Saturday 22 February 2014

संभाजी

रायगडावर शंभूराजे पोचले. त्यांनी फडावरच्या कामात दिवसभर स्वत:ला गुंतवून ठेवले होते. तेथे चित्त लागेना म्हणून ते घोड्यावरून जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन पोचले. त्यांनी आपल्यासोबत कोणाही मानकNयांच्या पालख्या वा घोडी येऊ दिली नाहीत. मंदिरातल्या त्या शांत, थंडगार गाभाNयात बराच उशीर ते तसेच बसून राहिले. राजमहालाकडे येता येता त्यांनी बारुदाच्या कोठारांना भेट दिली. लौकरच औरंगजेबाचे आक्रमण अपेक्षित होते. ते स्वत:ला कामामध्ये खूप गाडून घेत होते, पण त्यांचे अंतर्मन दूर कुठेतरी भटकत होते.

काही केल्या शंभूराजांच्या डोळ्यांसमोरून बाळाजी चिटणिसांची ती घाNया डोळ्यांची, कनवाळू मूर्ती हलता हलत नव्हती. त्यांनी दोन दिवसांमागे कलशांकडून औंढाच्या माळावरची ती हकिगत पुन्हा एकदा मुद्दाम ऐकली होती आणि ते भेसूर, भयानक चित्र त्यांच्या मेंदूमध्ये गच्च रुतून बसले होते. आपला मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना अण्णाजी दत्तो मात्र बिलवूâल कचरले नव्हते. उलट मारेकNयांच्या
शध्Eाांकडे ते काहीशा निर्ढावल्या, बेदरकार नजरेने बघत होते. राजांशी उभा दावा धरल्याच्या गुन्ह्यासाठी एक ना एक दिवस अशी शिक्षा आपल्या नशिबी ठेवली आहे, याची जणू त्यांना पूर्वकल्पना होती.
बाळाजी चिटणिसांची हकिगत खूपच हृदयद्रावक होती! त्यांच्या अस्सल पत्राने साराच घोटाळा उघड झाला होता. इतर अपराध्यांना जिवे ठार मारल्याचे दु:ख शंभूराजांना अजिबात नव्हते. मात्र या गडबडीत राज्यातले अत्यंत निष्ठावंत, सहृदय आणि निष्पाप असे बाळाजी चिटणीस हकनाक गेले, हे मात्र त्यांच्या जिव्हारी लागले! सायंकाळी शंभूराजे आपल्या महालाकडे परतले. मात्र त्यांची पावले चंदनी उंबरठ्यावरच अडखळली.

औंढाच्या माळावर गुन्हेगारांचा नि:पात झाला, तरी त्या गुन्ह्यातली एक अस्सल गुन्हेगार व्यक्ती आपल्याच सप्तमहालामध्ये राहते आहे, या विचाराने त्यांचे चित्त खवळले. ताडताड पावले टाकत शंभूराजे सोयराबार्इंच्या महालाकडे निघाले. 

अचानक दौडत येऊन बाजारात घोडेस्वार घुसल्यावर बकNयाकोंबड्यांची गर्दी भिरभिरत दूर पळून जावी, त्याप्रमाणे पोरेसोरे, चाकर, खिदमदगार यांची पळापळ उडाली. सोयरा-बार्इंच्या महालाकडील दासदासी आणि कुणबिणी पुढे ठ्यां पळू लागल्या. शंभूराजांची उग्र चर्या पाहण्याची हिंमतच कोणात उरली नव्हती. त्यातल्या
त्यात सेवकांना शहाणपण सुचले. राजे उंबरठ्यावर पोचण्यापूर्वीच त्यांनी आतून दरवाजा ओढून घेतला. भिंतीतला खांबासारखा भलामोठा अडसरही आतून लावला गेला.

शंभूराजे महालाच्या दारात पोचले. ते समोरच्या बंद दरवाजाकडे दात ओठ खात हाताच्या मुठी वळत पाहू लागले. ती कोणी व्यक्ती उरली नव्हती. जळत्या, भडकत्या चुलाण्यावरची ती उकळलेली काहीलच होती जणू! दरवाजाकडे पाहात शंभूराजे मोठ्याने गरजले, ‘‘मातोश्री, महालाच्या दारंखिडक्या बंद केल्या म्हणून पापं काही लपत नाहीत! जेव्हा प्रथम आम्ही तुम्हांला नजरवैâदेत टाकलं होतं, तेव्हाच तुम्हांला बजावलं होतं — इथे आपण दयाबुद्धीवर नव्हे तर सख्ख्या मातेच्याच अधिकारानं राहा! पण मातोश्री, आपण कारस्थानांची परिसीमा गाठलीत. 

राजमातेच्या जागी एका स्वार्थी, कावेबाज आणि कारस्थानी अशा हिडीस स्त्रीचं दर्शन घडवलंत! मातोश्री ऽऽ आत का लपून बसलात? उघडा दरवाजा!!...’’ शंभूराजांच्या अंगात भडकलेली आग अधिकाधिक भडकत होती. त्यांच्या रौद्र रूपाशी सामना करायची कोणातही हिंमत नव्हती. आपल्या डोळ्यांतून जळते निखारे पेâकत शंभूराजे गरजले, ‘‘मातोश्री, त्या वैâकयीनेही लाजून मान खाली घालावी अशी आपली कृष्णवृ âत्यं! राज्याचे कायदेशीर वारसदार असताना आपण गड्यामाणसांकडून आम्हांला गिरफ्तारीचा हुवूâम पाठवता?.... एकदा नव्हे दोन दोन वेळा आमच्या प्राणावर उठता?... अहो, कुठे त्या मातोश्री पुतळाबाई, ज्यांनी शिवाजीराजांचे जोडे आपल्या हृदयाशी कवटाळून आगीत उडी घेतली. सती गेल्या. अमर झाल्या! आणि इकडे शिवाजीचं स्वराज्य केवळ स्वार्थासाठी आपण त्या औरंगजेबाच्या पोराच्या झग्यात पेâकायला निघाला होता? अरे, तुम्ही कसल्या आमच्या मातोश्री? तुम्ही तर पुतनामावशी!!...’’

महालाच्या पल्याड बोळातून रहिवाशांची गर्दी झालेली. स्वारशिपाई लपतछपत राजांचा तो उद्रेक ऐकत होते. पुढे जायची कोणात हिंमत नव्हती. तितक्यात पाठीमागच्या गर्दीने भांग दिला आणि आपली करारी पावले टाकत येसूबाई राणीसाहेब तेथे पोचल्या. त्यांनी उखळत्या शंभूराजांचा हात पकडला आणि कठोर सुरात सुनावले, ‘‘नाथ, आपण राजे आहात. राजासारखं वागावं.’’ शंभूराजांनी येसूबार्इंचा हात झिडकारला. आपला हात उंचावत ते गरजले, ‘‘आमच्या राजमातेनं काय वैâदाशिणीसारखे वर्तन करावं? आमच्या अष्टप्रधानांनी
वैNयापुढं नमाज पढावा आणि सुरे आमच्या गळ्यावर ठेवावेत?’’

‘‘राजे, कृपा करा. राग आवरा—’’

‘‘सोडा येसूबाई! आपण आमच्या रागालोभाचं काय घेऊन बसला आहात!

केवळ ह्या आपल्या राजारामांची मातोश्री आहेत म्हणूनच.... नाही तर यांना कधीच भिंतीत चिणून मारलं असतं.’’

No comments:

Post a Comment