Friday 20 December 2013

अण्णा हजारे

अण्णांचा भ्रष्टाचारविरोधी

अविरत लढा

अण्णा हजारे अतिशय साधे असून त्यांचे आयुष्याबाबतचे तत्त्वज्ञानही साधे आहे. मात्र त्यांनी मिळवलेले यश साधे नाही. त्यांचे कामच इतके बोलते की, आणखी खुलासा करण्याची गरजच पडत नाही. मात्र अण्णा सतत खुलासा करीत असतात. त्यांच्या समाजसेवी कार्याबद्दल अण्णांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, कृषिभूषण तसेच इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्काराचा समावेश आहे. अमेरिकेतील ‘केअर इंटरनॅशनल’ आणि दक्षिण कोरियातील ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या मानाच्या संस्थांनीही अण्णांचा गौरव केला आहे.

अण्णांचे व्यक्तिगत स्पष्टीकरण वेगवेगळ्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णांनी स्वत:विषयी केलेले
स्पष्टीकरण थोडक्यात येथे उद्धृत केले आहे : 

`माझ्यासाठी काहीही काळे आणि गोरे नाही. एक तर ते काळे आहे िंकवा गोरे. भ्रष्टाचाराविरुद्ध मी दिलेल्या लढ्यामुळे महाराष्ट्रातील हजारो नागरिकांच्या हृदयात मला स्थान मिळाले आहे. देशातही अन्यत्र हे स्थान मला लाभले आहे.’

`अलेक्झांडर द ग्रेटसारखा जगज्जेतासुद्धा मृत्यूनंतर स्वर्गात जाताना स्वत:समवेत काही घेऊन जाऊ शकला नाही. असे असताना संपत्ती मिळविण्याची एवढी लालसा कशासाठी? शेवटी जीवन म्हणजे तरी नक्की काय? दुसNयांशी चांगले वागणे. 

त्यांच्या कामी येणे. खरे पाहता सेवेतही मोठा आनंद आहे. साठच्या दशकात हा संदेश माझ्या मनात खोलवर रुजला गेला, आणि मला सतत प्रेरणा देत गेला. मी कधीही माघार घेणार नाही. देशवासियांसाठी कोणताही त्याग करण्यासाठी मी केव्हाही तयार आहे. माझे जीवन देशवासियांसाठी सर्मिपत आहे. भ्रष्टाचाराशी मुकाबला करणे, हेच माझे ध्येय आहे. हाच माझा मुख्य कार्यक्रम आहे. माझे ध्येय निश्चित आहे आणि भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी योग्य प्रकारे कार्यक्रमाची आखणीही केलेली आहे.’

`भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांमुळे राजकीय धुरीणांशी कायम संघर्ष करताना आपण मला पाहिले. असे असूनही मला आणखी बदल घडवायचे आहेत. शिक्षण व्यवस्थेत बदल झाल्यास मुलाला आपोआपच चांगल्या वातावरणात वाढण्यासाठी, पुâलण्यासाठी मदत होईल. डोनेशनच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालये लाच स्वीकारत असतील, तर मुलांकडून तुम्ही कशाची अपेक्षा ठेवणार? कोणत्या मार्गाचा ते अवलंब करतील? गोपनीय कायद्याचे हत्यार देशात कायम वापरले गेले. सरकारला जे काही लपवायचे आहे, ते याच्या नावाखाली लपविण्यात आले.

माझी हा कायदा मोडीत काढण्याची इच्छा आहे. माहिती मिळविण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र हा केवळ कागदावरच राहिला आहे. का? माहिती मिळवण्यासाठी आपल्याला निश्चित कालमर्यादा आखावी लागेल. गावपातळीवर आणखी अधिकार बहाल करावेत, या मताचा मी आहे.’
`सत्तेच्या गल्ल्या या भ्रष्टाचारावरच पोसल्या गेल्या आहेत. देशाची राजधानी दिल्ली यात अग्रक्रमावर आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यासाठी लोकांना एकत्र करण्यास वेळ लागेल. मात्र आम्ही त्या दिशेने काम करीत आहोत. देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी मोठ्या प्रमाणावर हे काम केले. मात्र मधेच त्यांचे नियंत्रण सुटले. राजकारणात गेल्याने त्यांच्या आधीच्या उत्तुंग प्रतिमेला तडा गेला. 

मी राजकारणात प्रवेश करावा यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राजकीय पक्षांनी अनेकदा माझ्याशी संपर्वâ साधून मला आवाहन केले. मी मात्र माझ्या भूमिकेवर खंबीर राहिलो. अनेक वर्षांपूर्वीच मी  जकारणात प्रेवश न करण्याबाबत माझे मन तयार केले होते. आताची स्थिती आणखी बिकट आहे. स्वच्छ प्रतिमेच्या
लोकांनी राजकारणात प्रवेश करण्याची गरज आहे.’ 

No comments:

Post a Comment