Saturday 16 November 2013

राधेय

कुरुक्षेत्राची विस्तीर्ण, विशाल रणभूमी उदास, उजाड वाटत होती. आकाशी सूर्य तळपत असूनही, त्या भूमीचे तेज ओसरले होते. ज्या भूमीवर एवढा घनघोर रणसंग्राम झाला, त्या भूमीवर वीरांच्या चिता रचल्या जात होत्या.

विजयाच्या आकांक्षेने, जन्ममृत्यूचे भय न बाळगता, शत्रुरुधिराच्या तहानेने रणभूमीवर सदैव वावरणारे जीव विजय संपादन करूनही, त्याच रणभूमीवर नतमस्तक होऊन धारातीर्थी पडलेल्या आपल्या वीरांचा शोध घेत होते. जयपराजयांचा अर्थ केव्हाच संपला होता. ज्यांच्या चाकांच्या भेदक वेगाने रणभूमीला लक्षावधी चाकोNया पडल्या, त्या भग्न रथांच्या राशी त्या रणांगणावर एकत्रित केल्या जात होत्या. आपल्या गंभीर मंत्राने अचेतनामध्येही जीव ओतणाNया रणनौबतींना तडे गेले होते. आपल्या दीर्घ नादाने विजयाचा विश्वास देणारे शंख, बाणांच्या सड्यांनी आच्छादलेल्या भूमीवर विखुरले होते. आता रणवाद्यांच्या राशीत तेही विसावले गेले. रणांगणावर छाया फिरत होती अतृप्त गिधाडांची. रणांगणाच्या िंचतेने सदैव
अस्वस्थ असणारे पाच पांडव, धौम्य, संजय, विदुर, युयुत्सु यांच्यासह सेवकांच्या मदतीने वीरांचे दहनकर्म पार पाडीत होते. एक एक चिता अग्निशिखांमध्ये धडाडू लागली. धरतीवर पुण्य अवतरावे, म्हणून एके काळी
जी भूमी सुवर्णनांगराने नांगरली गेली होती, त्या कुरुक्षेत्रावर उठलेले धुराचे शेकडो काळेकभिन्न लोट आकाशाला भिडले होते.

वीरांच्या दहनाची व्यवस्था लावून, सारे खिन्न मनाने गंगेकडे चालू लागले. मध्याह्नीचा सूर्य पश्चिम क्षितिजाकडे ढळला होता. गंगेचा विशाल, निळाशार प्रवाह त्या सूर्यकिरणांत तळपत होता. तापल्या वाळूवरून गंगेकडे जाणाNयांना, गंगेच्या दर्शनाने ना प्रसन्नता लाभली होती, ना पायांखालच्या दाहाची जाणीव होत होती.

विजयी पांडव आणि पराजित कौरव दोघांच्याही जय-पराजयांच्या ऊर्मी दहनभूमीच्या अंगारात जळून गेल्या होत्या. गेल्या जीवांच्या वियोगाने व मागे राहिलेल्यांच्या खंतीने साNयांची मने पोखरून गेली होती. गंगेच्या वाळवंटावर तात्पुरते शिबिर उभारले होते. नतमस्तक झालेले, खिन्न वदनाने आणि मंद पावलांनी गंगेकडे जाणारे वीर दिसताच त्यांच्या वाटेकडे लक्ष देऊन बसलेल्या शिबिरातील राजध्Eिाया आपल्या परिवारासह उठल्या आणि नदीकडे चालू लागल्या.

युधिष्ठिर गंगेच्या प्रवाहामध्ये जाऊन गुडघाभर पाण्यात उभा होता. नदीकाठच्या एका कातळावर राजमाता वुंâती बसली होती. तिच्या शेजारी द्रौपदी अधोवदन उभी होती. त्या दोघींच्या मागे तटस्थपणे कृष्ण उभा होता... भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आपल्या स्वकीयांच्या समूहात वाळूकिनाNयावर व्यथित मनाने बसले होते. पराक्रमाचा अहंकार नव्हता, प्रतिज्ञांची जाणीव नव्हती, विजयाचा आनंद नव्हता. बाहुबलाचे तेज केव्हाच सरले होते. आठवण होती फक्त विजयासाठी रणांगणी बळी गेलेल्या वीरांची!

नदीपात्रात उभा असलेला युधिष्ठिर एकेका वीराचे नाव घेऊन तिलांजली देत होता. त्या उच्चारल्या जाणाNया नावाबरोबर आठवणींचे उमाळे येत होते. दाटलेले अश्रू गालांवरून निखळत होते.

साNया वीरांना तिलांजली दिली गेली.

युधिष्ठिराने मागे न पाहता विचारले, ‘विस्मरणानं कोणी वीर राहिलाय् का?’

सारे एकमेकांकडे पाहत होते. मनात नावे आठवत होते, कोणी राहिल्याचे स्मरत नव्हते.

राजमाता वुंâतीच्या मनात त्या शब्दांनी एकच भावनांचा कल्लोळ उसळला. बसल्या जागी तिचे सारे शरीर कापू लागले, ओठ कोरडे पडले. तिचे शुष्क नेत्र अज्ञात जिव्हाळ्याने भरून आले. वुंâतीने आशेने कृष्णाकडे पाहिले.

कृष्ण तसाच एकाग्रपणे गंगेच्या प्रवाहाकडे पाहत होता. त्याच्या नेत्रकडांवर अश्रू गोळा झाले होते.

युधिष्ठिर वळणार, हे पाहताच सारे बळ एकवटून वुंâतीने हाक मारली, ‘कृष्णा ऽ!’ कृष्णाने वुंâतीकडे पाहिले.
‘कृष्णा, तू तरी ऽ ऽ’

वुंâतीला पुढे बोलवले नाही.

सारे कृष्णाकडे पाहत होते.

कृष्णाने उभ्या जागी एक दीर्घ श्वास घेतला, आपले उत्तरीय सावरले आणि तो गंगेच्या दिशेने चालू लागला.
युधिष्ठिर वळतोय्, हे ध्यानी येताच कृष्णाने दुरूनच हाक दिली, ‘थांब, धर्मा, वळू नकोस.’

गंगेच्या प्रवाहात उभ्या असलेल्या युधिष्ठिराजवळ जात असता आपले वध्Eा सावरण्याचेही भान कृष्णाला राहिले नाही. कृष्ण जवळ जाताच युधिष्ठिराने विचारले, ‘कृष्णा, साNयांना तिलांजली दिल्या गेल्या...?’
नकारार्थी मान हलवीत कृष्ण म्हणाला, ‘नाही! धर्मा, अद्याप एक तिलांजली द्यायला हवी.’ ‘अशक्य! कृष्णा, पराजयात साNयांचंच विस्मरण होतं; पण विजय आपल्या वीरांना कधीही विसरत नाही. या मिळवलेल्या विजयाची निरर्थकता या तिलांजली-प्रसंगानं मला पुरेपूर समजलीय्. ते दु:ख आणखी वाढवू नकोस. असा वीर कोण आहे, की ज्याचं मला विस्मरण व्हावं!’

कृष्णाने उभ्या जागी आवंढा गिळला. आपल्या भावना शक्य तो आवरण्याचा प्रयत्न तो करीत तो म्हणाला,
‘धर्मा, ज्याच्या तिलांजलीला अग्रहक्क द्यावा, असा तो वीर; तुमच्या विजयासाठी ज्यानं स्वेच्छेनं मृत्यूचं आव्हान पत्करलं, तो वीर; तुम्ही ज्याला शत्रू मानत होता, पण तुमचा ऋणानुबंध ज्याला सदैव ज्ञात होता, असा तो एकच वीर आहे...’

कृष्णाच्या बोलण्याने धर्म भयव्यावूâळ झाला. तो कष्टाने उद्गारला, ‘पितामह भीष्माचार्य! अशक्य, ते तर उत्तरायणाची वाट पाहत आहेत. त्याखेरीज ते देह ठेवणार नाहीत. उत्तरायणास अद्यापि अवधी आहे. असा अपमृत्यू..’

‘नाही, युधिष्ठिरा, मी पितामहांबद्दल बोलत नाही. मी बोलतोय् महारथी कर्णाबद्दल...’ ‘कर्ण! राधेय..?’ युधिष्ठिराचा सारा संताप त्या एका नावाबरोबर उफाळला. तो निश्चयपूर्वक म्हणाला, ‘नाही, कृष्णा, माझ्या शांत स्वभावालासुद्धा मर्यादा आहेत. माझ्या नीतीचे बंध निश्चित आहेत. ज्याला मी शत्रू मानलं, त्याला मी तिलांजली देत नसतो.’

‘तो तुझा आप्तस्वकीय असला, तर...?’

No comments:

Post a Comment