Saturday 14 December 2013

रुचिरा : भाग २

बेगमीचे पदार्थ

उन्हाळा आला, की पूर्वी घरोघरी बायकांची उन्हाळी कामे करण्याची धांदल उडत असे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनामुळे नोकरी करणाNया महिला बाजारातून वेगवेगळे मसाले, लोणची, पापड असे तयार पदार्थ विंâवा हळद-पूड, तिखट, शिकेकाई-पूड असे वर्षभर लागणारे पदार्थ विकत आणतात. हल्ली बाजारी पदार्थांत
फार मोठ्या प्रमाणात भेसळ असते. यामुळे असे पदार्थ आरोग्यदृष्ट्या हानिकारक तर आहेतच, पण शिवाय ते खूप महागही पडतात. पूर्वीच्या आपल्या गार्हस्थ्य जीवनात कत्र्यासवरत्या अनुभवी महिला आपल्या
मुली-सुनांना बेगमीचे पदार्थ कसे करावेत, साठवावेत, या गोष्टी शिकवत असत. हल्लीच्या सुशिक्षित मुली शिक्षण चालू असेतो स्वयंपाकघरात विशेष रस घेत नाहीत. लग्न ठरले, की प्रथम स्वयंपाकाचे धडे घेऊ लागतात; त्यामुळे त्यांना बेगमीच्या, साठवणीच्या पदार्थांविषयी काहीच माहिती नसते. घराघरांतून वारसा-परंपरेने कित्येक खाण्याच्या गोष्टी चालत असतात. काय करावे, किती व कसे साठवावे, याची माहिती नवशिक्या गृहिणीला असणे जरुरीचे आहे.

तयार पदार्थ अडीनडीला आणावे. परंतु जास्त आणणे परवडत नाही व घरच्या माणसांना ते भरपूर देता येत नाहीत, म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत आठ-पंधरा दिवस कष्ट करून उन्हाळी कामे केली, तर बचत तर होईलच; पण चांगले पदार्थ वर्षभर सुखाने भरपूर खाता येतील. हल्लीच्या सहकारी घरबांधणीमुळे असणाNया सोसायटीतील चार-पाच गृहिणींनी एकत्र येऊन सर्वांसाठी पुरतील, इतके साठवणीचे पदार्थ केले, तर वेळ, पैसा व श्रम यांची बचत तर होईलच, पण बांधिलकीचे नातेही निर्माण होईल. या कामाला सुरुवात करण्यापूर्वी प्राथमिक तयारी करावी. 

घट्ट झाकणाचे पत्र्याचे डबे, बरण्या, धान्य साठविण्याचे डबे स्वच्छ धुऊन, उन्हात वाळवून घ्यावेत. वाळवणे करण्यासाठी लागणाNया साड्या, चादरी धुऊन ठेवाव्यात. जे जिन्नस करायचे, त्यांची यादी करून, त्यासाठी लागणाNया पदार्थांची यादी करावी. पेâब्रुवारी-मार्च महिन्यात तांदूळ, मिरच्या, वाल, शिकेकाई, हळवुंâडे,
िंचच, साबूदाणा, गूळ व मसाल्याच्या सामानाची खरेदी करावी. एप्रिल-मे महिन्यांत गहू, ज्वारी, डाळी, मीठ आदी जिन्नस खरेदी करावेत. सर्वप्रथम धान्य, डाळी इत्यादी वस्तूंच्या साठवणीची माहिती घेऊ. 

तांदूळ : आपल्या आवडीप्रमाणे तांदूळ घेऊन, त्यांना बोरिक पावडर विंâवा एरंडेल तेलाचा पुसट हात लावून, भरून ठेवावे. पाNयाच्या गोळ्या घातल्या, तरी चालतील.

गहू : गहू किमान चार दिवस कडक उन्हात पसरून ठेवावेत. शेवटच्या दिवशी उन्हात गरम असलेले गहू डब्यात भरून झाकण लावावे. 

डाळ : हरभरा व तूर डाळी चार दिवस कडक उन्हात वाळवून डब्यात भराव्यात. उडीद-डाळ दोन दिवस उन्हात वाळवून भरावी.

साबूदाणा : दोन दिवस कडक उन्हात वाळवून भरून ठेवावा.

कडधान्ये : वाल दोन प्रकारचे असतात. हिरवट रंगाचे व तांबूस रंगाचे. वाल निवडून घेऊन दहा-बारा दिवस उन्हात घालावे. पक्ष्यांचा त्रास टाळण्यासाठी कापडात पुरचुंडी बांधून, ती वीस दिवस तरी उन्हात ठेवून द्यावी. त्यानंतर एरंडेल तेलाचा पुसट हात लावून, भरून ठेवावे. हे वाल दोन वर्षेसुद्धा चांगले टिकतात. 

पावटा : वालाचाच एक प्रकार. याचे पांढरे मोठे दाणे असतात. कमी वेळात शिजतात व चवीला गोड असतात. वालांप्रमाणेच वाळवून भरून ठेवावे. 

चवळी : पांढNया रंगाची बारीक व मोठ्या दाण्याची अशी दोन प्रकारात असते. भाजून उसळ व ताक घालून कळण चांगले होते.

मटकी : बारीक व जाड अशी दोन प्रकारात.

मूग : हिरवे व पिवळे अशा दोन प्रकारांत असतात. हिरव्या मुगाची उसळ चवीला जास्त चांगली असते.

मसूर : बारीक व मोठी हे दोन प्रकार. मोठी मसूर चवीला जास्त चांगली. 

हरभरा : हिरवे व पिवळे या दोन प्रकारात असतात.

वाटाणे : हिरवे व पिवळे. वरील सर्व कडधान्ये आठ-दहा दिवस कडक उन्हात वाळवून, एरंडेल तेलाचा
हात फिरवून, भरून ठेवावीत; म्हणजे चांगली टिकतात. 

No comments:

Post a Comment