या लाटालाटांच्या केसांचा मधोमध भांग पाडलेला होता. बोट जशी धक्क्याला लागली तसे अ‍ॅनाचे डोळे अधीरपणे आईला शोधू लागले. इतक्या वर्षांनंतर आपण आपल्या आईला ओळखू शवूâ की नाही, या कल्पनेने ती मनातून थोडीफार घाबरलेली दिसत होती, पण तिची आई थोडे वाढलेले वय आणि फिकटपणा वगळता होती तशीच होती. बोटीच्या धक्क्यावरून त्या घोडागाडीत बसल्या आणि निघाल्या. अ‍ॅना गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून प्रत्येक नवे अद्भुत दृश्य नजरेत साठवत होती. काही आठवडे मुंबईत त्यांच्या ओळखीच्या मित्रांकडे राहून मग पुढे पुण्याला जाऊ, असे तिच्या आईने तिला सांगितले. तिचे सावत्र वडील पुण्याला पी.डब्ल्यू.डी. खात्यात मोठ्या हुद्द्यावर होते. पुण्यात काही महत्त्वाची सरकारी बांधकामे चालू होती. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी त्यांना पुण्यातच राहावे लागणार होते. पण या दरम्यान मुंबई जितकी पाहून घेता येईल तितकी पाहून घ्यायची, असे तिच्या आईने ठरवले होते.

या वास्तव्यात, कार्नरव्हॉनच्या साध्या आयुष्यातून इकडे आलेल्या या तरुण इंग्लिश मुलीवर एका घटनेने फार मोठा परिणाम केला. एका श्रीमंत विधवेने दिलेल्या डिनर पार्टीला त्या गेल्या होत्या. आलेल्या पाहुण्यांनी अ‍ॅना हॅरिएटचे फारसे लक्ष वेधून घेतले नव्हते, पण राणीच्या सेवेत जे भारतीय नोकर होते, त्यांनी तिचे लक्ष वेधून घेतले. जेवणाच्या वेळी ते इतक्या हलक्या पावलांनी इकडेतिकडे वावरत होते की, त्यांच्या पावलांचा आवाजही येत नव्हता. पाहुण्यांना ते वाढत होते, मद्य देत होते, प्लेट्स ठेवत होते, उचलत होते, पण कशाचाही अजिबात आवाज होत नव्हता. सगळ्या कामात परिपूर्णता आणि सहजता होती. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ते काम करत होते. 

जे नोकर त्या वेळी टेबलांजवळ नव्हते, ते आपली पाळी येईपर्यंत दरवाजाशी िंकवा खांबांजवळ हाताची घडी घालून शांतपणे वाट बघत उभे होते. त्यांचे चमकणारे डोळे सोडले, तर ते ब्राँझचे पुतळे तर नाहीत ना अशीच शंका यावी. जेवणाच्या वेळचा मुख्य विषय ब्रिटिश साम्राज्यविस्तार हाच होता. अ‍ॅना त्या शब्दांच्या समुद्रात तरंगत होती. ती फक्त ऐकत होती, बोलत काहीच नव्हती. ती गप्प होती याचे कुणालाच काही विशेष वाटले नाही, कारण तिच्याकडून तेच अपेक्षित होते. पण ती बाह्यात्कारी जरी शांत वाटत असली तरी तिच्या डोक्यात वादळ घोंघावत होते.

ब्रिटिश अधिकाNयांचे चेहरे मद्यामुळे लाल झालेले होते. ब्रिटिशांनी भारतावर प्रस्थापित केलेल्या वर्चस्वाबद्दल ते अभिमानाने बोलत होते, आणि तिला नवल वाटत होते. ब्रिटिश मोहिमा, धोरण आणि विजय यांच्याबद्दल बोलताना ते भारतीयांचा अतिशय तिरस्काराने उल्लेख करत होते. इथल्या एकेकाला त्याची जागा दाखवून देण्याबद्दल त्यांच्या गप्पा चालू होत्या. `त्यांची जागा?' हे ऐकताना अ‍ॅनाला मनातल्या मनात आश्चर्य तर वाटत होतेच; पण तिला फार अस्वस्थदेखील वाटत होते. `त्यांच्याच देशात, त्यांची कोणती जागा असेल?'

तिच्या मनात विचार येत होते. त्यांचे हसणे, पुâशारक्या आणि वांशिकदृष्ट्या आपणच श्रेष्ठ आहोत ही त्यांच्या बोलण्यातून जाणवणारी उर्मट खात्रीची भावना या सर्व गोष्टींनी त्या वेल्समधल्या तरुण मुलीच्या मनावर एक कडवट ठसा उमटवला. 

अचानक ते उत्तम जेवण, खिडकीतून पाझरणारे झNयाचे झुळझुळ संगीत, टेबलांभोवतालची रंगीबेरंगी वर्दळ यांबद्दल तिच्या मनात एक तिरस्काराची भावना उसळली. काळोखात उभे असलेले; काही अशुभ घडणार आहे, असे सूचित करणारे ते काळे लोक आणि टेबलाभोवती बसलेल्या गोNया लोकांच्या चेहNयावरचा प्रत्येक
भाव, प्रत्येक हालचाल काळजीपूर्वक टिपत असलेले, यांत्रिकपणे हालचाल करणारे हे लोक मनात काय विचार करत असतील? त्यांच्या या प्राचीन भूमीवर कब्जा करणाNया या गोNया लोकांचा ते तिरस्कार, द्वेष करत असतील का? गप्प बसलेली काळी माणसेही खरी हाडामांसाची, भावना असलेली माणसे आहेत, असा विचार
तिच्याशिवाय तिथला कोणताही माणूस करत नव्हता. सर्व पाहुण्यांच्या दृष्टीने ती सगळी दगडी िंकवा लाकडी कळसूत्री बाहुल्या होत्या. जिवंत मनुष्य म्हणून त्यांच्या लेखी त्यांना काही अस्तित्वच नव्हते.

Thursday 21 November 2013

डिसेप्शन पॉर्इंट

घटनामालिकेची नांदी

ती एक निर्जन जागा होती. जगण्यासाठी अनुवूâल असे तिथे काहीही नव्हते. टंड्राम
धील विस्तीर्ण, हिमाच्छादित व वनस्पतीविरहित असे जणू काही ते एक हिमााच्छादित वाळवंट होते. येथून पुढे उत्तर ध्रुवाभोवतालचा समुद्र सुरू होतो. तरीही तो प्रदेश भव्य होता, उदात्त भासत होता, मनावर छाप पाडणारा होता; पण ती भव्यता, उदात्तता व छाप ही हिंदाा होती, घातकी होती, जीवघेणी होती. अशा ओसाड जागी येणारा मृत्यू हा विविध स्वरूपात अवतीर्ण होतो.

पण तरीही मृत्यूच्या त्या हिंदाा छायेत एक माणूस सतत जाऊन येत होता. तो एक भूशाध्Eाज्ञ होता. जमीन, खडक, भूभर्ग इत्यादींचे जे शाध्Eा होते, त्यात तो निष्णात होता. त्या विस्तीर्ण भूभागाचा तो अभ्यास करीत आलेला होता. त्याच्यावर आता एक अत्यंत रानटी पद्धतीचा व अनैसर्गिक असा घाला पडणार होता. त्याला
त्याची कल्पना नसल्याने त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी त्याने साहजिकच तयारी केली नव्हती. त्याचे नाव चाल्र्स ब्रॉफी होते. 

अतिउत्तरेकडील त्या हिमाच्छादित प्रदेशात नेहमीप्रमाणे चाल्र्स ब्रॉफी संशोधनासाठी परत गेला होता. त्याच्याबरोबर संशोधनाची संवेदनशील साधनसामुग्री होती. एवूâण सामान वाहून नेण्यासाठी व प्रवासासाठी एक घसरगाडी त्याने बरोबर घेतली होती. बर्फाळ भूमीवरून ही घसरगाडी ओढत नेण्यासाठी चार कुत्री त्याला जोडली होती. त्या गाडीवरून त्याचा प्रवास चालू होता. अचानक त्या घसरगाडीचा वेग मंदावत जाऊन ती थांबली. चारही कुत्री आपली नाके आकाशाकडे करून वरती पाहू लागली होती.

ब्रॉफी त्या गाडीवरून खाली उतरला व आपल्या कुत्र्यांना उद्देशून म्हणाला, ‘‘काय भानगड आहे, बच्चे मंडळी?’’

आकाशात वादळी ढग जमू लागले होते. त्या ढगांपलीकडून एक ाqट्वन-रोटर जातीचे वाहतूक करणारे हेलिकॉप्टर प्रकट झाले. एका वर्तुळाकृती मार्गातून ते खाली खाली आले. जमिनीवरील बर्फाच्छादित उंचवट्याच्या जवळून जात ते सरळ ब्रॉफीकडे येऊ लागले. त्यातून त्या वैमानिकाचे लष्करी कौशल्य प्रकट होत होते. ही काहीतरी वेगळी व चमत्कारिक घटना आहे, असे त्या भूशाध्Eाज्ञाला वाटले. इतक्या दूरच्या उत्तरेकडच्या भागात हेलिकॉप्टर आलेले त्याने आजवर कधीही पाहिले नव्हते. त्याच्यापासून सुमारे दीडशे पुâटांवरती ते हेलिकॉप्टर जमिनीला टेकले. त्या वेळी तिथल्या जमिनीवरील सैल व बोचNया हिमकणांचा एक फवारा हेलिकॉप्टरभोवती उसळला. घसरगाडीच्या कुत्र्यांना त्यात धोक्याची जाणीव झाली. ते घशातल्या घशात गुरगुरत आवाज करू लागले. त्यांच्या चेहNयावरती अस्वस्थता प्रकट झाली होती.

हेलिकॉप्टरची दारे सरकवली गेली व त्यातून दोन माणसे बाहेर पडली. त्यांनी आपल्या अंगावरती थंडीपासून बचाव करणारे खास पोषाख नखशिखान्त चढवले होते. ते पोषाख पांढNया रंगाचे होते. त्या दोघांच्या हातात रायफली होत्या. अत्यंत घाईघाईने ते दोघे ब्रॉफीकडे येऊ लागले.

‘‘डॉ. ब्रॉफी?’’ जवळ आल्यावर त्यांच्यातील एकाने विचारले. 

‘‘तुम्हाला माझे नाव कसे ठाऊक आहे? अन् तुम्ही कोण आहात?’’

‘‘तुमच्याकडे असलेला तो वायरलेस सेट आधी बाहेर काढा, प्लीज.’’

‘‘माझ्या लक्षात येत नाही. कशासाठी तो सेट मी बाहेर काढू?’’

‘‘तुम्ही तो नुसता बाहेर काढा. अन् ताबडतोब.’’

चक्रावलेल्या ब्रॉफीने आपल्या कोटाच्या आतल्या खिशातून तो छोटा वायरलेस सेट बाहेर काढला.

‘‘तुमच्या या सेटवरून आम्हाला एक तातडीचा निरोप पाठवायचा आहे.

सेटची प्रिâक्वेन्सी कमी करून ती शंभर किलोहर्ट्झवरती ठेवा.’’

शंभर किलोहर्ट्झ? ब्रॉफी आता पुरता गोंधळून गेला. इतक्या कमी प्रिâक्वेन्सीवरती कोणालाच संदेश घेता येत नाहीत. त्याने विचारले, ‘‘कुठे काही अपघात झाला आहे काय?’’

त्यावर त्या दुसNया माणसाने आपली रायफल उचलली व सरळ ब्रॉफीच्या डोक्यावरती रोखली व म्हटले, ‘‘हे पहा, सगळा खुलासा करत बसायला वेळ नाही. 

आम्ही सांगतो तेवढेच करा.’’

थरथरणाNया ब्रॉफीने आपल्या सेटची प्रिâक्वेन्सी शंभर किलोहर्ट्झवरती आणून ठेवली.

मग पहिल्या माणसाने एक कागद ब्रॉफीच्या पुढे केला. ते एक कार्ड होते व त्यावरती काही ओळी टाईप केल्या होत्या. तो म्हणाला, ‘‘यावरचा मजवूâर ताबडतोब प्रक्षेपित करा.’’

ब्रॉफीने त्या कार्डकडे पहात म्हटले, ‘‘पण मला हे काय चालले आहे ते समजत नाही. शिवाय या कार्डवरची माहिती चुकीची आहे. मी असले कधी...’’

यावर त्या समोरच्या माणसाने आपल्या रायफलीची नळी ब्रॉफीच्या कपाळावरती दाबून धरली.

ब्रॉफीचा आता नाइलाज झाला. तो घाबरला. थरथरत्या आवाजात कार्डवरची चमत्कारिक माहिती वायरलेस सेटवरून तो प्रक्षेपित करू लागला. सर्व मजवूâर प्रक्षेपित केल्यावर तो पहिला माणूस म्हणाला, ‘‘छान! आता
तुम्ही, तुमची ही कुत्री व सारे सामान हेलिकॉप्टरमध्ये चढवा.’’ 

बंदुकीच्या धाकाखाली त्या भूशाध्Eाज्ञाला ते ऐकणे भागच होते. त्याने मुकाट्याने आपली नाखूष झालेली कुत्री आणि ती घसरगाडी गोळा केली व हेलिकॉप्टरपाशी नेली. हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात सामान ठेवण्याची जागा होती. तेथून एक धातूची फळी बाहेर तिरपी होऊन जमिनीला टेकली होती. त्या फळीच्या उतारावरून ती कुत्री घसरगाडीसह आत चढवली गेली. त्यांच्यामागोमाग ते तिघेजण आत गेले. ताबडतोब हेलिकॉप्टरने आपल्या फिरणाNया पंख्याची गती वाढवली व ते आकाशात चढू लागले व त्याने पश्चिमेचा रोख धरला. 

‘‘हू द हेल आर यू? तुम्ही कोण आहात?’’ 

ब्रॉफी आता चिडून त्यांना विचारीत होता. त्याच्या अंगावरती सर्वत्र घामाचे झरे पुâटले होते. त्या चमत्कारिक मजकुराचा अर्थ काय? कशासाठी तो पाठवावा लागला? हे प्रथम त्याच्या मनात राहून राहून उमटत होते.
त्याच्या प्रश्नावर ती दोन माणसे काहीही बोलली नाहीत. ती नुसती गप्प बसून राहिली.

जेव्हा त्या हेलिकॉप्टरने पुरेशी उंची गाठली तेव्हा उघड्या दारातून आतमध्ये घोंगावणारा वारा घुसू लागला. ती चारही कुत्री अजूनही त्या घसरगाडीला जखडलेली होती. त्यांना त्या वाNयाचा त्रास होऊ लागल्याने ती विव्हळण्याचा आवाज काढू लागली.

ते पाहून ब्रॉफीने त्यांना म्हटले, ‘‘निदान तेवढे दार तरी लावून घ्या. माझी कुत्री किती घाबरली आहेत ते दिसत नाही का?’’ 

तरीही ती दोन्ही माणसे गप्पच राहिली. त्यांनी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

जेव्हा त्या हेलिकॉप्टरने ४००० पुâटांची उंची गाठली तेव्हा ते एका विशिष्ट भागाकडे जाऊ लागले. तिथे खाली बर्फाच्या दNया होत्या, बर्फाला मोठमोठे तडे गेले होते. रुंद भेगा पडल्या होत्या. हेलिकॉप्टर त्या भागावरून आता जाऊ लागले. अचानक ती दोन माणसे उठली, त्यांनी एक शब्दही न बोलता ती जड घसरगाडी
त्यावरच्या कुत्र्यांसह उचलली आणि उघड्या दारातून बाहेर टावूâन दिली. ब्रॉफी भयभीत होऊन ते दृश्य पहात होता. घसरगाडीला जखडलेली कुत्री खाली पडता पडताही सुटकेसाठी जिवाच्या आकांताने धडपडत होती. काही क्षणांतच ती घसरगाडी व कुत्री खालच्या हवेत अदृश्य होऊन गेली.

ब्रॉफी उठून उभा राहिला होता व तो विंâकाळी फोडण्याच्या बेतात होता. पण त्या दोघांनी मिळून त्याला धरले. घाबरलेल्या ब्रॉफीने आपल्या मुठी आवळून त्यांना ठोसे लगावण्याचा क्षीण प्रयत्न केला, पण त्या बलदंड माणसांपुढे त्याचे काहीही चालले नाही. भीतीने गोठून गेलेल्या ब्रॉफीला त्यांनी शांतपणे बाहेर पेâवूâन दिले.
ब्रॉफीच्या प्रतिकाराचा काहीही उपयोग झाला नाही. खाली सर्वत्र पसरलेल्या बर्फाच्या दNया व भेगा यांनी भरलेल्या गर्तेत तो कोसळू लागला. त्या भागात आजवर कधीही माणूस पोहोचला नव्हता व येथून पुढे पोहोचणार नव्हता. 

Wednesday 20 November 2013

Mehta Publishing House at Navin Marathi Prashala, Pune

In a bid to celebrate the joy of childhood and get children closer to books, Mehta Publishing House distributed free story books and chocolates to the students of Class I to V at Navin Marathi Prashala, Sadashiv Peth, Pune today. 

Praying before the interaction

Children telling us their Diwali celebrations during holidays

Student's enthusiasm 
Team Mehta Publishing House distributing story books to kids

Books distribution at Navin Marathi Prashala

Happy Students 
Happy Faces ... Different Moods



पर्व

``ज्याप्रमाणे राजिंसहासन थोरल्या भावाचं असतं, त्याप्रमाणे मुलीनं फक्त थोरल्याला दान म्हणून गेलं पाहिजे. दोन : थोरला राज्यावर बसला, तरी धाकट्यांनाही ज्याप्रमाणे राज्योपभोगात समान हक्क असतो, त्याप्रमाणे हिच्यावर प्रत्येकाचा अधिकार राहील. राज्यात जे घडतं, ते ज्याप्रमाणे राजाच्या नावावर
पडतं, त्याप्रमाणे हिच्यापोटी जन्मणाNया मुलांना थोरल्या धर्मराजाच्या नावानं नामकरण व्हावं. पण मुलांनी मात्र प्रत्येकाला पिता मानलं पाहिजे. मृत्यूनंतर प्रत्येकाला समान प्रमाणात जलप्रदान करायला हवं. पाच : नंतर कुठल्याही स्वयंवरात यापैकी कुणीही दुसNया कन्येला िंजवूâन आणली िंकवा युद्धात कुठल्या
राजानं कन्या अर्पण केली, तर तिनंही याच पद्धतीनं आचरण केलं पाहिजे. अशा इतर बायकांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी थोरल्या राज्ञीची. सहा...''

आता कशाला हव्यात त्या नियमांच्या आठवणी? सगळे नियम अर्जुनानं कितीतरी वेळा आपल्याला हवे तसे मोडले आहेत. फक्त स्वत:साठी, अशी एक पत्नीही करून आणलीय् त्यानं! आणि मी बसलेय् इथं धर्मराजाची पट्टराणी होऊन! त्याच्या राजाचं प्रतिरूप होऊन! त्याच्या द्यूताचा पण होऊन! अवमानित होऊन! वनवासी... रानटी लोकांसारखी वंâदमुळं आणि मांस खात! कुणाच्या तरी घरची चार कामं करून स्वत:ला सगळ्यांपासून दडवत! खरं आहे! कुठल्या आर्य ध्Eाीला मिळणार आहे हे भाग्य! पाचपट सुख, म्हणे! लग्न तरी का करतात, हे असले पण लावून? शक्तिवानानं िंजवूâन घ्यायचं, आपल्याला हवं तसं वाटून घ्यायचं आणि नको असेल, तेव्हा भिरकावून द्यायचं! कुणी सुरू केली ही स्वयंवराची क्षत्रिय पद्धत?...

``मुलं येताहेत. पाचहीजण एकाच रथातून. किती ऊन्ह हे!'' ज्योतिष्मति जवळ येऊन म्हणाली.

थोड्याच वेळात घरासमोर रथाचा आवाज ऐवूâ आला. पाचही मुलं रथातून उतरली.

कृष्णा उठून दरवाज्यापर्यंत गेली.

काय ह्या उन्हाच्या झळा! नुसतं रणरणत होतं समोरचं अंगण! मुलांचे चेहरे आणि सर्वांग घामानं डबडबून गेलं होतं. त्यावर धुळीचा लेप चढला होता. सगळे आत आले. स्नान केलं. तोवर दासीनं शिजवलेले खाद्यपदार्थ आणून ठेवले होते. ज्योतिष्मतीनं जेवायची बाकीची व्यवस्था केली होती. स्वत: कृष्णा आग्रह कर-करून त्यांना जेवायला वाढत होती.

त्यांचं जेवण होताच तीही जेवली. पोटात अन्न पडताच मुलांना जांभया येऊ लागल्या. बाहेर उन्हाचा दाह पसरला होता. वाळ्याचे पडदे सोडून, त्यावर पाणी मारून थंड केलेल्या खोलीत ज्योतिष्मतीनं लाकडी फळ्यांवर चटया अंथरून मुलांसाठी झोपायची व्यवस्था केली होती. एका ओळीत डोकी येतील, अशा
रीतीनं पाचही मुलं झोपली. पाय मात्र थोडे वर-खाली होते. प्रतििंवध्याची उंची थोडी कमी होती. धाकटा श्रुतसेन सगळ्यांत उंच होता. हा कुणासारखा आहे? इतरांपेक्षा जरा जास्त बोलका आहे हा. पण कुणाचीच देहयष्टी भीमासारखी नाही. प्रत्येकाच्या चेहNयावरून आणि शरीर-यष्टीवरून फिरणारी दृष्टी तिचा
गोंधळ वाढवत होती. एकाची हनुवटी नकुलासारखी वाटली, की नाक अर्जुनासारखं वाटत होतं. एकाचा चेहरा सहदेवासारखा वाटला, तरी ओठांची ठेवण कुणासारखी आहे, याचा तिच्या मनात गोंधळ उडत होता. पाच पांडवांची मुलं आहेत, त्यामुळं एकाशीच साम्य दिसत नाही, असं तिनं मनाशी समाधानही करून घेतलं.

प्रतििंवध्याचा स्वभाव फारसा बोलका नव्हता. तो मुकाट्यानं उताणा पडून, आढ्याकडे दृष्टी खिळवून काही तरी विचारात गढून गेला होता. इतर चौघंही युद्धाच्या वेळी शत्रू कुठून आला, तर आपण कसा बाण टाकायचा, याचा विचार करत होते.

सर्वांत आधी श्रुतसेन झोपी गेला. त्यापाठोपाठ श्रुतसोमानं बोलणं थांबवून डोळे मिटले. श्रुतर्कीित आणि शतानिकही जांभई देऊन कुशीवर वळले. थोरला मात्र आतापर्यंत त्यांच्या गप्पांतही रमला नव्हता आणि आता झोपण्यातही सहभागी झाला नाही. तसाच आढ्याकडे दृष्टी खिळवून उताणा पडून होता. हातात पंखा घेऊन, त्या पाचही जणांच्या उशाशी बसून सावकाश वारा ढाळणारी कृष्णा त्याच्याकडे पाहत होती. त्याला अजूनही जागाच पाहून तिनं विचारलं, ``झोप येत नाही, का, बाळ?''

``मला तशी दुपारी झोपायची सवय नाही.''

``थकला नाहीस सराव करून?''

``एवढा काही नाही.''

याचं बोलणं बेताचंच. मनाला वाटेल, ते मोकळेपणानं बोलणं तर त्याहूनही कमी. इथं येऊन पाच महिने झाले. आतामात्र क्वचित कधी तरी आईशी थोडाफार बोलत होता. तेही फक्त जवळपास कुणी नसताना िंकवा ती एकटीच आपल्याच विचारात चूर होऊन बसली असताना.

काही तरी बोलायचं, म्हणून तिनं विचारलं, ``पाठीमागून शत्रू आला, तर काय करायचं, हे कुणी शिकवलं तुला?''

``अभिमन्यूनं.''

``बाळ, तो फक्त सोळा वर्षांचा आहे. तू चोवीस वर्षांचा. धर्नुिवद्येत त्यानं तुम्हांला शिकवावं, एवढे मागं राहिलात? तुमच्या मामानं तुम्हांला नाही का शिकवलं?''

``शिकवलंय् ना! चांगलं शिकवलंय्. पण अभिमन्यूला त्याचे बाबा शिकवतात, नाही का! आणि ते जितके कसलेले धनुर्धारी आहेत, तेवढं संपूर्ण आर्यावर्तातही कुणी नाही. मामानं आम्हांला आपल्याकडंच सगळं कौशल्य शिकवलंय्.''

आढ्याकडे पाहत प्रतििंवध्य अगदी सरळ आणि सहजपणे सांगत होता. पण त्याच्या या बोलण्यामुळं कृष्णेच्या हृदयात मात्र काही तरी बोचल्यासारखं झालं.

अर्जुन आपल्या मुलाला आपलं कौशल्य शिकवत आहे, हे काही वाईट नाही. पण हीही त्याचीच मुलं आहेत ना! की ही पाचजण धर्मराजाची आहेत, असं हा समजतो?

एकाएकी तिच्या मन:पटलासमोर आजवर कधीच न जाणवलेला अर्जुनाच्या स्वभावाचा एक पैलू प्रकर्षानं सामोरा आला. चतुर, रसिक, वीर, सुंदर, अहंकारी, स्वार्थी, सुखाकांक्षी असं अर्जुनाचं रूप तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. अभिमन्यूचं लग्न ठरल्याची बातमी कानांवर येताच कुठं तरी सुप्त रूपानं दडलेली भावना आता रूप घेऊ लागली. त्याच्याविषयी तिरस्कार... समोर येऊन उभा राहिला, तर अवाक्षरही न बोलण्याएवढा प्रचंड तिरस्कार उफाळून आला.

पाचही मुलांना वारा ढाळत ती तशीच बसून राहिली. प्रतििंवध्य तसाच उताणा आढ्याकडे पाहत झोपला होता. त्या नीचाला धर्माची िंकचितही चाड नाही. धर्माचं जे काही ओझं असेल, ते फक्त माझाच चेंदामेंदा करण्यासाठी आणि त्या धर्माची धग असेल, तर ती मला अंतर्बाह्य पोळून शिजवून काढण्यासाठी! कुणाला कशाला हवा हा धर्म! त्यातही अर्जुनाला!

रोज एकेकाप्रमाणे पाच रात्री विवाह साजरा झाला माझा. त्यानंतर सहाव्या दिवशी... हो. नक्की आठवतं. सहाव्या दिवशी दुपारी राजमाता वुंâतीनं मला बोलावणं पाठवलं. दोन्ही हातांनी जवळ घेत सांगितलं, ``मुली, तू पाचही जणांची झालीस. आता तुला मी एक परम-धर्माची गोष्ट सांगते. ती सतत तुझ्या लक्षात असू दे. पतीच्या उत्कर्षासाठी झटणं हा आर्य-

ध्Eाीचा एकमेव धर्म आहे. हे तुलाही ठाऊक आहेच. तुझे पाचही पती एकत्र राहतील, तरच ते स्वत:चं रक्षण करू शकतील आणि आपलं राज्यही पुन्हा मिळवू शकतील. कुठल्याही कारणानं त्यांच्यात पूâट पडली, तर वाळवी लागून भलामोठा महाल मातीत मिसळून जावा, तशी गत व्हायला वेळ लागणार नाही. आजवर कधीही एकमेकाला शब्दानंही न दुखावणारी माझी मुलं तुझ्यावरच्या मोहापायी एकमेकाच्या जिवावर उठली होती! तू मिळाल्यावर आता पुन्हा एक दिलानं उभी आहेत. तुझा कटाक्ष जरी एखाद्याला जास्त मिळत आहे, असा
इतरांना संशय आला, तर पुन्हा त्यांच्या मनात किाqल्मष निर्माण होईल. त्यामुळं पाचहीजणांवर काया-वाचा-मनानं सारखं प्रेम करायला हवंस तू! हे तुझं व्रत झालं पाहिजे.''

सुनेला सासूनं उपदेश केला– आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी! या धर्माचं पालन करताना मी काय काय भोगलंय, हे कुणाला समजणार? काया! वाचा! पण मन? तेही समान प्रमाणात वाटणं ही काय माझ्या हातातली गोष्ट आहे? कुणाच्या हातातली गोष्ट आहे ही? राजमातेला कसा कळणार मनाचा बलिष्ठ धर्म? बोलणं कुणाबरोबर कमी नाही, की जास्त नाही. कुणाला हसून आणि कुणाला कपाळावर आठ्या घालून, असंही कधी केलं नाही. जसं धर्माला, तसंच नकुल-सहदेवालाही स्वयंसमर्पण! पण अर्जुनाखेरीज इतर कुणाशी मनाचं सामीप्य कसं शक्य होतं? अंतर्मनच बोलण्याचं रूप घेऊन बाहेर येत होतं. प्रेमकलेतच नव्हे, तर प्रेम-संभाषणातही चतुर असलेला अर्जुन संभाषणाच्या ओघात मनातलं सारं बोलायला भाग पाडत होता. अशा वेळी वाचा मनाशी द्रोह करत होती. या दोहोंबरोबर शरीरही तसं वागल्याशिवाय कसं राहील? अर्जुनाबरोबरची रात्र या भूमीवरची राहतच नव्हती!

तरीही या कृष्णेनं इतरांची फसवणूक केली नाही! जे अर्जुनाला ती सहजपणे अर्पण करत होती, तेच इतरांना प्रयत्नपूर्वक, उसन्या उत्साहानं देत होती. नववधू द्रुपद राजकुमारीनं लग्नाच्या सहाव्या दिवसापासूनच या तळमळीत स्वत:ला झोवूâन दिलंय्! पाच पांडवांचं सख्य या मुठीत शाबूत ठेवण्यासाठी तिनं स्वत:च्या
तन-मनाची ससेहोलपट होऊ दिली आहे! आणि आता त्याच ऐक्याला आपण होऊन तडा जात असताना मी काय करू? माझी तडफड व्यर्थ गेली, म्हणून तळमळण्याखेरीज दुसरं काय आहे माझ्या हातात.

Tuesday 19 November 2013

Mr. Two Bomb

There were about twelve of us, that I know of, who survived the Atomic bombs of both Hiroshima and Nagasaki – and the question that I am asked more than any other is this: do I feel lucky? Were the Gods on my side as I lived through the nightmare of not one, but two Atomic bombs? Or were the Gods merely playing with me as I scurried from the hell of
Hiroshima straight into that Seventh Circle of hell in Nagasaki?

In short, the crux of the question is: have I been blessed – or cursed?

I understand how perplexing it is for these students of wisdom as they come to me in search of knowledge. On the one hand, it might be deemed unlucky in the extreme to have been in Hiroshima on 6th August 1945. Anywhere else on earth would have been preferable to being in that city on that brilliant blue morning. But to have survived Hiroshima and then to have travelled so unerringly to Nagasaki for a second dose of atomic radiation... that,  surely, must be considered ‘Unlucky – to the Power of Two’. And why not add the fact that Nagasaki was never supposed to have been bombed in the first place? That second bomb was originally destined for Kokura on 9th August; at one stage, the B29 bomber was directly over Kokura and within seconds of dropping its payload. But as it was, the clouds closed in, Kokura was saved and Bock’s Car turned South to drop its bomb on Nagasaki, where I had been waiting all of 90 minutes to meet my destiny.

So I appreciate that in many ways I might be considered unlucky. 

I have, however, survived. I have pulled through. Not without injury, it has to be said. But I have lived to write my tale – and so, in that respect, I have had the most extraordinary luck. The bombs are how people best know me. The children on the streets would point me out and the name they gave to me was ‘Two-Bomb San’. With the passing of the years, it has
been shortened simply to ‘Two-Bomb’ – and I have come to like the name.

It is not the whole of what I am, but nevertheless those two bombs are what have come to define me. For what it is worth, this is what I believe to be true: I have been lucky. I would go further. I would say I am one of the luckiest men alive. And that is not just on account of having lived through those two bombs and come out the other side. For what I must also take into account is how those two bombs – Little Boy and Fat Man as they were called by the Yankees – have transformed my life, injuries and all.

This, by the way, is not an apology for the bombs. It is not an apology for the Americans; nor for the Japanese. It is not an analysis of the beginning of the war; nor an evaluation of
whether those two bombs brought the war to a speedier end. And it is certainly not to demean, or make light of the suffering of all the hundreds of thousands of victims and their families. Since the war, I have lived in several countries, including that of our old enemy, the Yankees. As a result, this account is not, perhaps, as solemn as many of the stories of the bombs.

But then, I am not a solemn person. There has been much misery in my life, but there has been much joy with it. And although I will never forget my days in Hiroshima and Nagasaki – indeed can never forget my days in those illstarred cities – I choose instead to count my blessings. Out of the ashes of Hiroshima and Nagasaki were to spring the most incredible shoots; not that I even remotely deserved them. Of all the Atom bomb survivors, or Hibakusha as we are known, there is not a single one who was not more deserving of happiness than myself. So every day now I give thanks for the great good fortune that has been thrust into my lap; and when I consider also the immense grief that came from those two bombs, I can only weep at the magnitude of my own joy.

There were so many heroes at Hiroshima and Nagasaki: great men and women who rose to the occasion and gave the very best of themselves; and children too, who without complaint
have struggled for decades to deal with their injuries. But I am not like that. I was never a hero and, though I survived both bombs, have never done anything heroic. Well – possibly the once; but even that was probably more animal impulse than a conscious act of courage.

The truth was that before the bombs, I was... I was a despicable human being. How you would have despised me! And had I thought to think it, I would even have despised myself.